शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
2
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
3
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
4
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
5
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
6
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
7
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
8
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
9
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
10
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
11
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
12
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
13
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
14
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
15
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
16
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
17
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
18
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
19
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
20
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य

४० कर्मचार्‍यांना पदोन्नती

By admin | Updated: June 29, 2024 13:07 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ४० कर्मचार्‍यांना सोमवारी कालबध्द पदोन्नती देण्यात आली.

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या ४० कर्मचार्‍यांना सोमवारी कालबध्द पदोन्नती देण्यात आली. येत्या दोन दिवसांत आणखीन १२ कर्मचार्‍यांना पदोन्नती देण्यात येणार असून कृषी आणि पशू संवर्धन विभागातील ११ कर्मचार्‍यांच्या बदल्यांची प्रक्रिया पार पडली. जिल्हा परिषदेत शनिवार पासून बदल्याची प्रक्रिया सुरू आहे. महिला बालकल्याण विभागातील ४ कर्मचार्‍यांची बदली प्रक्रिया पार पडली असून सोमवारी कृषी विभागातील दोन कृषी अधिकार्‍यांची बदली झाली. यात एक प्रशासकीय आणि विनंती बदलीचा समावेश आहे. तसेच तीन विस्तार अधिकार्‍यांची विनंती बदली करण्यात आली आहे. पशूसंवर्धन विभागातील पशूधन विकास अधिकारी, पशूधन पर्यवेक्षक आणि वणोपचार या संवर्गातील प्रत्येकी दोन कर्मचार्‍यांच्या बदल्या झालेल्या आहेत. दरम्यान, काल सकाळी मुख्यकार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांच्या उपस्थितीत ४० कर्मचार्‍यांना कालबध्द पदोन्नती देण्यात आल्या. यात परिचरपदावर कार्यरत असणार्‍या ९ कर्मचार्‍यांना कनिष्ठ सहाय्यक लेखाधिकारी पदावर तर कनिष्ठ सहाय्यक पदावर काम करणार्‍या ३१ कर्मचार्‍यांना वरिष्ठ सहाय्यक यांचा समावेश आहे. (प्रतिनिधी) ‘यथावकाश’ मुळे शिक्षकांमध्ये गोंधळ जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्यासंदर्भात १५ च्या शासन निर्णयात आधी कर्मचार्‍यांचे समायोजन, त्यानंतर पदोन्नती आणि यथावकाश बदल्या करण्यासंदर्भात सूचना देण्यात आलेल्या आहेत. यथावकाश शब्दामुळे कर्मचार्‍यांमध्ये गोंधळाचे वातावरण आहे. ही प्रक्रिया वर्षभर देखील सुरू राहू शकते असा तर्क अनेक शिक्षक उपस्थित करत असून शिक्षक संघटना देखील यासंदर्भात जिल्हा परिषदेत चौकशी करताना दिसत आहेत. १५० पटासाठी एक मुख्याध्यापक पदाला शिक्षण विभागाने परवानगी दिल्याने १९० अतिरिक्त मुख्याध्यापकांचा प्रश्न निकाली निघणार आहे. यामुळे नव्याने १४४ मुख्याध्यापकांची नव्याने पदांची निर्मिती होणार असून ३४ मुख्याध्यापक ३१ मे अखेर सेवानिवृत्त होत आहे. यामुळे अवघे २ मुख्याध्यापक अतिरिक्त राहणार आहेत. त्यांना देखील समवेत घेण्यात येणार आहे.