शहरं
Join us  
Trending Stories
1
जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
2
संपादकीय: बिहार ठरवेल आगामी दिशा? जनसुराज्य, जंगलराज ते मागासच राहिलेले राज्य...
3
काटा मारणाऱ्या कारखान्यांवर कारवाई: मुख्यमंत्री म्हणाले, कारखान्यांच्या नफ्यातील पैसे मागितले, एफआरपीचे नाही
4
बिहारमध्ये २२ वर्षांनंतर मतदारयादीचे ‘शुद्धीकरण’; केंद्रीय निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचा दावा
5
पुतीन यांच्या जाळ्यात ट्रम्प अडकले की काय? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष मोठ्या भ्रमात होते, पण...
6
महाराष्ट्रातील पूरग्रस्तांना केंद्र भरीव मदत करणार; केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची ग्वाही
7
‘आरएटी’ सक्रिय झाल्याने एअर इंडियाच्या विमानाचे लँडिंग
8
शासकीय रुग्णालयांना चक्क बोगस औषधांचा पुरवठा, स्थानिक पातळीवर खरेदी
9
राज्यात प्राध्यापकांच्या १२ हजारांपेक्षा जास्त जागा रिक्त; पीएच.डी., नेट, सेट असूनही अनेक प्राध्यापक कंत्राटी
10
लष्करी सेवेतील दीर्घ ताणामुळे कॅन्सर बळावू शकतो; मृताच्या वारसांना पेन्शन देण्याचा हायकोर्टाचा निर्णय
11
बिल्डरकडून सरकारी जागेवर इमारती उभारून ११२ रहिवाशांची फसवणूक; ३६ वर्षांनी प्रकार उघड
12
पाकच्या पोकळ वल्गना सुरूच; म्हणे, भारत त्यांच्याच विमानांच्या ढिगाऱ्याखाली दबेल
13
मनसे ‘मविआ’ सहभागी? ठाण्यातील बैठकीत संकेत
14
आफ्रिकेतील टांझानियाच्या घनदाट जंगलांतली जादूगार
15
नेपाळमध्ये दोन वर्षांची आर्यतारा नवी देवी!
16
कुशीवली धरणाचा मोबदला संतप्त शेतकऱ्यांनी नाकारला; प्रतिगुंठा २० हजार; रक्कम नाशिक लवादाकडे जमा करण्याच्या हालचाली
17
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
18
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
19
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
20
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 

६० वर्ष आपण गंगाच साफ करतोय - पद्मश्री डॉ. शरद काळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 16:55 IST

कचरा उचलून फेकण्यावर भारताचे रोज तीन कोटी खर्च होतात. जपान हा देश पर्यावरणाचा सेवक आहे आणि आपण ६० वर्षांपासून गंगाच साफ करतोय, असे निसर्गगृह या बायोगॅस सयंत्राचे जनक भाभा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सांगितले.

ठळक मुद्देया देशाच्या दिवसाची सुरुवात कचरा बाहेर काढण्यापासून होते. कचरा घरातून बाहेर काढून तो रस्त्यावर फेकला जातो. त्यातून प्रदूषण वाढते.कचरा उचलून फेकण्यावर भारताचे रोज तीन कोटी खर्च होतात. जपान हा देश पर्यावरणाचा सेवक आहे आणि आपण ६० वर्षांपासून गंगाच साफ करतोय

अहमदनगर : या देशाच्या दिवसाची सुरुवात कचरा बाहेर काढण्यापासून होते. कचरा घरातून बाहेर काढून तो रस्त्यावर फेकला जातो. त्यातून प्रदूषण वाढते. कचरा उचलून फेकण्यावर भारताचे रोज तीन कोटी खर्च होतात. जपान हा देश पर्यावरणाचा सेवक आहे आणि आपण ६० वर्षांपासून गंगाच साफ करतोय, असे निसर्गगृह या बायोगॅस सयंत्राचे जनक भाभा संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ पद्मश्री डॉ. शरद काळे यांनी सांगितले.येथील न्यू आर्टस्, कॉमर्स अ‍ॅण्ड सायन्स महाविद्यालयातील सायन्स असोसिएशनच्यावतीने विज्ञान दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात डॉ. शरद काळे बोलत होते. यावेळी प्राचार्य डॉ. बी. एच. झावरे, उपप्राचार्य ए. के. पंधरकर, डॉ. एस. बी. गायकवाड, प्रा. गिरिष कोकरेजा, प्रा. महेश आहेर आदी उपस्थित होते.डॉ. काळे म्हणाले, ४० टक्के अन्नाचा कचरा आपल्या देशात आहे. घरातील कच-याचे जर सेंद्रीय खत तयार केले तर देश अतिशय विकसित होवू शकतो. भारताचे कचरा उचलून फेकण्यावर रोज तीन कोटी रुपये खर्च होत आहेत. देशभर फिरुन जेवढे विज्ञान शिकलो नाही, तेवढे विज्ञान आईने शिकविले. कुठल्याही क्षेत्रात कार्य करण्यापेक्षा शेती, शिक्षक व संशोधन हे कार्य अतिशय क्रियाशिल आहे. पण सध्याच्या युगातील युवा पिढीमध्ये हे कार्य करण्याची आवड नाही. यामुळे पुढील पिढीच्या आयुष्याची चिंता वाटते.प्रारंभी डॉ. चंद्रशेखर व्यंकटेशरमण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दिपप्रज्वलन करण्यात आले. यावेळी विज्ञान दिनानिमित्त आयोजित विविध स्पर्धेतील विजेत्यांचा बक्षिस देऊन गौरव करण्यात आला.

आम्ही चुकीच्या धर्मात सापडलो

सर्वांचा एकच धर्म आहे, तो म्हणजे मानव. स्त्री-पुरुष ही जात आहे, हे सर्वांनी लक्षात घेतले तर समाजातील सर्व वाद दूर होतील. सर्वाधिक सहिष्णुतेच्या देशात अडाणीपणामुळे अंदाधुंदपणा वाढला आहे. म्हणूनच आम्ही चुकीच्या धर्म संकल्पनांमध्ये अडकलो आहोत, असेही डॉ. काळे म्हणाले. आम्ही अल्कोहोल हे वाईट आहे, हे लोकांना सांगू शकत नाही आणि कसले आपण विज्ञान दिन साजरा करीत आहोत, असा प्रश्न उपस्थित करीत डॉ़ काळे यांनी उद्विग्नता व्यक्त केली.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर