शहरं
Join us  
Trending Stories
1
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
2
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
3
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
4
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
5
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
6
पडळकरांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा जीवाचे बरे-वाईट करू; कुणी दिला इशारा, नेमके प्रकरण काय?
7
IND vs PAK हस्तांदोलन वादावर ऑस्ट्रेलियाचा रिकी पॉन्टींग स्पष्ट बोलला, पाकिस्तानला झापलं...
8
मेघालयमध्ये मोठी राजकीय उलथापालथ, ८ मंत्र्यांनी दिला राजीनामा, नेमकं कारण काय?
9
'तो जिच्यासोबत आहे तिला मी चांगलं ओळखतो', आरजे महावशबद्दल अरबाज अन् धनश्रीचं संभाषण
10
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ
11
RSS च्या विचारानुसार नरेंद्र मोदी ७५ वर्षानंतर वानप्रस्थाश्रमात जाण्याचा राजधर्म पाळतील का?, काँग्रेसचा सवाल
12
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
13
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
14
जगातील 'असे' ५ देश, ज्यांच्याकडे सैन्य दलच नाही! मग कोण करत देशाची सुरक्षा?
15
Navratri 2025: नवरात्रीत प्या झेंडूच्या फुलांचा चहा, मिळवा निरोगी डोळे, रक्तशुद्धी आणि नितळ त्वचा
16
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
17
दुसऱ्या धर्मात केलं लग्न, आता नवरा गेला सोडून; अभिनेत्री ढसाढसा रडली, म्हणाली, "प्लीज परत ये..."
18
६८ वर्षीय बॉलिवूड अभिनेत्रीची कॅन्सरशी झुंज, म्हणाली- "आता सर्जरी करणं शक्य नाही, त्यामुळे..."
19
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
20
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ

अडीच हजार विद्यार्थ्यांनी घेतला शिष्यवृत्तीचा लाभ

By admin | Updated: May 6, 2016 18:40 IST

अहमदनगर : समाजकल्याण विभागाच्यावतीने राजर्षी शाहू छत्रपती शिष्यवृत्ती योजना दोन प्रकारात राबवण्यात येते. या योजनेत गतवर्षी २ हजार ६३२ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे

अहमदनगर : समाजकल्याण विभागाच्यावतीने राजर्षी शाहू छत्रपती शिष्यवृत्ती योजना दोन प्रकारात राबवण्यात येते. या योजनेत गतवर्षी २ हजार ६३२ विद्यार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. दहावी व बारावीच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता पुरस्कार आणि अकरावी आणि बारावीच्या परीक्षेत ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणवत्ता शिष्यवृत्ती योजनेतून अनुदानाचा लाभ देण्यात येत आहे.समाजकल्याण विभाग (राज्य सरकार) यांच्या मार्फत राजर्षी शाहू छत्रपती शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येते. दोन प्रकारात राबवण्यात येणाऱ्या योजनेसाठी स्वतंत्र पध्दतीने प्रस्ताव दाखल करणे गरजेचे असल्याचे शिक्षण विभागाच्या वतीने सांगण्यात आले. २००५ पासून ही शिष्यवृत्ती योजना राबवण्यात येत आहे. मात्र, लाभार्थ्यांना मिळालेल्या लाभाची माहिती २०१३ पासून आॅनलाईन करण्यात आली आहे. या शिष्यवृत्तीसाठी उत्पन्न आणि मर्यादेचे बंधन नसल्याने जास्त संख्या असली तरी त्याचा लाभ देता येतो, अशी माहिती समाजकल्याण विभागाचे सहाय्यक संचालक माधव वाघ यांनी सांगितले. गत वर्षी गुणवत्ता शिष्यवृत्तीचा लाभ जिल्ह्यातील अकरावी व बारावीच्या २ हजार ४२० विद्यार्थ्यांना तर गुणवत्ता पुरस्काराचा लाभ २१२ विद्यार्थ्यांना मिळालेला आहे. शिष्यवृत्तीसाठी संबंधित विद्यार्थ्यांना आॅनलाईन अर्ज तर पुरस्कारासाठी शाळेला विद्यार्थ्याचा प्रस्ताव तयार करून समाजकल्याण विभागाकडे सादर करावा लागतो, असे संबंधित विभागाकडून सांगण्यात आले. (प्रतिनिधी)गुणवत्ता पुरस्कार योजनेचा लाभ एससी, एसटी, एसबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना मिळतो. यात दहावी आणि बारावीच्या परीक्षेत प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांना ५ हजार रुपयांचा लाभ तर शिष्यवृत्ती योजनेत दर महिन्याला ३०० रुपयेप्रमाणे वर्षाला ३ हजार रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते.