शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रात ५२ लाख क्विंटल साखरेचा पाऊस; नगर पिछाडीवर, उता-यात कोल्हापूर तर गाळपात पुणे आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 18:08 IST

खचाखच भरलेली धरणे व सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे यावर्षी राज्यभरात उसाचे मळे बहरले आहेत. त्यामुळे सन २०१७-१८ च्या ऊस गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार अवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख क्विंटल साखरेचा अक्षरश: पाऊस पडला आहे.

ठळक मुद्देअवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख क्विंटल साखरेचा अक्षरश: पाऊस पडला आहे.कोल्हापूर विभागाने साखर उता-यात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. तर पुणे विभागाने ऊस गाळपात आघाडी घेतली आहे.एकेकाळी राज्यात साखर उत्पादनात सतत आघाडीवर असणारा अहमदनगर विभाग मात्र आता पिछाडीवर पडला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर विभागात अवघ्या एकाच साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदा सुरू होऊ शकलेला आहे.

अहमदनगर : खचाखच भरलेली धरणे व सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे यावर्षी राज्यभरात उसाचे मळे बहरले आहेत. त्यामुळे सन २०१७-१८ च्या ऊस गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार अवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख क्विंटल साखरेचा अक्षरश: पाऊस पडला आहे.यंदा १ नोव्हेंबरला राज्यातील गळीत हंगामाला सुरूवात झाली. २२ नोव्हेंबरअखेरच्या प्राप्त आकडेवारीनुसार साखर आयुक्तालयाच्या सात प्रादेशिक विभागांतर्गत कोल्हापूर विभागाने साखर उता-यात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. तर पुणे विभागाने ऊस गाळपात आघाडी घेतली आहे. एकेकाळी राज्यात साखर उत्पादनात सतत आघाडीवर असणारा अहमदनगर विभाग मात्र आता पिछाडीवर पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर विभागात अवघ्या एकाच साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदा सुरू होऊ शकलेला आहे. या विभागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पूर्ती कारखान्यासह एकूण चारच कारखाने आहेत. ते सर्व खाजगी आहेत. नागपूरमध्ये आतापर्यंत राज्यातील सर्वात कमी ०.०८ मेट्रिक टन गाळपातून ०.०४ लाख क्विंटल साखर तयार झाली. विदर्भातील अमरावती विभागातील २ कारखान्यांमधून .९८ मेट्रिक टन गाळपातून ०.८४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.अहमदनगरला मागे टाकून राज्यात सर्वात पुढे गेलेल्या कोल्हापूर विभागात २५ सहकारी व १० खाजगी असे एकूण ३५ कारखाने सुरू आहेत. त्यांनी २३.५६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून २२.८० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर विभागाचा सरासरी साखर उतारा ९.६८ टक्के आहे. राज्यात सर्वाधिक ५७ कारखाने पवारांच्या पुणे विभागात आहेत. यात २९ कारखाने सहकारी तर जवळपास तेवढेच म्हणजे २८ कारखाने खाजगी आहेत. या ५७ कारखान्यांमधून ४१.०५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले. त्यातून ३७.२१ लाख क्विंटल साखर तयार झाली. गाळप व उत्पादनात पुणे विभाग राज्यात पहिल्या क्रमांकावर असला तरी सरासरी साखर उताºयात (९.०६ टक्के)हा विभाग दुसºया क्रमांकावर आहे.....................................राज्याचे गळीत हंगामाचे चित्रराज्यात ८९ सहकारी व ७० खाजगी असे १५९ साखर कारखाने २२ नोव्हेंबरअखेर सुरू आहेत. त्यातून १०४.१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ९१.१४ लाख क्विंटल साखरेची निर्मिती करण्यात आली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.७५ टक्के निघाला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने