शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

२६ गावांच्या घशाला कोरड

By admin | Updated: October 30, 2023 10:49 IST

करंजी : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणारी मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजना गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने योजनेच्या कार्यक्षेत्रातील २६ गावांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे.

करंजी : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणारी मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजना गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने योजनेच्या कार्यक्षेत्रातील २६ गावांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. वीजबिल थकल्याने ‘महावितरण’ ने योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्याचा कटू निर्णय घेतल्याने या गावांवर ‘पाणी, पाणी’ करण्याची वेळ आली आहे. मिरी-तिसगाव नळ योजनेचे पांढरीचा पूल येथे जलशुध्दीकरण केंद्र आहे. येथे रोज पंधरा ते वीस टँकर भरले जातात. सध्या योजनाच बंद असल्याने टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करणे अशक्य झाले आहे. ऐन उन्हाच्या कडाक्यात विहिरींनी तळ गाठलेला असताना योजना बंद पडल्याने तिसगाव, चिचोंडी, शिराळ, कोल्हार, लोहसर, भोसे,जोडमोहोज, राधोहिवरे या प्रमुख गावांसह २६ गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. सुमारे चाळीस कोटी खर्चून युती शासनाच्या कारकिर्दीत मिरी-तिसगाव योजना मार्गी लागली. योजना वरदान ठरल्याने या गावांचा टँकरने होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. योजनेचे सुमारे पन्नास लाखांचे वीज बिल व पाणीपट्टी थकल्याने ‘महावितरण’ने योजनेचा वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे प्रशासनाला आता या सर्व टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. (वार्ताहर)