शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
2
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
3
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
4
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
5
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
6
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
7
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
8
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
9
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
10
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
11
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
12
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
13
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
14
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
15
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
16
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
17
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
18
Operation Sindoor Live Updates: दिल्ली विमानतळाकडून प्रवाशांना मार्गदर्शक सूचना जारी
19
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
20
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video

जिल्ह्यातील १४ लाख लिटर दुधाची पावडर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:18 IST

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दुधाच्या मागणीत घट झाल्याने जिल्ह्यातील १४ लाख लिटर दूध भुकटी तयार करण्यासाठी ...

अहमदनगर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दुधाच्या मागणीत घट झाल्याने जिल्ह्यातील १४ लाख लिटर दूध भुकटी तयार करण्यासाठी पाठविले जात आहे. दुधाच्या मागणीत घट झाल्याने दरात ३ ते ५ रुपयांची घट झाली आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना बसत आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत दुधाच्या मागणीत प्रचंड घट झाली होती. कोरोनाची लाट ओसरत असतानाच कोरोनाने पुन्हा डोके वर काढले आहे. जिल्ह्यातील संकलित होणारे दूध मुंबई, पुणे, कल्याण, औरंगाबाद आदी जिल्ह्यांत पाठविले जाते; परंतु कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने ही शहरे सध्या बंद आहेत. त्यामुळे या शहरांना पाठविल्या जाणाऱ्या दुधाची मागणी घटली आहे. जिल्ह्यात दररोज २९ लाख लिटर दुधाचे संकलन होते. दुधाची मागणी घटल्याने यापैकी निम्मे म्हणजे १५ लाख लिटर दूध भुकटी तयार करण्यासाठी पाठविले जात आहे; परंतु दूध पावडरची मागणीही घटली असून, प्रतिकिलो २२० रुपये या दराने पावडर विकली जात आहे. त्यामुळे भुकटीसाठी प्रतिलिटर २७ ते २८ रुपयांनी दूध खरेदी करण्यात येत आहे.

...

असे दूध संकलन

सहकारी -७ लाख लिटर

खाजगी- २२ लाख लिटर

....

सहकारी दूध संकलन केंद्र-१५

खाजगी दूध संकलन केंद्र-३००

....

दुधाच्या मागणीत ३० टक्के घट

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन करण्यात आल्याने दुग्धजन्य पदार्थांची मागणी घटली आहे. उन्हाळ्यात दुग्धजन्य पदार्थांना चांगली मागणी असते. त्यामुळे दुधाला चांगला भाव मिळतो; परंतु मागील उन्हाळ्यात लॉकडाऊन होते. चालूवर्षीही उन्हाळ्यातच लॉकडाऊन करण्यात आले. त्यामुळे याही वर्षी दुधाच्या मागणीत ३० टक्के घट झाली असून, दुधाच्या मागणीत आणखी घट होण्याची शक्यता आहे.

....

प्रतिपूर्ती योजना गुंडाळली

शासनाने दुधाचे भाव पडल्याने प्रति लिटर ५ रुपये याप्रमाणे दूध उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिपूर्ती दिली जात होती; परंतु ही योजनाही सरकारने गुंडाळली असून, दूध उत्पादकांना आर्थिक मदत देण्याची मागणी पुढे येत आहे.

...

- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे दुधाच्या मागणीत २५ ते ३० टक्के इतकी घट झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील निम्मे म्हणजे १४ लाख लिटर दूध भुकटीसाठी पाठविले जात आहे.

- योगेश नागरे, जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी.