शहरं
Join us  
Trending Stories
1
Ravindra Chavan BJP: रवींद्र चव्हाण भाजपाचे नवे 'कॅप्टन'! महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड
2
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
3
Viral Video : स्वतःच्याच लग्नात नवरा हे काय करून बसला! व्हायरल व्हिडीओ बघून नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
6
अपूर्ण राहिलं शेफाली जरीवालाचं हे स्वप्न, पती पराग त्यागीसोबत बनवला होता प्लान
7
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
8
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
9
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
10
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
11
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
12
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
13
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
14
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
15
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
16
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
17
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
18
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
19
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
20
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी

जिल्हा परिषदेच्या शाळेत २१ कलमी कार्यक्रम

By admin | Updated: May 30, 2014 01:14 IST

अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शाळेत यंदा प्रथमच एकवीस कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्यातील उपक्रमशील शाळेतील विविध उपक्रमांची निवड करून हा कार्यक्रम आखण्यात आला

 अहमदनगर : जिल्हा परिषदेच्या शाळेत यंदा प्रथमच एकवीस कलमी कार्यक्रम राबविण्यात येत आहे़ जिल्ह्यातील उपक्रमशील शाळेतील विविध उपक्रमांची निवड करून हा कार्यक्रम आखण्यात आला असून, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळांत तो राबविला जाणार आहे़ त्यामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेलाही आता अच्छे दिन येणार असल्याचे बोलले जात आहे़ जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्येत दरवर्षी कमालीची घट होत आहे़ जिल्हा परिषदेच्या शाळेकडे विद्यार्थी पाठ फिरवितात़ खासगी शाळेला त्यांची पसंती असते़ खासगी शाळेत विविध उपक्रम राबविले जातात़ त्यामुळे खासगी शाळांना चांगले दिवस आहेत़ याउलट स्थिती जिल्हा परिषदेच्या शाळांची आहे़ जिल्हा परिषदेच्या शाळेतील पटसंख्या कमी होत असल्याने शिक्षकही अतिरिक्त ठरत आहेत़ शिक्षक अतिरिक्त होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून, शाळा ओस पडत आहेत़ यावर मात करण्यासाठी जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी शैलेश नवाल यांनी पुढकार घेतला असून, त्यांनी जिल्ह्यातील उपक्रमशील शाळांची पाहणी केली़ त्यांनी ३० शाळांना भेटी देऊन उपक्रमांची माहिती घेतली़ काही शाळेत स्तुत्य, असे उपक्रम राबविले जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले़ हे उपक्रम इतर शाळेत राबविण्यासाठी त्यांनी ४० शिक्षकांचा एक अभ्यास गट तयार केला़ या अभ्यास गटाने विविध उपक्रम सादर केले़ सादर केलेल्या २१ कार्यक्रमांची निवड करण्याचे एकत्रित बैठकीत ठरले़ निवडक कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीनेही हिरवा कंदील दाखविला असून, हा कार्यक्रम जिल्हा परिषदेच्या ३ हजार ६६६ शाळेत राबविण्याच्या सूचना नवाल यांनी दिल्या आहेत़ या कार्यक्रमामुळे जिल्हा परिषदेच्या शाळेत शिकणार्‍या विद्यार्थ्यांना या कार्यक्रमाचा निश्चित फायदा होईल़ प्रत्येक शाळेत समान कार्यक्रम राबविण्याचा जिल्ह्यातील हा पहिलाच प्रयोग असून, शिक्षक हा कार्यक्रम कसा राबवितात, याकडे आता लक्ष असेल. (प्रतिनिधी) काय आहे उपक्रम शैक्षणिक वर्षे २०१४- १५ साठीच्या नियोजनात २१ कलमी कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला आहे़ शाळा व्यवस्थापनांना कार्यक्रमाची माहिती देण्यात आली आहे़ दिपस्तंभ मार्गदर्शिका प्राथमिक शाळांना वितरित करण्यात आल्या आहेत़ त्यात वर्षभरात राबवायच्या उपक्रमांची माहिती देण्यात आली असून, हे कार्यक्रम प्रत्येक शाळेत राबविले जाणार आहेत. हे उपक्रम राबविले किंवा नाही, याची तपासणी केली जाणार आहे़ उपक्रमांचा विद्यार्थ्यांना किती फायदा झाला, यासाठी येत्या जुलैमध्ये विद्यार्थ्यांची बुध्दीमापन तपासणीही जिल्हा परिषदेच्या वतीने केली जाणार आहे़