शहरं
Join us  
Trending Stories
1
CET: बीबीए, बीसीए, बीएमएसच्या परीक्षेसाठी सीईटी कक्षाकडून नोंदणी सुरू 
2
राशीभविष्य, १५ जून २०२५: कामात समाधान लाभेल, आवडत्या व्यक्तीची भेट होईल, प्रवासाचा बेत आखाल !
3
Maharashtra Govt: महावितरणची सौरऊर्जेत ३० हजार कोटींची गुंतवणूक!
4
Mumbai Local: तिकीट काढूनच फर्स्ट क्लासमधून प्रवास; नाही तर भरा दंड!
5
Navi Mumbai: नवी मुंबईत पाच आंतरराष्ट्रीय विद्यापीठे येणार
6
Ulhasnagar: धक्कादायक! डॉक्टरांनी मृत घोषित केलेला रुग्ण होता जिवंत
7
Air India: सोने तस्करीप्रकरणी एअर इंडियाच्या कर्मचाऱ्याला अटक
8
Mumbai Accident: लिंक रोड नेमका कोणासाठी बांधला? गोवंडी अपघातानंतर नागरिकांमध्ये संताप
9
Ahmedabad Plane Crash: चौकशीसाठी उच्चस्तरीय समिती स्थापन, मृतांची संख्या २७०
10
Palghar: आधी मृत अर्भकाला पिशवीतून नेऊ दिले, आता आरोग्य विभागाचे एकमेकांकडे बोट
11
अग्रलेख: ‘ती’च्यावर गर्भाशय काढण्याची वेळ का येते?
12
Mumbai Accident: गोवंडीत तीन लहान मुलांसह चौघांना भरधाव डम्परने चिरडले
13
WTC Final: अखेर २७ वर्षांनंतर दक्षिण आफ्रिकेने पुसला चोकर्सचा डाग; ऑस्ट्रेलियाला नमवून कसोटीचा नवा चॅम्पियन
14
विमान अपघातात सापडलेली भगवदगीता, कृष्ण मूर्ती कोणाची? एअर इंडियाची क्रू मेंबर असलेल्या पनवेलच्या लेकीची...
15
इराणच्या आकाशात इस्रायलची विमाने, गॅस रिफायनरीवर हल्ला; डिफेंस सिस्टीम उध्वस्त
16
आयुष्यात कधीच विमानात बसणार नाही; व्हिडीओ रेकॉर्ड करणाऱ्या आर्यनने घेतली धास्ती, पोलीस चौकशीनंतर...
17
अमेरिकेत मोठी घटना! दोन खासदारांवर घरात घुसून गोळीबार; महिला खासदार, पतीचा मृत्यू
18
नीट-यूजीचा निकाल जाहीर! राजस्थानचा महेश कुमार पहिला, तर महाराष्ट्राचा कृष्णांग जोशी तिसरा
19
एअर इंडियाकडून मदत जाहीर, मृतांच्या नातेवाईकांना २५ लाखांची मदत देणार; टाटा सन्सचेही १ कोटी मिळणार...
20
दुबईतील ६७ मजली गगनचुंबी इमारतीला भीषण आग; ३,८२० रहिवाशांना बाहेर काढले

मुळा धरणात पिण्याच्या पाण्यासाठी ५४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2019 17:00 IST

मुळा धरणात सध्या पिण्यासाठी केवळ ५४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे़ पावसाळा लांबल्याने मुळा धरण खपाटीला गेले आहे.

राहुरी : मुळा धरणात सध्या पिण्यासाठी केवळ ५४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा शिल्लक आहे़ पावसाळा लांबल्याने मुळा धरण खपाटीला गेले आहे. पाऊस नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला आहे. उजव्या कालव्यातून २० जून रोजी पिण्यासाठी पाणी सोडण्यात येणार असल्याचे माहिती मुळा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता रावसाहेब मोरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली़२६ हजार दशलक्ष घनफूट पाणी साठवण असलेल्या मुळा धरणात सध्या मृत साठ्यासह ५ हजार ४७ दशलक्ष घनफूट पाणीसाठा आहे़ ४ हजार ५०० दशलक्ष घनफूट इतका पाणी साठा मृत आहे़ पिण्यासाठी व बाष्पीभवनासाठी पाणी वापर होणार आहे़ मागील वर्षी याच कालावधीत पाण्याचा साठा २९५ दशलक्ष घनफूट इतका होता़मुळा उजव्या कालव्यातून सुटणारे पिण्याचे आवर्तन २० जून ते १५ जुलै यादरम्यान सुरू राहणार आहे़ १५ दिवसांच्या कालावधीत पिण्यासाठी १२५ ते १४० दशलक्ष घनफूट पाणी वापरात येणार आहे़यंदा मुळा धरणातून जायकवाडीसाठी १९०० दशलक्ष घनफूट पाणी सोडण्यात आले होते़ त्यामुळे लाभक्षेत्राखालील शेतीसाठी पाणी यंदा अपुरे पडले. गेल्या वर्षी तांत्रिकदृष्ट्या मुळा धरण भरले होते़ मात्र पूर्ण क्षमतेने मुळा धरण भरले नव्हते़मुळा धरणात नव्याने पाण्याची आवक कधी होते. याकडे शेतकऱ्यांचे लक्ष वेधले आहे़ पाऊस झाला नसल्याने अजून नव्याने पाण्याचे आवक सुरू झाली नाही़ त्यामुळे शेतकऱ्यांत चिंतेचे वातावरण आहे.मुळा धरणाच्या उजव्या कालव्यातून पिण्यासाठी आवर्तन सोडण्यात येणार आहे़आवर्तन काळात वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे़ गरज पडल्यास पोलीस बंदोबस्तही घेण्यात येणार आहे़ पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी कर्मचा-यांचे पाच विभागात सुरक्षा पथक नेमण्यात आले आहे़ -रावसाहेब मोरे, कार्यकारी अभियंता, मुळा पाटबंधारे, अहमदनगर.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरRahuriराहुरी