शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला, ऑपरेशन सिंदूर अन् युद्धविराम...राहुल गांधींची PM मोदींना पत्राद्वारे मोठी मागणी
2
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
3
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
4
Murali Naik : "शहीद झालो तर पार्थिव तिरंग्यात..."; मुरली नाईक यांच्या वडिलांनी सांगितली लेकाची शेवटची इच्छा
5
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
6
SIP मध्ये गुंतवणूक करताना बहुतेक गुंतवणूकदार 'या' चुका करतात; थेट परताव्यावर होतो परिणाम
7
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
8
नाशिकला अवकाळी पावसाने झोडपले; शहरात तासभर गडगडाट अन् कडकडाट
9
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
10
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
11
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
12
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
13
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
14
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
15
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
16
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
17
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
18
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
19
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
20
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...

२६ गावांच्या घशाला कोरड

By admin | Updated: October 30, 2023 10:49 IST

करंजी : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणारी मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजना गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने योजनेच्या कार्यक्षेत्रातील २६ गावांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे.

करंजी : पाथर्डी तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणारी मिरी-तिसगाव प्रादेशिक नळ योजना गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने योजनेच्या कार्यक्षेत्रातील २६ गावांवर पाणी टंचाईचे संकट ओढवले आहे. वीजबिल थकल्याने ‘महावितरण’ ने योजनेचा वीज पुरवठा खंडित करण्याचा कटू निर्णय घेतल्याने या गावांवर ‘पाणी, पाणी’ करण्याची वेळ आली आहे. मिरी-तिसगाव नळ योजनेचे पांढरीचा पूल येथे जलशुध्दीकरण केंद्र आहे. येथे रोज पंधरा ते वीस टँकर भरले जातात. सध्या योजनाच बंद असल्याने टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करणे अशक्य झाले आहे. ऐन उन्हाच्या कडाक्यात विहिरींनी तळ गाठलेला असताना योजना बंद पडल्याने तिसगाव, चिचोंडी, शिराळ, कोल्हार, लोहसर, भोसे,जोडमोहोज, राधोहिवरे या प्रमुख गावांसह २६ गावांचा पाणीप्रश्न गंभीर बनला आहे. सुमारे चाळीस कोटी खर्चून युती शासनाच्या कारकिर्दीत मिरी-तिसगाव योजना मार्गी लागली. योजना वरदान ठरल्याने या गावांचा टँकरने होणारा पाणी पुरवठा बंद करण्यात आला. योजनेचे सुमारे पन्नास लाखांचे वीज बिल व पाणीपट्टी थकल्याने ‘महावितरण’ने योजनेचा वीज पुरवठा खंडित केला. त्यामुळे प्रशासनाला आता या सर्व टंचाईग्रस्त गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागणार आहे. (वार्ताहर)