शहरं
Join us  
Trending Stories
1
"लॉडर्स नव्हे, क्रिकेटची खरी पंढरी तर वानखेडे स्टेडियम आहे", CM देवेंद्र फडणवीसांनी सांगितलं कारण
2
'...तर मविआ सरकारमध्ये हसन मुश्रीफ गृहमंत्री झाले असते'; संजय राऊत यांचा पुस्तकात स्फोटक दावा
3
Wankhede Stadium: "या नावांमध्ये माझं नाव का घातलं मला माहिती नाही", शरद पवार स्टॅण्ड नामकरणावेळी काय बोलले?
4
भारताने आखली रणनीती; सिंधू पाणी करारानंतर आता पाकिस्तानला आणखी एक झटका बसणार...
5
'भारतीय सैन्य पंतप्रधान मोदींच्या चरणी नतमस्तक'; वाद उफळताच मध्य प्रदेशच्या उपमुख्यमंत्र्यांची सावरासारव
6
ऑपरेशन सिंदूरची माहिती पाकिस्तानला लीक झाली? काँग्रेसच्या प्रश्नावर सरकारने दिले स्पष्टीकरण...
7
भयंकर! ट्रेंड फॉलो करण्यासाठी रेल्वे ट्रॅकवर रील बनवणं बेतलं जीवावर; मागून आली ट्रेन अन्...
8
Ulhasnagar Crime: ठार मारण्याची धमकी, शौचालयात नेऊन अल्पवयीन मुलावर अनसैर्गिक अत्याचार; उल्हासनगरातील घटना 
9
कामाची गोष्ट! किती वेळानंतर बंद करावा एसी?; ९०% लोकांना माहित नाही बरोबर उत्तर
10
बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं
11
पाकिस्तानचा तिसरा कबुलीनामा! भोलारी एअरबेसवर ब्राह्मोस हल्ल्यात AWACS अन् जेट्स नष्ट, ७ ठार
12
"माझं बालवाङ्मय वाचण्याचं वय राहिलेलं नाही"; CM देवेंद्र फडणवीसांचा संजय राऊतांना खोचक टोला
13
Kedarnath Weather Alert: केदारनाथला जात आहात! जाणून घ्या, पुढील ५ दिवस कसे असणार हवामान?
14
'भाजपवर शंका घेणाऱ्यांनी पाकिस्तानात...' शिंदे गटाचे नेते संजय निरुपम यांचे मोठे वक्तव्य
15
सचिन तेंडुलकर, धोनीनंतर आता रोहित शर्मा आणि विराट कोहली यांनाही मिळणार 'हा' सन्मान?
16
डिफेन्स शेअर्सची घोडदौड सुरुच; मिड आणि स्मॉलकॅपमध्येही तेजी, 'या' स्टॉक्सना मोठं नुकसान
17
Astrology: १७ मे, गजकेसरी योगात शनिकृपेचा ५ राशींवर वर्षाव; घडणार अविस्मरणीय घटना!
18
Astro Tips: शनिवारी सायंकाळी पिंपळपारावार लावा पंचदिप; भाग्योदय येईल समीप!
19
"मला त्यांचं तोंडही पाहायचं नाही..", पाकिस्तानी वडिलांचा प्रचंड द्वेष करते ही अभिनेत्री
20
अनुष्का तिवारी नाही, कारागिरांसारखी मुलं करत होती शस्त्रक्रिया! 'हेअर ट्रान्सप्लांट' प्रकरणात धक्कादायक खुलासा

४० कर्मचार्‍यांना पदोन्नती

By admin | Updated: June 29, 2024 13:07 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ४० कर्मचार्‍यांना सोमवारी कालबध्द पदोन्नती देण्यात आली.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ४० कर्मचार्‍यांना सोमवारी कालबध्द पदोन्नती देण्यात आली. येत्या दोन दिवसांत आणखीन १२ कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात येणार असून कृषी आणि पशू संवर्धन विभागातील ११ कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेत शनिवार पासून बदल्याची प्रक्रिया सुरू आहे. महिला बालकल्याण विभागातील ४ कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया पार पडली असून सोमवारी कृषी विभागातील दोन कृषी अधिकार्‍यांची बदली झाली. यात एक प्रशासकीय आणि विनंती बदलीचा समावेश आहे. तसेच तीन विस्तार अधिकार्‍यांची विनंती बदली करण्यात आली आहे. पशूसंवर्धन विभागातील पशूधन विकास अधिकारी, पशूधन पर्यवेक्षक आणि वणोपचार या संवर्गातील प्रत्येकी दोन कर्मचार्‍यांच्या बदल्या झालेल्या आहेत. दरम्यान, काल सकाळी मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत ४० कर्मचार्‍यांना कालबध्द पदोन्नती देण्यात आल्या. यात परिचरपदावर कार्यरत असणार्‍या ९ कर्मचार्‍यांना कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी पदावर तर कनिष्ठ सहाय्यक पदावर काम करणार्‍या ३१ कर्मचार्‍यांना वरिष्ठ सहाय्यक यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) ‘यथावकाश’ मुळे शिक्षकांमध्ये गोंधळ जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यासंदर्भात १५ च्या शासन निर्णयात आधी कर्मचार्‍यांचे समायोजन, त्यानंतर पदोन्नती आणि यथावकाश बदल्या करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. यथावकाश शब्दामुळे कर्मचार्‍यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. ही प्रक्रिया वर्षभर देखील सुरू राहू शकते असा तर्क अनेक शिक्षक उपस्थित करत असून शिक्षक संघटना देखील यासंदर्भात जिल्हा परिषदेत चौकशी करताना दिसत आहेत. १५० पटासाठी एक मुख्याध्यापक पदाला शिक्षण विभागाने परवानगी दिल्याने १९० अतिरिक्त मुख्याध्यापकांचा प्रश्न निकाली निघणार आहे. यामुळे नव्याने १४४ मुख्याध्यापकांची नव्याने पदांची निर्मिती होणार असून ३४ मुख्याध्यापक ३१ मे अखेर सेवानिवृत्त होत आहे. यामुळे अवघे २ मुख्याध्यापक अतिरिक्त राहणार आहेत. त्यांना देखील समवेत घेण्यात येणार आहे.