शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
5
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
6
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
7
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
8
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
9
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
10
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
11
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
12
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
13
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
14
'माझ्या आईच्या डोळ्यात तेव्हा अश्रू आले जेव्हा...'; प्रियंका गांधींचा अमित शाहांवर निशाणा, म्हणाल्या....
15
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
16
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
17
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
18
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
19
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!
20
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं

३१० भूमिहीन, बेघरांना मिळाला हक्काचा निवारा, नगर जिल्ह्यात साकारल्या ११ वसाहती

By चंद्रकांत शेळके | Updated: December 8, 2023 19:35 IST

अहमदनगर : प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांतून गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील ३१० भूमिहीन, बेघरांना हक्काचा ...

अहमदनगर: प्रधानमंत्री आवास योजना तसेच राज्य पुरस्कृत विविध आवास योजनांतून गेल्या तीन वर्षांत जिल्ह्यातील ३१० भूमिहीन, बेघरांना हक्काचा निवारा मिळाला आहे. या भूमिहिनांना शासनाने स्वत:ची जागा उपलब्ध करून देत राज्यात २५ वसाहती बांधल्या आहेत. त्यातील ११ वसाहती एकट्यानगर जिल्ह्यातील आहेत. सन २०१६-१७ पासून जिल्ह्यात प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजनेंतर्गत घरकुले बांधली जात आहेत.

यात प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत एकूण ६० हजार २५४ घरकुलांच्या उद्दिष्टापैकी ५४ हजार ८६८ घरकुले पूर्ण झाली आहेत. याशिवाय राज्य पुरस्कृत आवास योजनांच्या ३५ हजार २९८ घरकुलांच्या उद्दिष्टापैकी ३० हजार ५७६ घरकुले पूर्ण झाली. म्हणजे केंद्र व राज्य शासन योजना मिळून जिल्ह्यात एकूण ८५ हजार ४४४ बेघर कुटुंबांना घरकुलाच्या रूपाने हक्काचा निवारा मिळाला आहे.

ज्यांच्याकडे स्वत:ची जागा आहे, त्यांची घरकुले तातडीने पूर्ण होत होती; परंतु आदिवासी, भटक्या जमातीतील काही लाभार्थी भूमिहीन असल्याने त्यांना घरकुले मंजूर असूनही जागेअभावी बांधता येत नव्हती. अशा स्थितीत जिल्हा प्रशासनाने त्यांना शासकीय जमीन उपलब्ध करून देत तेथे १० ते ६० घरांच्या वसाहती उभारल्या. गेल्या तीन वर्षांत राज्यात अशा २५ वसाहती उभारल्या असून त्यातील जवळपास निम्मा म्हणजे ११ वसाहती एकट्यानगर जिल्ह्यात उभारल्या आहेत. तेथे एकूण ३१० कुटुंबांची राहण्याची व्यवस्था झाली आहे.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक सुनील पठारे, सहायक अभियंता किरण साळवे, तसेच प्रत्येक तालुक्याचे गटविकास अधिकारी, संबंधित गावचे सरपंच, ग्रामसेवक यांनी या कामी परिश्रम घेतले.

या गावांत झाल्या वसाहती (कंसात लाभार्थी)नांदगाव (ता. नगर) - ४०मालुंजे (श्रीरामपूर) - २८कणकुरी (राहाता) - २०वांगदरी (श्रीगोंदा) - ४०शिंगणापूर (कोपरगाव) - १०हसनापूर (राहाता) १०चिकणी (संगमनेर) - १८खराडी (संगमनेर) १८लोणी (राहाता) ६०खारेकर्जुने (नगर) ६०कोकमठाण (कोपरगाव) १०एकूण ३१० कुटुंबघरकुलांसह शासकीय योजनाही दारातया लाभार्थ्यांना शासनाने शासकीय जागेवर घरे दिलीच; परंतु स्वच्छ भारतअंतर्गत शौचालय, १४ वा वित्त आयोग, ठक्कर बाप्पा योजनेतून अंतर्गत रस्ते, जलजीवनमधून पिण्याचे पाणी, सौभाग्य योजनेतून वीज, सीएसआर फंंडातून सांडपाणी व्यवस्था, पथदिवे, घनकचरा व्यवस्थापन अशा सुविधाही पुरविण्यात आल्या.प्रत्येकाला एक गुंठा जागाया लाभार्थ्यांना प्रत्येकी एक गुंठा जागा शासनाने उपलब्ध करून दिली असून त्यात ३०० चौरस फुटांचे घर व उर्वरित जागेत रस्ता, वृक्षारोपण केलेले आहे. एक ते दीड एकर जागेवर या प्रशस्त वसाहती आहेत.

 

 

टॅग्स :Ahmednagarअहमदनगर