शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
4
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
5
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
6
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
7
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
8
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
9
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
10
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
11
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
12
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
13
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
14
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
15
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग
16
Nagpur Rains : अंदाज खरा ठरला ! मुसळधार पावसाने नागपूरकरांना झाेडपले; अजून किती दिवस असाच बरसणार?
17
Shalarth ID Scam : 'ते' ६३२ शिक्षक, मुख्याध्यापक तुरुंगात जाणार? शिक्षण क्षेत्रातील सर्वात माेठा घोटाळ्याची झाडाझडती सुरु
18
Video - "तीळ कुठे आहे हे Gemini ला कसं कळलं?"; तरुणीने सांगितला धक्कादायक अनुभव
19
Video: मोहम्मद युसूफने खालची पातळी गाठली! लाईव्ह टीव्हीवर सूर्यकुमारच्या नावाचा अभद्र उच्चार...
20
“चुकीच्या गोष्टी सुरू, खाडाखोड करून कुणबी नोंदी; रिपोर्ट मुख्यमंत्र्यांना देणार”: छगन भुजबळ

टंचाईतही १३ कोटी लीटर पाणीसाठा

By admin | Updated: May 6, 2016 18:40 IST

कर्जत : ऐन भीषण दुष्काळीस्थितीतही कर्जत येथे तेरा कोटी लीटर पाण्याचा साठा झाला आहे. ही किमया साधली आहे जलयुक्तशिवार अभियानातून.

कर्जत : ऐन भीषण दुष्काळीस्थितीतही कर्जत येथे तेरा कोटी लीटर पाण्याचा साठा झाला आहे. ही किमया साधली आहे जलयुक्तशिवार अभियानातून. या यशस्वी प्रयोगामुळे परिसरातील विहिरीतील पाणी पातळी वाढून बंद बोअर सुरु झाले आहेत. महात्मा फुले जलभूमी अभियानातून कर्जतलगतच्या कानवळा व लेंडी या दोन्ही नदी पात्रात जलयुक्त शिवार योजनेचे काम सुरू आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्या संकल्पनेतून हे काम दोन महिन्यांपासून सुरू आहे. या कामासाठी शासकीय मशिनरी कर्जतमध्ये प्रथमच उपलब्ध झाल्या आहेत. कर्जतची पूर्वेकडील नदी व पश्चिमेकडील नद्यांचे कर्जतच्या हद्दीपर्यंत खोलीकरण, सरळीकरण, गाळ काढणे, वेड्या बाभळी काढणे आदी कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. या कामामुळे नद्यांचे रूप पालटले आहे. या दोन्ही नद्यावर बंधारे आहेत. बंधाऱ्यातील पाण्याची साठवण क्षमता वाढली आहे. तसेच बंधाऱ्याची अपूर्ण कामे पूर्ण करुन नदीच्या दोन्ही बाजूने रस्ते तयार करण्यात आले आहेत.कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेव राऊत यांनी बंधाऱ्यात जलवाहिनी टाकून कुकडीचे पाणी सोडले व चौंडीला जाणाऱ्या कालव्यातून येथे पाणी आणले. बंधाऱ्यात पाणी सोडण्याचा हा प्रयोग यशस्वी झाला. कर्जतचा हा अनोखा पॅटर्न तयार करण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल कवडे, प्रांताधिकारी रवींद्र ठाकरे, तहसीलदार किरण सावंत, तालुका कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर यांनी विशेष परिश्रम घेतले.(तालुका प्रतिनिधी)जलयुक्त शिवारचे पालकमंत्र्यांनी मंजूर केलेले काम, वरिष्ठांनी सोपविलेली जबाबदारी व कर्जतकरांच्या या कामातून वाढलेल्या अपेक्षा यामुळे कृषिविभाग यशस्वी झाला. या कामाची फलश्रूती कर्जतकरांना दिसली हेच खरे समाधान आहे.-राजेंद्र सुपेकर, कृषि अधिकारी, कर्जत तालुकादोन्ही बंधाऱ्यात मिळून सुमारे तेरा कोटी लीटर पाण्याची साठवणूक झाली आहे. या यशस्वी प्रयोगामुळे परिसराचे रूपच पालटले आहे. या भागातील पाणी पातळी वाढली आहे. विहिरींना पाणी आले आहे तर बंद बोअरही सुरू होऊन सर्वसामान्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लागला आहे. ऐन उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची चिंता असताना या कामामुळे येथे कोट्यवधी लीटर पाणी साठले आहे.अनेक प्राण्यांचीही या गोदड नाथ सागराने तहान भागविली आहे. एकूणच झालेले काम व यामध्ये साठलेले पाणी पाहून कर्जतकर भारावून गेले आहेत.