शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

महाराष्ट्रात ५२ लाख क्विंटल साखरेचा पाऊस; नगर पिछाडीवर, उता-यात कोल्हापूर तर गाळपात पुणे आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 18:08 IST

खचाखच भरलेली धरणे व सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे यावर्षी राज्यभरात उसाचे मळे बहरले आहेत. त्यामुळे सन २०१७-१८ च्या ऊस गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार अवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख क्विंटल साखरेचा अक्षरश: पाऊस पडला आहे.

ठळक मुद्देअवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख क्विंटल साखरेचा अक्षरश: पाऊस पडला आहे.कोल्हापूर विभागाने साखर उता-यात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. तर पुणे विभागाने ऊस गाळपात आघाडी घेतली आहे.एकेकाळी राज्यात साखर उत्पादनात सतत आघाडीवर असणारा अहमदनगर विभाग मात्र आता पिछाडीवर पडला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर विभागात अवघ्या एकाच साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदा सुरू होऊ शकलेला आहे.

अहमदनगर : खचाखच भरलेली धरणे व सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे यावर्षी राज्यभरात उसाचे मळे बहरले आहेत. त्यामुळे सन २०१७-१८ च्या ऊस गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार अवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख क्विंटल साखरेचा अक्षरश: पाऊस पडला आहे.यंदा १ नोव्हेंबरला राज्यातील गळीत हंगामाला सुरूवात झाली. २२ नोव्हेंबरअखेरच्या प्राप्त आकडेवारीनुसार साखर आयुक्तालयाच्या सात प्रादेशिक विभागांतर्गत कोल्हापूर विभागाने साखर उता-यात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. तर पुणे विभागाने ऊस गाळपात आघाडी घेतली आहे. एकेकाळी राज्यात साखर उत्पादनात सतत आघाडीवर असणारा अहमदनगर विभाग मात्र आता पिछाडीवर पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर विभागात अवघ्या एकाच साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदा सुरू होऊ शकलेला आहे. या विभागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पूर्ती कारखान्यासह एकूण चारच कारखाने आहेत. ते सर्व खाजगी आहेत. नागपूरमध्ये आतापर्यंत राज्यातील सर्वात कमी ०.०८ मेट्रिक टन गाळपातून ०.०४ लाख क्विंटल साखर तयार झाली. विदर्भातील अमरावती विभागातील २ कारखान्यांमधून .९८ मेट्रिक टन गाळपातून ०.८४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.अहमदनगरला मागे टाकून राज्यात सर्वात पुढे गेलेल्या कोल्हापूर विभागात २५ सहकारी व १० खाजगी असे एकूण ३५ कारखाने सुरू आहेत. त्यांनी २३.५६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून २२.८० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर विभागाचा सरासरी साखर उतारा ९.६८ टक्के आहे. राज्यात सर्वाधिक ५७ कारखाने पवारांच्या पुणे विभागात आहेत. यात २९ कारखाने सहकारी तर जवळपास तेवढेच म्हणजे २८ कारखाने खाजगी आहेत. या ५७ कारखान्यांमधून ४१.०५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले. त्यातून ३७.२१ लाख क्विंटल साखर तयार झाली. गाळप व उत्पादनात पुणे विभाग राज्यात पहिल्या क्रमांकावर असला तरी सरासरी साखर उताºयात (९.०६ टक्के)हा विभाग दुसºया क्रमांकावर आहे.....................................राज्याचे गळीत हंगामाचे चित्रराज्यात ८९ सहकारी व ७० खाजगी असे १५९ साखर कारखाने २२ नोव्हेंबरअखेर सुरू आहेत. त्यातून १०४.१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ९१.१४ लाख क्विंटल साखरेची निर्मिती करण्यात आली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.७५ टक्के निघाला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने