शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर मग ऑपरेशन सिंदूर तरी कुठे चुकीचे होते?" मुनीर यांच्यावर पाकिस्तानी मौलानांचा कडाडून हल्ला
2
सुधीर मुनगंटीवारांनी 'राज्यभर दौरा गुंडाळला', भाजप नेत्यांसोबत आज चर्चा; ठाकरे बंधुबद्दलही बरंच बोलले
3
"माझाही फोटो आहे, सर्वांचेच...!"; एपस्टीन फाइल्सवर ट्रम्प स्पष्टच बोलले, बिल क्लिंटन यांच्यासंदर्भात काय म्हणाले?
4
WhatsApp: नव्या पद्धतीने हॅक जात आहे व्हॉट्सॲप, सरकारने दिला काळजी घेण्याचा सल्ला
5
बांगलादेशमधील दीपूच्या मृत्यूप्रकरणी दिल्लीत VHP चे निदर्शने; बांगलादेश परराष्ट्र मंत्रालयाने भारतीय उच्चायुक्तांना बोलावले
6
अखेर चीनने आयडिया चोरलीच! भारताच्या UPI सोबत स्पर्धा करण्यासाठी ॲप लाँच केले... 'Nihao China'
7
Video - हृदयद्रावक! डीजेवर नाचताना आक्रित घडलं, २३ वर्षीय तरुण खाली कोसळला अन्...
8
"तिथं मी बुलेटप्रूफ कारशिवाय बाहेर पडू शकत नाही!"; कारण... अफगाणिस्तान स्टार क्रिकेटर राशीद खानचा खुलासा
9
“१०० टक्के ठाकरे बंधूंना १०० जागा मिळतील, युतीची केवळ घोषणा बाकी, जागावाटप पूर्ण”: संजय राऊत
10
“काँग्रेसचा विषय नक्कीच संपलेला आहे, पण निकालानंतर गरज लागली तर…”; संजय राऊतांचे मोठे विधान
11
ठाकरे बंधुंमधील दादर, शिवडीचा तिढा अखेर सुटला, मोठ्या भावासाठी धाकट्याने घेतले झुकते माप
12
महापालिका निवडणूक २०२६ : प्रस्तावच नाही; काँग्रेस-'वंचित'ची युती होणार की नाही? गोंधळ कायम 
13
दीपूचंद्र दासच्या मित्रांनीच केली 'गद्दारी', मारणाऱ्या धर्मांध जमावातच झाले सामील अन्...! सामोर आलं धक्कादायक सत्य
14
खळबळजनक! सकाळी एन्काऊंटर, संध्याकाळी फरार; पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पळाला आरोपी
15
महाविकास आघाडी फुटणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, "...तर आम्ही इतर पर्यायांचा विचार करू"
16
पहाटे ५ ची वेळ, उर्फी जावेद घाबरलेल्या अवस्थेत पोलिस स्टेशनमध्ये पोहोचली; नक्की काय घडलं?
17
इंडिगो एअरलाइन्स मार्चनंतर तुर्कीकडून घेतलेली विमानांचे उड्डाण करणार नाही; DGCA ने दिला स्पष्ट नकार
18
सोलापुरात अजित पवारांचा भाजपाला धक्का! अतुल पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश
19
आठ कोटी, बारा पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
20
८ लाखांच्या गुंतवणुकीवर मिळवा ३,२८,००० रुपये फिक्स व्याज! ज्येष्ठ नागरिकांसाठी पोस्टाची 'खास' भेट
Daily Top 2Weekly Top 5

रब्बी हंगाम अडचणीत : टंचाईग्रस्त गावांना १२ टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: December 14, 2015 20:51 IST

पाणी टंचाईमुळे कर्जत तालुक्यातील कुळधरण, करमनवाडी भागातील ज्वारीची पिके जळू लागली आहेत. त्यामुळे या पिकांना जीवदान मिळण्यासाठी अजूनही कुकडीचे आवर्तन सोडावे

पाणी टंचाई शेवगावमध्ये पाणी टंचाईचे संकट गडद शेतीचे अर्थकारण कोलमडलेपाणी टंचाईमुळे कर्जत तालुक्यातील कुळधरण, करमनवाडी भागातील ज्वारीची पिके जळू लागली आहेत. त्यामुळे या पिकांना जीवदान मिळण्यासाठी अजूनही कुकडीचे आवर्तन सोडावे, अशी मागणी होत आहे. शेवगाव : ऐन हिवाळय़ात शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट गडद बनत आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी तहानलेल्या गावांमधून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने मात्र मुळा धरणाचे पाणी सुटल्याने टँकरची मागणी असलेल्या गावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविल्याने नागरिकांमधून नाराजी तसेच संतापाचा सूर व्यक्त होत आहे.तालुक्यातील १३ गावे व ४९ वाड्या- वस्त्यांना १२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तालुक्यातील निंबेनांदूर, ढोरजळगाव शे, जोहरापूर, सामनगाव, लोळेगाव, ठाकूर निमगाव, भातकुडगाव, खामपिंप्री नवी, खामपिंप्री जुनी अशा गावातून गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट अधिक गडद बनत आहे. प्रशासनाने मात्र मुळा पाटपाण्याचे रोटेशन सुटल्याने वरील टंचाईग्रस्त गावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने सध्या टँकर सुरू करण्याची आवश्यकता नसल्याचा अभिप्राय वरिष्ठ स्तरावर सादर केल्याने संबंधितांच्या कामकाज पद्धतीबाबत टंचाईग्रस्त गावातील नागरिकांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर येथील जाणापूर, बोरबंद, चेकेवस्ती, दलित वस्ती, बडे वस्ती व बुधवंत वस्ती परिसरात पाणी टंचाईचे सावट कायम असल्याने प्रशासनाच्या पातळीवरुन ४ खेपा सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या टंचाई शाखेतून सांगण्यात आली. इतर प्रस्तावाबाबत वास्तविक मुळा पाटपाण्याचे रोटेशन 'टेल टू हेड' या पद्धतीने करण्याची मागणी असताना संबंधितांनी ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे पाटपाण्याच्या लाभापासून कायम वंचित असलेल्या परिसराला यंदाही पाटपाण्याचा लाभ मिळाला नाही. ही वस्तुस्थिती असल्याने पाणी टंचाईच्या परिस्थितीची वरिष्ठांनी पाहणी करून तातडीने टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी) ■ अत्यल्प पावसामुळे लागोपाठ चौथ्या वर्षी तालुक्यात खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. त्यामुळे शेतकर्‍यांना रब्बी हंगामाची आशा लागली होती. मात्र, पावसाने निराशा केल्याने रब्बी हंगामही अडचणीच्या विळख्यात सापडल्याने शेती व शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडून पडले. त्यामुळे कमी पावसावर येणार्‍या कांदा लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असून, तालुक्यात तीन ते साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड झाल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयातून सांगण्यात आली. मध्यंतरी कांदा अडीच ते तीन हजारापर्यंत गेला होता. मात्र सध्या कांद्याचे भाव बाराशे ते पंधराशे पर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. तालुक्यात ज्वारीचे २७ ते २८ हजार तर हरभर्‍याचे ८ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र असून, ज्वारीवर चिकटा तर हरभर्‍यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.