शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्या रायफली विमानाने..."; दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर रात्रभर धावपळ कशासाठी? अमित शाहांनी संसदेत सगळं सांगितलं
2
'पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांना आधीच पकडले होते, काल मारले'; काँग्रेस नेत्याने ऑपरेशन महादेववर व्यक्त केला संशय
3
UPI व्यवहारांवर नवे निर्बंध; १ ऑगस्टपासून ‘डिजिटल शिस्त’ लागू, तुमच्यावर काय परिणाम होणार
4
मनसे-उद्धवसेना युती झाल्यास शिंदेंकडे गेलेल्या माजी नगरसेवकांच्या जागांवर दावा कुणाचा राहणार?
5
भारताची नक्कल करायला गेला अन् पाकिस्तान तोंडावर पडला! १३ चाचण्या करूनही क्षेपणास्त्र अयशस्वी
6
"१८ वर्षांनी बदलणार जग, माझा मुलगा कॉलेजला जाईल वाटत नाही"; Open AI च्या CEO काय वाटते भीती?
7
Nag Panchami 2025: पौराणिक कथांमधील 'या' तीन नागांचे स्मरण केल्याने मिळते सर्पदोषातून मुक्ती!
8
हलगर्जीपणाचा कळस! डॉक्टर काढत होते झोपा; मिळाले नाही उपचार, रुग्णाचा तडफडून मृत्यू
9
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
10
बँकांमध्ये ₹६७,००० कोटींची रक्कम पडून; कोणीही दावा केला नाही, सर्वाधिक पैसे कुठे?
11
माझ्या बाप्पाचं नाव मी शाहरुख ठेवलंय, तर सिद्धिविनायकाचं..., हर्षदा खानविलकर असं का म्हणाल्या?
12
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
13
PF पेन्शन वाढीवर सरकारचा 'यू-टर्न'? ७,५०० रुपये पेन्शन मिळणार की नाही? संसदेत केलं स्पष्ट
14
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
15
पत्नीचा विरह सहन होईना! घटस्फोटानंतर पतीनं जेवण सोडलं; ३० दिवस फक्त बिअर पिऊन जगला, मग जे घडले...
16
Nag Panchami 2025: नागपंचमीला उघडतो मंदिराचा तिसरा दरवाजा; काय दडले आहे तिथे?
17
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
18
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
19
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
20
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी

पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी ‘राष्ट्रवादी’वरीलही ३०८ कलम वगळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 12:39 IST

केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दाखल गुन्ह्यातील खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा(कलम ३०८) पोलिसांनी मागे घेतला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरील हेच कलम वगळले होते.

अहमदनगर : केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ल्याप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर दाखल गुन्ह्यातील खुनाचा प्रयत्न करण्याचा गुन्हा(कलम ३०८) पोलिसांनी मागे घेतला आहे. विशेष म्हणजे पाच दिवसांपूर्वी पोलिसांनी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवरील हेच कलम वगळले होते. पोलिसांची ही संभ्रमित भूमिका जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरली आहे.केडगाव दुहेरी हत्याकांडानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशीसाठी बोलावले होते. परंतु त्यावेळी कार्यकर्त्यांनी धुडगुस घातल्याने पोलिसांनी संग्राम जगताप यांच्यासह आमदार शिवाजी कर्डिले, माजी आमदार दादा कळमकर, अभिषेक कळमकर, कैलास गिरवले यांच्यासह २५० ते ३०० जणांवर गुन्हा दाखल केला. त्यात आरोपींवर ३५३, ३३३, १४३, १४७, १४८, १४९, ४५२, ४२७, ३२३, ५०४ आदी कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. यात नंतर ३०८ कलम वाढवण्यात आले.याप्रकरणी पोलिसांनी आमदार संग्राम जगताप, आमदार कर्डिले, गिरवले यांच्यासह ३५ जणांना अटक केली. दरम्यान गिरवले यांचा कोठडीत मृत्यू झाला, तर आमदार जगताप यांनी तूर्तास तरी जामीन घेतलेला नाही. कर्डिलेंसह इतर ३३ जणांना नुकताच जामीन झालेला आहे. अटक आरोपींना जामीन मिळाल्यानंतर आता पोलिसांनी या गुन्ह्यातील कलम ३०८ वगळले आहे. या गुन्ह्याच्या तपासाकामी विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली होती. तपासामध्ये या घटनेत कोणालाही गंभीर दुखापत आल्याचे आढळून आले नाही. त्यामुळे ३०८ कलम वगळून ३३६ कलम (जीविताच्या सुरक्षेबाबत धोका निर्माण करणे) वाढवण्यात आले आहे. तसा अहवाल तपासी अधिकारी शरद गोर्डे यांनी जिल्हा न्यायालयात सादर केला आहे.पोलिसांची संभ्रमित भूमिकाकेडगाव येथील दगडफेक व पोलीस अधीक्षक कार्यालयावरील हल्ला या दोन्ही गुन्ह्णांत आरोपींवर सदोष मनुष्यवधाचा प्रयत्न करणे हे ३०८ कलम लावण्यात आले. विशेष म्हणजे या दोन्ही गुन्ह्णांत पोलीस कर्मचाऱ्यांनीच फिर्याद दिलेली आहे. परंतु तरीही हे कलम वगळण्याची नामुष्की पोलिसांवर आली. गुन्ह्याता तथ्य नव्हते तर हे कलम का लावले आणि लावले तर मग मागे का घेतले, या पोलिसांच्या संभ्रमित भूमिकेची चर्चा सध्या जिल्हाभर होत आहे.एकाला शिक्षा, दुस-याला दिलासापोलिसांनी शिवसेना व राष्ट्रवादीच्या आरोपींवरील ३०८ कलम वगळले असले, तरी यात राष्ट्रवादीच्या अटक आरोपींना ३०८ कलमांन्वये कारवाईला सामोरे जावे लागले. त्यानंतर त्यांना रितसर जामीन मिळाला. दुसरीकडे शिवसैनिक हे कलम वगळल्यानंतर पोलिसात हजर झाले. त्यामुळे या कलमामुळे एकाला शिक्षा, तर दुस-याला दिलासा मिळाला आहे.

 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKedgoan double murderकेडगाव दुहेरी हत्याकांडNCPराष्ट्रवादी काँग्रेस