शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
धक्कादायक! Instagram वरचे फॉलोअर्स कमी झाल्यानं सोशल मीडिया इन्फ्लुएंसरनं संपवलं आयुष्य
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
वाहत्या पाण्याला जेव्हा भाले फुटतात...
7
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
8
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
9
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
10
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
11
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
12
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
13
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
14
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
15
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
16
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
17
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
18
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
19
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
20
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला

सहा विभागातील ५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या

By admin | Updated: May 9, 2016 23:48 IST

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे दिवसभर जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठाण मांडून होते.

अहमदनगर : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची बदली प्रक्रिया सोमवारपासून सुरू झाली आहे. नूतन मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे दिवसभर जिल्हा परिषदेच्या सभागृहात ठाण मांडून होते. पहिल्या दिवशी महिला बालकल्याण, कृषी, सार्वजनिक बांधकाम उत्तर व दक्षिण, ग्रामीण पाणी पुरवठा, लघु पाटबंधारे आदी सहा विभागातील ५० कर्मचाऱ्यांची बदली झाली आहे. जि. प. च्या मुख्यालयात सकाळी ११ वाजता बदली प्रक्रिया सुरू झाली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी बिनवडे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अशोक कोल्हे, कॅफो अरुण कोल्हे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी परिक्षित यादव आदी उपस्थित होते. पहिल्या दिवशी आदिवासी भागातील (पेसा) च्या ४, प्रशासकीय २४, समानीकरण २२ अशा ५० कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. एकही कर्मचाऱ्याची आपसी बदली झालेली नाही. यंदाच्या बदलीच्या वैशिष्ट्यात आधी पेसामधून बाहेर येणारे, त्यानंतर स्वत:हून पेसात जाणारे, त्यानंतर प्रशासकीय बदल्या, समानीकरण आदी प्रकारात बदल्या करण्यात आल्या. यावेळी आॅनलाईन रिक्त जागांचा तपशील बदली पात्र कर्मचाऱ्यांना दाखवण्यात आला. जिल्हास्तरावर संघटनेचे पदाधिकारी असणाऱ्यांना बदलीत सवलत मिळाली आहे. यावेळी कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.(प्रतिनिधी) आरोग्य व पशुसंवर्धनच्या कर्मचाऱ्यांचे लक्षबांधकाम उत्तर आणि दक्षिण विभागातील १२, महिला बालकल्याण विभागातील ८, पाणी पुरवठा आणि लघु पाटबंधारे विभागातील ९, कृषी ४, अर्थ विभागात १५ कर्मचाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. मंगळवारी आरोग्य विभाग आणि पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांच्या बदल्या होणार आहेत.