शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रशांत किशोर यांना बिहारच्या आरा येथील रॅलीमध्ये गंभीर दुखापत, उपचारासाठी पाटणाला रवाना
2
छांगुर बाबावर EDची मोठी कारवाई! मुंबई, लखनौमध्ये छापे; ६० कोटींहून जास्तीचे मनी लाँड्रिंग उघड
3
"मी कोणाला छेडत नाही; पण मला कुणी त्रास दिला तर..."; एकनाथ शिंदेंचा उबाठा गटाला इशारा
4
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
5
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
6
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
7
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
8
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
9
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
10
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
11
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
12
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
13
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
14
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
15
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
16
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
17
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
18
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
19
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
20
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं

५३ गावात ग्रामसभा तहकूब

By admin | Updated: August 17, 2015 00:02 IST

अहमदनगर : जिल्ह्यातील १ हजार १९७ ठिकाणी ग्रामसभा झाल्या असून ५३ गावात वेगवेगळ्या कारणामुळे ग्रामसभा तहकूब झाल्या आहेत.

अहमदनगर : स्वातंत्र्यदिनी जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींमध्ये ग्रामसभा सक्तीच्या करण्यात आल्या होत्या. त्यानुसार १ हजार १९७ ठिकाणी ग्रामसभा झाल्या असून ५३ गावात वेगवेगळ्या कारणामुळे ग्रामसभा तहकूब झाल्या आहेत. पुरेशा गणसंख्ये अभावी या सभा तहकू ब झाल्या असून ६२ ठिकाणी पुढील आठ दिवसात ग्रामसभा होणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या वतीने देण्यात आली. शनिवारी स्वातंत्र्यदिनी जिल्हाभर ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’अभियान, वॉटर बजेट, जलयुक्त शिवार, रोजगार हमी योजनेचा वर्षभराचा आराखडा, गावात झालेली अतिक्रमणे आणि ग्रामस्थांच्या असणाऱ्या तक्रारी यासह अन्य विषयाचे सक्तीने वाचन करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. विशेष करून प्रत्येक गावात होणाऱ्या ग्रामसभेत ग्रामस्थांनी उपस्थित राहून त्या ठिकाणी आपल्या समस्या आणि तक्रारी मांडण्याचे आवाहन जिल्हा परिषदेच्यावतीने करण्यात आले होते. त्यानुसार जिल्ह्यात १ हजार १९७ गावात सुरळीत आणि शांततापूर्ण वातावरणात ग्रामसभा झालेल्या आहेत. ६२ ठिकाणी निरीक्षक उपलब्ध न झाल्याने त्या ठिकाणी पुढील आठ दिवसात ग्रामसभा होणार आहेत. तर ५३ ठिकाणी ग्रामसभा तहकूब करण्यात आलेल्या आहेत. या ठिकाणी नुकत्याच झालेल्या निवडणुकांमध्ये नव्याने ग्रामपंचायत सदस्य निवडून आलेले आहेत. मात्र त्यांच्याकडे अद्याप पदभार आलेला नाही. यामुळे त्यांनी ग्रामसभेकडे पाठ फिरवली आणि जे पराभूत झालेले आहेत तेही या सभेकडे आले नाहीत. अशा गावात ग्रामसभा झालेल्या नाहीत. (प्रतिनिधी)