शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

परतीच्या पावसाने पारगावात ५०० कोटींचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 15:29 IST

पारगाव सुद्रिक परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. सुमारे १ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, डाळिंब, लिंबोणीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत.

बाळासाहेब काकडे । श्रीगोंदा  : पारगाव सुद्रिक परिसरात पावसाने धुमाकूळ घातला. सुमारे १ हजार २०० हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, डाळिंब, लिंबोणीच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. कर्ज काढून शेतकºयांनी फळझाडांची लागवड केली होती़ मात्र, पावसामुळे बळीराजाचे ५०० कोटींचे नुकसान होऊन सारा गाव कर्जाच्या ओझ्याखाली सापडला आहे. सुमारे १ हजार ७६१ हेक्टर क्षेत्र असलेल्या पारगाव सुद्रिक खेतमाळीसमध्ये ५०० हेक्टर क्षेत्रात द्राक्षे, ४२५ हेक्टर क्षेत्रात लिंबोणी व ३२५ हेक्टर क्षेत्रात डाळिंब, संत्री पेरूच्या बागा आहेत. हे कृषी वैभव उभे करण्यासाठी ३ लाख ते १ कोटी २५ हजार दरम्यान सर्व शेतकºयांच्या डोक्यावर प्रत्येकी कर्जाचा बोजा आहे. पारगावमधील बळीराजा हिमतीने शेती करीत होता. पण परतीच्या पावसाने फळबागा उद्ध्वस्त केल्या. या बागा वाचविण्यासाठी शेतकºयांनी दिवाळी साजरी न करता औषधेफवारणीसाठी लाखो रुपयांचा खर्च केला. सारे पावसाने धुवून नेले. सारा गाव कोट्यवधी रुपयांच्या कर्जाच्या ओझ्याखाली दबला आहे. तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ म्हस्के, मंडल अधिकारी आबासाहेब भोरे, सहाय्यक कृषी अधिकारी के.बी.अनारसे, कामगार तलाठी बशीर शेख यांनी पंचनामे करण्याची मोहीम हाती घेतली. पण शासनाच्या मदतीने आमचे नुकसान भरु शकणार नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी शहाजी हिरवे, राजेंद्र मोटे यांनी व्यक्त केली. दिवाळीचा सण साजरा केला नाही. पण द्राक्षाला औषधे फवारली. पण काहीच उपयोग झाला नाही. साºया बागा निकामी झाल्या. आता कर्जाची परतफेड कशी करायची? असा प्रश्न आहे, असे शेतकरी भानुदास हिरवे यांनीू सांगितले.श्रीगोंदा तालुक्यात सर्वाधिक नुकसान पारगावात द्राक्ष उत्पादक शेतकºयांचे झाले आहे. त्यांना मदत करण्याचा प्रयत्न चालू आहे, असे तालुका कृषी अधिकारी पद्मनाथ म्हस्के यांनी सांगितले.      

टॅग्स :Shrigondaश्रीगोंदाRainपाऊस