श्रीगोंदा : कुकडी प्रकल्पात दि. १ आॅगस्ट दुपारी ४ वाजेपर्यंत १६ हजार ८५३ एमसीएफटी (५५ टक्के) तर घोड धरणात ८२१ एमसीएफटी (१५ टक्के) पाणीसाठा झाला आहे, अशी माहिती कुकडी प्रकल्प विभाग क्र. २ चे कार्यकारी अभियंता यादवराव खताळ यांनी दिली.वडज व येडगाव धरणातून ओव्हरफ्लोचे सुमारे १५ हजार क्युसेकने घोड धरणात पाणी सोडण्यात आले त्यामुळे घोड धरणात सुमारे एक टीएमसी पाणी आले. कुकडी पाणलोट क्षेत्रातील पावसाचा जोर ओसरला त्यामुळे येडगावमधून ५०० तर वडजमधून अवघे २०० क्युसेक पाणी सोडण्यात येत आहे. शनिवारपर्यंत घोड धरणात २० टक्के पाणीसाठा होणार आहे. वडज धरणाच्या कालव्यातून ४१० क्युसेक तर येडगाव धरणाच्या कालव्यातून १ हजार ३०० क्युसेकने आवर्तनासाठी पाणी सोडण्यात येत आहे.गेल्या ३-४ दिवसात कुकडी पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला. मात्र शुक्रवारी पाणलोट क्षेत्रातून पाऊस गुल झाला त्यामुळे धरणामध्ये अवघे ३ टक्के पाणी आले.घोड धरणात ८२१ (१५ टक्के) पाऊस शून्य मिमी, येडगाव २ हजार ५४५ (९० टक्के) पाऊस ५०० मिमी, डिंबे- ८ हजार ७९ (६५ टक्के पाऊस ४९० मिमी. वडज- १ हजार १९ (८७ टक्के) पाऊस २०० मिमी, पिंपळगाव जोगे १ हजार ५२७ (४० टक्के) पाऊस ५७२ मिमी.विसापूर, सीना, खैरी तलाव कोरडे पडले आहेत. पिण्याचा पाणी प्रश्न गंभीर बनला आहे. (तालुका प्रतिनिधी)कुकडी प्रकल्प तीन वर्षातीलउपयुक्त पाणी साठ्यातील तफावत (दि. १ आॅगस्ट अखेर)धरणाचे नावसनसनसन२०१२२०१३२०१४येडगाव१,६३१२,२४८२,५४५वडज१७११०५३१०१९माणिकडोह१९४६५८६५३६९२डिंबे४२२३११,१८०८०७२पिंपळगाव जोगे७२५१९६०१५२७सरासरी पाणी साठा८७५६२२,३०५१६,८५३ (२९ %)(७३ %)(५५%)
कुकडीत ५५ टक्के तर घोडमध्ये १५ टक्के पाणीसाठा
By admin | Updated: August 2, 2014 00:42 IST