शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

अ‍ॅट्रॉसिटी गुन्ह्यातील ६१ आरोपी निर्दोष; नगर जिल्हा न्यायालयाचा निकाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2017 19:39 IST

कर्जत तालुक्यातील शिंदे येथील दलित वस्तीवर हल्ला व मारहाण खटल्यातील ६१ आरोंपीची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्त ता केली. शिंदे येथे ४ मार्च २००४ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी सिंदुबाई दत्तात्रय शिंदे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.

अहमदनगर : कर्जत तालुक्यातील शिंदे येथील दलित वस्तीवर हल्ला व मारहाण खटल्यातील ६१ आरोंपीची जिल्हा न्यायालयाने निर्दोष मुक्त ता केली. शिंदे येथे ४ मार्च २००४ रोजी ही घटना घडली होती. या प्रकरणी सिंदुबाई दत्तात्रय शिंदे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली होती.या खटल्याची जिल्हा न्यायालयात २०१३ पासून सुनावणी सुरू झाली. हा खटला लढविण्यासाठी सरकारने विशेष सरकारी वकील म्हणून औरंगाबाद येथील अ‍ॅड. संघमित्रा वाघमारे यांची नियुक्त केली होती. २००४ मध्ये शिंदे येथील दलित समाजातील व्यथांबाबत एका वृत्तपत्राने वृत्त प्रकाशित केले होते. त्यानंतर दलित चळवळीतील नेत्यांनी शिंदे या गावात भेटी दिल्या होत्या. ४ मार्च रोजी मिराबाई आंबेडकर यांनी शिंदे येथे दलित वस्तीत भेट देऊन या समाजातील नागरिकांशी चर्चा केली. दुपारनंतर आंबेडकर गावातून निघून गेल्यानंतर गावातील काही लोकांनी संघटितपणे येऊन दलित समाजातील नागरिकांच्या घरांवर हल्ला करत तोडफोड करत मारहाण केली होती. याबाबत कर्जत पोलीस ठाण्यात शिंदे येथील ६८ जणांविरोधात फिर्याद दाखल करण्यात आली होती. अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक अधिनियम, कलम ३०७,३२६,३२४,१४७ आदी कलमाप्रमाणे आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झालेल्या ६८ पैैकी तीन जण फरार, एक मयत तर तीन नावाचे माणसेच अस्तित्वात नसल्याचे समोर आले. त्यामुळे ६१ जणांविरोधात हा खटला चालला़ खटल्यात सरकारी पक्षाच्यावतीने एकूण २२ साक्षीदार तपासण्यात आले. अतिरिक्त सत्र न्यायाधीश रवींद्र पांडे यांनी हा निकाल दिला. आरोपींच्यावतीने अ‍ॅड. सुभाष काकडे यांनी हा खटला लढविला. त्यांना अ‍ॅड. सौरभ काकडे व अ‍ॅड. रोहित सिद्ध यांनी सहकार्य केले.

चौदा वर्षानंतर निकाल

शिंदे येथे २००४ रोजी दलित वस्तीवर हल्ला झाल्याची घटना घडली़ होती. या खटल्याचा तब्बल १४ वर्षानंतर निकाल लागला. सक्षम पुराव्याअभावी यातील सर्व आरोपी निर्दोष सुटले़ निकालाच्या दिवशी या खटल्यातील विशेष सरकारी वकील संघमित्रा वाघमारे या उपस्थित नव्हत्या.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar district courtअहमदनगर जिल्हा व सत्र न्यायालय