शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
2
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
3
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
4
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
5
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
6
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
7
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
8
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
9
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
10
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
11
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
12
"मृतदेहाच्या हातात चमचा तसाच होता..."; प्रत्यक्षदर्शीने सांगितला अंगावर काटा आणणारा प्रसंग
13
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
14
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
15
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश
16
खंडाळ्यात जुन्या वैमनस्यातून दोन गटात हिंसक हाणामारी; एकाचा मृत्यू, दोन जण जखमी
17
विमान अपघातात वसतिगृहातील मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांनाही १ कोटी मिळणार? टाटा समुहाने सांगितले...
18
'या' सरकारी बँकेत कमी दरात मिळू शकतं Home Loan; ३० लाखांच्या कर्जावर किती द्यावा लागेल EMI
19
इराण-इस्त्राईल संघर्षामुळे काश्मीरमध्ये 'हाय अलर्ट', भारताच्या चिंतेमागील कारण काय?
20
Gold Mortgage Loan : सोन्या-चांदीवर कर्ज घेताय? 'या' नियमांत झाला आहे बदल, जाणून घ्या

जामिनावर सुटलेले २६ कैदी झाले फरार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2018 17:56 IST

खून, अत्याचार, दरोडा, जबर मारहाण आदी गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेले जिल्ह्यातील २६ आरोपी जामिनावर बाहेर

अरुण वाघमोडेअहमदनगर : खून, अत्याचार, दरोडा, जबर मारहाण आदी गंभीर गुन्ह्यात शिक्षा झालेले जिल्ह्यातील २६ आरोपी जामिनावर बाहेरआल्यानंतर परत कारागृहात परतलेच नाहीत़ यातील बहुतांशी जण पुन्हा गुन्हेगारीकडे वळले आहेत़ २६ पैकी काही आरोपी २० ते २२ वर्षांपासून फरार आहेत.फरार झालेल्या कैद्यांसंदर्भात संबंधित पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्यांचा शोध घेण्याची जबाबदारी पोलीस पथकांवर सोपविण्यात आली आहे. हे कैदी मात्र कुणालाच सापडत नाहीत. फरार झालेले कैदी हे येरवडा, पैठण, नाशिक, कोल्हापूर या कारागृहात शिक्षा भोगत होते़ न्यायालयाने शिक्षा दिल्यानंतर आरोपींना कारागृह प्रशासनाकडून संचित (फर्लो) तर विभागीय आयुक्त कार्यालयाकडून अभिवचन (पॅरोल) रजा दिली जाते. संचित रजा १४ तर अभिवचन रजा २१ दिवसांची असते़ ही रजा मंजूर करून बाहेर पडल्यानंतर अनेक कैदी कारागृहात जाऊन आपल्या शिक्षेचा कार्यकाल पूर्ण करतात़ गुन्हेगारी प्रवृत्तीचे मात्र फरार होऊन पुन्हा आपल्या कारवाया सुरू करतात़ जिल्ह्यातील फरार झालेल्या २६ पैकी अनेक जण जन्मठेपेची शिक्षा झालेले असून, काही आरोपी सराईत गुन्हेगार आहेत.हे आहेत फरारगोरक्षनाथ बाबूराव शिंगोटे, रामकिसन उत्तम साठे, सय्यद साजीद रोशनमिया, किरण गोरख शेळके, संतोष बाबूराव सोनवणे, बाबाजी बाबूराव सोनवणे, प्रमोद काळू केंद्रळे, सतीश दिलीप खराडे, शौकात अहमदखान पठाण, उमाजी सुखदेव झांबरे, जितेंद्र सहदेव जगधने, नितीन बबन शिंदे, अंबादास तुकाराम पवार, मंगलसिंग उर्फ मंगेश चतुरसिंग ओनावले, आंबा जगदाळे, शाम केशव मोरे, हबीब सय्यद, चरणसिंग रावसाहेब जाधव, आनंदा रामदास शिरसाठ, सतीश गणपत धिवर, शेख अक्रम, राजेंद्र गणेश धिनोर, शेख एजाज गुलाब, धनू अशोक काळे, रिजवान शेख.पपड्याही सुटला होता पॅरोलवरकोपरगाव तालुक्यातील कोळपेवाडी येथे १९ आॅगस्ट रोजी ज्वेलर्स दुकानावर दरोडा टाकून एका सराफाचा खून करणारा कुख्यातगुन्हेगार पपड्या काळे याला खुनाच्या गुन्ह्यात जन्मठेपेची शिक्षा झालेली आहे़ तो नाशिक कारागृहात होता़ मुलाच्या लग्नासाठी मात्र त्याला पॅरोल रजा मंजूर झाल्याने तो जेलबाहेर आला होता़ जामिनावर बाहेरआलेला पपड्या फरार झाला आणि त्याने आपल्या गुन्हेगारी कारवाया सुरू केल्या़विविध गुन्ह्यात शिक्षा झालेल्या आरोपींना कायदेशीर अधिकारानुसार जामिनावर रजा मंजूर होते़ शिक्षा झालेले काही जण मात्र सराईत व गुन्हेगारी प्रवृत्तीचे असतात़ त्यामुळे ते पुन्हा कारागृहात न जाता पसार होतात़ सराईत गुन्हेगारांना रजा मंजूर करताना त्यांची पार्श्वभूमी पाहणे व स्थानिक पोलिसांच्या अहवालाचे अवलोकन करणे महत्त्वाचे असते़ एखाद्या सराईत गुन्हेगाराला रजा मंजूर झाली तर पोलिसांच्या निगराणीतच त्याने रजा पूर्ण करण्याची अट घालणे गरजेचे आहे. - रंजनकुमार शर्मा, जिल्हा पोलीस अधीक्षक

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरahmednagar policeअहमदनगर पोलीस