शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

६० वर्ष आपण गंगाच साफ करतोय - पद्मश्री डॉ. शरद काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:55 IST

कचरा उचलून फेकण्यावर भारताचे रोज तीन कोटी खर्च होतात. जपान हा देश पर्यावरणाचा सेवक आहे आणि आपण ६० वर्षांपासून गंगाच साफ करतोय, असे निसर्गगृह या बायोगॅस सयंत्राचे जनक भाभा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देया देशाच्या दिवसाची सुरुवात कचरा बाहेर काढण्यापासून होते. कचरा घरातून बाहेर काढून तो रस्त्यावर फेकला जातो. त्यातून प्रदूषण वाढते.कचरा उचलून फेकण्यावर भारताचे रोज तीन कोटी खर्च होतात. जपान हा देश पर्यावरणाचा सेवक आहे आणि आपण ६० वर्षांपासून गंगाच साफ करतोय

अहमदनगर : या देशाच्या दिवसाची सुरुवात कचरा बाहेर काढण्यापासून होते. कचरा घरातून बाहेर काढून तो रस्त्यावर फेकला जातो. त्यातून प्रदूषण वाढते. कचरा उचलून फेकण्यावर भारताचे रोज तीन कोटी खर्च होतात. जपान हा देश पर्यावरणाचा सेवक आहे आणि आपण ६० वर्षांपासून गंगाच साफ करतोय, असे निसर्गगृह या बायोगॅस सयंत्राचे जनक भाभा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सांगितले.येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातील सायन्स असोसिएशनच्यावतीने विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. शरद काळे बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, उपप्राचार्य ए. के. पंधरकर, डॉ. एस. बी. गायकवाड, प्रा. गिरिष कोकरेजा, प्रा. महेश आहेर आदी उपस्थित होते.डॉ. काळे म्हणाले, ४० टक्के अन्नाचा कचरा आपल्या देशात आहे. घरातील कच-याचे जर सेंद्रीय खत तयार केले तर देश अतिशय विकसित होवू शकतो. भारताचे कचरा उचलून फेकण्यावर रोज तीन कोटी रुपये खर्च होत आहेत. देशभर फिरुन जेवढे विज्ञान शिकलो नाही, तेवढे विज्ञान आईने शिकविले. कुठल्याही क्षेत्रात कार्य करण्यापेक्षा शेती, शिक्षक व संशोधन हे कार्य अतिशय क्रियाशिल आहे. पण सध्याच्या युगातील युवा पिढीमध्ये हे कार्य करण्याची आवड नाही. यामुळे पुढील पिढीच्या आयुष्याची चिंता वाटते.प्रारंभी डॉ. चंद्रशेखर व्यंकटेशरमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.

आम्ही चुकीच्या धर्मात सापडलो

सर्वांचा एकच धर्म आहे, तो म्हणजे मानव. स्त्री-पुरुष ही जात आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले तर समाजातील सर्व वाद दूर होतील. सर्वाधिक सहिष्णुतेच्या देशात अडाणीपणामुळे अंदाधुंदपणा वाढला आहे. म्हणूनच आम्ही चुकीच्या धर्म संकल्पनांमध्ये अडकलो आहोत, असेही डॉ. काळे म्हणाले. आम्ही अल्कोहोल हे वाईट आहे, हे लोकांना सांगू शकत नाही आणि कसले आपण विज्ञान दिन साजरा करीत आहोत, असा प्रश्न उपस्थित करीत डॉ़ काळे यांनी उद्विग्नता व्यक्त केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर