शहरं
Join us  
Trending Stories
1
Parth Pawar Land Deal: भूखंड खरेदी प्रकरणात तिघांविरोधात गुन्हा दाखल, FIR मध्ये पार्थ पवारांचे नाव नाही 
2
प्रसिद्ध गायिका आणि अभिनेत्री सुलक्षणा पंडित यांचं निधन, मुंबईतील रुग्णालयात घेतला अखेरचा श्वास
3
Mumbai Local Accident: लोकल रेल्वेने चार प्रवाशांना उडवले, दोघे ठार; सँडहर्स्ट रोड स्थानकावरील घटना
4
...अखेर मनोहर शिंदेंनी दाखवला काँग्रेसला 'हात'! पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह जिल्हाध्यक्षांना पाठवला राजीनामा
5
पुण्यातील इंजिनिअरचे साडेनऊ तोळे सोने घेऊन पळाला, पोलिसांनी 'साशी गँग'च्या सदस्याला हरयाणात केली अटक
6
जवाहर लाल नेहरू विद्यापीठात पुन्हा 'लाल सलाम', 'अभाविप'ला झटका; चारही जागा डाव्यांनी जिंकल्या
7
'...त्याच्यामुळेच युती होऊ शकली नाही'; नितेश राणेंचं नाव घेत दीपक केसरकर स्पष्टच बोलले
8
पाकिस्तानचे PM शाहबाज यांच्या जवळच्या मंत्र्यांने दहशतवादी हाफिज सईदकडे आश्रय घेतला; केंद्रीय मंत्र्याने पहिल्यांदाच भेट दिली
9
दिल्लीनंतर आता बिहार! भाजपा नेत्याने १० महिन्यात दोन राज्यात केले मतदान; विरोधकांनी घेरलं
10
Mumbai Local Train: मुंबई लोकल तासाभराच्या खंडानंतर पुन्हा धावली; कर्मचाऱ्यांच्या आंदोलनामुळे प्रवाशांचे हाल
11
"श्री, मला माफ कर..."! मुंग्यांच्या भीतीने विवाहितेने आयुष्य संपवलं; अजब प्रकारानं सगळेच हैराण
12
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची बातमी, VRS संदर्भात सरकारनं जारी केली नवी गाइडलाइन!
13
WPL 2026 Retained Players List : मुंबई इंडियन्सनं वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन हरमनप्रीतला पगारवाढ दिली, पण...
14
"...आता कमरेवर हात ठेवून शेतात फिरतायेत"; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरे यांना टोला
15
नागपुरात सडक्या सुपारीचे दलाल परत सक्रिय, सहा हजार किलोंहून अधिक माल जप्त
16
"तेव्हाच सांगितलं होतं असं काही करू नका"; जमीन घोटाळा आरोपांवर अजित पवार स्पष्टच बोलले...
17
IND A vs SA A : पंत-KL राहुलसह सारेच ढेर; नाबाद शतकासह ‘ध्रुव’ तारा चमकला
18
राहुल गांधींनी हरियाणातील ज्या भाजप नेत्याच्या पत्त्यावर 66 मतं असल्याचा दावा केला, त्याचं सत्य काय? जाणून घ्या...!
19
Travel : हिवाळ्यात फिरायला जायचा विचार करताय? दक्षिण भारतातील 'ही' ठिकाणं ठरतील बेस्ट
20
Parth Pawar Land Case: "तुम्ही-आम्ही भांडत राहायचं आणि यांची मुलं जमिनी लाटून..."; उद्धव ठाकरेंचा घणाघात

महाराष्ट्रात ५२ लाख क्विंटल साखरेचा पाऊस; नगर पिछाडीवर, उता-यात कोल्हापूर तर गाळपात पुणे आघाडीवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 18:08 IST

खचाखच भरलेली धरणे व सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे यावर्षी राज्यभरात उसाचे मळे बहरले आहेत. त्यामुळे सन २०१७-१८ च्या ऊस गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार अवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख क्विंटल साखरेचा अक्षरश: पाऊस पडला आहे.

ठळक मुद्देअवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख क्विंटल साखरेचा अक्षरश: पाऊस पडला आहे.कोल्हापूर विभागाने साखर उता-यात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. तर पुणे विभागाने ऊस गाळपात आघाडी घेतली आहे.एकेकाळी राज्यात साखर उत्पादनात सतत आघाडीवर असणारा अहमदनगर विभाग मात्र आता पिछाडीवर पडला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर विभागात अवघ्या एकाच साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदा सुरू होऊ शकलेला आहे.

अहमदनगर : खचाखच भरलेली धरणे व सर्वत्र झालेल्या जोरदार पावसामुळे यावर्षी राज्यभरात उसाचे मळे बहरले आहेत. त्यामुळे सन २०१७-१८ च्या ऊस गळीत हंगामात साखरेचे विक्रमी उत्पादन होण्याचा अंदाज आहे. त्यानुसार अवघ्या २२ दिवसातच राज्यातील १९३ साखर कारखान्यांमधून ५२.६५ लाख क्विंटल साखरेचा अक्षरश: पाऊस पडला आहे.यंदा १ नोव्हेंबरला राज्यातील गळीत हंगामाला सुरूवात झाली. २२ नोव्हेंबरअखेरच्या प्राप्त आकडेवारीनुसार साखर आयुक्तालयाच्या सात प्रादेशिक विभागांतर्गत कोल्हापूर विभागाने साखर उता-यात सुरुवातीपासूनच आघाडी घेतली आहे. तर पुणे विभागाने ऊस गाळपात आघाडी घेतली आहे. एकेकाळी राज्यात साखर उत्पादनात सतत आघाडीवर असणारा अहमदनगर विभाग मात्र आता पिछाडीवर पडला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर विभागात अवघ्या एकाच साखर कारखान्याचा गळीत हंगाम यंदा सुरू होऊ शकलेला आहे. या विभागात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या पूर्ती कारखान्यासह एकूण चारच कारखाने आहेत. ते सर्व खाजगी आहेत. नागपूरमध्ये आतापर्यंत राज्यातील सर्वात कमी ०.०८ मेट्रिक टन गाळपातून ०.०४ लाख क्विंटल साखर तयार झाली. विदर्भातील अमरावती विभागातील २ कारखान्यांमधून .९८ मेट्रिक टन गाळपातून ०.८४ क्विंटल साखरेचे उत्पादन झाले.अहमदनगरला मागे टाकून राज्यात सर्वात पुढे गेलेल्या कोल्हापूर विभागात २५ सहकारी व १० खाजगी असे एकूण ३५ कारखाने सुरू आहेत. त्यांनी २३.५६ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करून २२.८० लाख क्विंटल साखरेचे उत्पादन केले आहे. कोल्हापूर विभागाचा सरासरी साखर उतारा ९.६८ टक्के आहे. राज्यात सर्वाधिक ५७ कारखाने पवारांच्या पुणे विभागात आहेत. यात २९ कारखाने सहकारी तर जवळपास तेवढेच म्हणजे २८ कारखाने खाजगी आहेत. या ५७ कारखान्यांमधून ४१.०५ लाख मेट्रिक टन ऊस गाळप झाले. त्यातून ३७.२१ लाख क्विंटल साखर तयार झाली. गाळप व उत्पादनात पुणे विभाग राज्यात पहिल्या क्रमांकावर असला तरी सरासरी साखर उताºयात (९.०६ टक्के)हा विभाग दुसºया क्रमांकावर आहे.....................................राज्याचे गळीत हंगामाचे चित्रराज्यात ८९ सहकारी व ७० खाजगी असे १५९ साखर कारखाने २२ नोव्हेंबरअखेर सुरू आहेत. त्यातून १०४.१५ मेट्रिक टन उसाचे गाळप करून ९१.१४ लाख क्विंटल साखरेची निर्मिती करण्यात आली आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ८.७५ टक्के निघाला आहे.

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSugar factoryसाखर कारखाने