शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

शेततळ्यात २५ हजार माशांचा मृत्यू; भेर्डापुरात अज्ञाताकडून कृत्य 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2020 15:57 IST

श्रीरामपूर तालुक्यातील भेर्डापूर येथील एका शेततळ्यात सुमारे २५ हजार माशांचा मृत्यू झाला. अज्ञात इसमाने तळ्यात विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यात सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेततळ्यामधील अंदाजे सव्वा कोटी लिटर पाणी दूषित झाले आहे.

श्रीरामपूर : तालुक्यातील भेर्डापूर येथील एका शेततळ्यात सुमारे २५ हजार माशांचा मृत्यू झाला. अज्ञात इसमाने तळ्यात विषारी पदार्थ टाकल्यामुळे हा प्रकार घडल्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. यात सुमारे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून शेततळ्यामधील अंदाजे सव्वा कोटी लिटर पाणी दूषित झाले आहे.

श्रीरामपूर तालुका पोलीस ठाण्यात मंगळवारी याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निलेश पंडित कवडे व पंडित लक्ष्मण कवडे यांच्या एक एकर क्षेत्रात शेततळे आहे. त्यांनी मत्स्यपालन केले आहे. सहा महिन्यापूर्वी त्यांनी सोयापिनस (कोंबडा) जातीचे २५ हजार मासे त्यात सोडले होते. त्याची आजमितीस पूर्ण वाढ झाली होती. 

चार-पाच दिवसापूर्वी कवडे हे माशांना खाद्य टाकण्यासाठी शेततळ्यावर गेले असता त्यांना मृत मासे दिसून आले. त्यानंतर ५ जून रोजी तळ्यातील पूर्ण मासे मृत झाले होते. मागील आठवड्यात झालेल्या चक्रीवादळाचा फायदा घेऊन अज्ञात इसमाने शेततळ्यात विषारी पदार्थ टाकून मासे मारल्याचा अंदाज कवडे यांनी वर्तविला आहे. त्यांनी नुकसानभरपाई मिळावी, अशी मागणी केली आहे. तलाठी विकास शिंदे यांनी पंचनामा केला आहे.

मृत माशांची प्रयोगशाळेत तपासणी करणारदरम्यान, शेततळ्यात माशांचा मृत्यू झाल्यानंतर कवडे यांनी मुळा धरणावरील तज्ञांकडून शेततळ्यातील पाण्याची तपासणी करून घेतली. मात्र शेततळ्यातील पाण्यात कुठलाही दोष नसल्याचे सांगण्यात आले. मृत मासे नाशिक येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठविण्यात येणार असल्याचे कवडे यांनी सांगितले.

टॅग्स :Ahmednagarअहमदनगरfishermanमच्छीमारCrime Newsगुन्हेगारी