शहरं
Join us  
Trending Stories
1
Assembly Bypoll Result 2025: पोटनिवडणुकांचे निकाल! गुजरातमध्ये एका जागेवर आप भाजपाला टक्कर देतेय; पंजाबमध्ये संजीव अरोरा आघाडीवर
2
नितीशकुमारांची सत्ता धोक्यात? नव्या सर्व्हेतून धक्कादायक 'लाट'; बिहार निवडणुकीपूर्वीच....
3
Maharashtra Politics : ठाकरे गटाला आणखी एक धक्का बसणार, भास्कर जाधव मोठा निर्णय घेणार?, संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं
4
भारतासोबतच्या सिंधू जल करार वादात OIC ची एन्ट्री; ५७ इस्लामिक देशांचा पाकिस्तानच्या सूरात सूर
5
युनूस यांची खेळी, भारताविरोधी षडयंत्र; बांगलादेशात पाकिस्तानी ISI हस्तकाला मोठी जबाबदारी
6
जगभर: डोनाल्ड ट्रम्प याची 'दादागिरी', अमेरिकेत भारतीय प्राध्यापकांनाही ‘बंदी’!
7
"भारताकडे केवळ २ पर्याय आहेत..."; शाहांच्या विधानानंतर पाकिस्तानचा थयथयाट, थेट युद्धाची धमकी
8
पुण्याच्या नळ स्टॉप स्टेशनवरुन पकडली मेट्रो, प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्याला ओळखलंत का?
9
"अमेरिका भूतकाळातून काही शिकली नाही, बळाद्वारे शांतता प्रस्थापित होत नाही’’, इराणवरील हल्ल्यावरून रशिया,चीनचा टोला
10
Iran Israel War: इराण-इस्रायल युद्धाचा परिणाम नोकऱ्यांवरही, कंपन्यांमध्ये भरती प्रक्रिया थांबली; कर्मचारीही चिंतेत
11
Shiv Sena UBT: मराठवाड्यात उद्धव ठाकरेंना मोठा झटका, मोठ्या नेत्याने सोडली साथ!
12
Lalit Upadhyay: भारतासाठी दोन ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या खेळाडूची तडकाफडकी निवृत्ती!
13
पहिल्या कसोटीत इंग्लंडला एवढ्या धावांचं आव्हान दिल्यास भारताचा विजय निश्चित, असं आहे समीकरण 
14
राज्याचा दर्जा न दिल्यास सर्वोच्च न्यायालयात जाणार; फारुक अब्दुल्ला यांचा केंद्र सरकारला इशारा
15
महागाईचा काळ... बँक FD चे कमी व्याजदर! 'या' ५ सरकारी योजना तुमचं नशीब बदलतील, वाचा संपूर्ण माहिती
16
रॅलीमध्ये कारखाली चिरडून एकाचा मृत्यू; जगन मोहन रेड्डींविरोधात गुन्हा दाखल
17
डोईवर विठुमाऊली अन् वारकऱ्यांसह फुगडी; पंढरीच्या वारीतून मराठमोळ्या अभिनेत्रीने शेअर केला व्हिडिओ
18
"रावणाच्या तारखा माझ्यापेक्षा जास्त...", जयदीप अहलावतने दिला 'रामायण'ला नकार
19
परीक्षेत कमी गुण मिळाले, जाब विचारताच उलट बोलली, वडिलांकडून मुलीला बेदम मारहाण, तडफडून मृत्यू, सांगलीतील धक्कादायक घटना 
20
Video: चालत्या ट्रेनमध्ये मारहाण अन् चोरीचा प्रयत्न; अभिनेत्रीसोबत घडली धक्कादायक घटना

रब्बी हंगाम अडचणीत : टंचाईग्रस्त गावांना १२ टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: December 14, 2015 20:51 IST

पाणी टंचाईमुळे कर्जत तालुक्यातील कुळधरण, करमनवाडी भागातील ज्वारीची पिके जळू लागली आहेत. त्यामुळे या पिकांना जीवदान मिळण्यासाठी अजूनही कुकडीचे आवर्तन सोडावे

पाणी टंचाई शेवगावमध्ये पाणी टंचाईचे संकट गडद शेतीचे अर्थकारण कोलमडलेपाणी टंचाईमुळे कर्जत तालुक्यातील कुळधरण, करमनवाडी भागातील ज्वारीची पिके जळू लागली आहेत. त्यामुळे या पिकांना जीवदान मिळण्यासाठी अजूनही कुकडीचे आवर्तन सोडावे, अशी मागणी होत आहे. शेवगाव : ऐन हिवाळय़ात शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट गडद बनत आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी तहानलेल्या गावांमधून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने मात्र मुळा धरणाचे पाणी सुटल्याने टँकरची मागणी असलेल्या गावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविल्याने नागरिकांमधून नाराजी तसेच संतापाचा सूर व्यक्त होत आहे.तालुक्यातील १३ गावे व ४९ वाड्या- वस्त्यांना १२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तालुक्यातील निंबेनांदूर, ढोरजळगाव शे, जोहरापूर, सामनगाव, लोळेगाव, ठाकूर निमगाव, भातकुडगाव, खामपिंप्री नवी, खामपिंप्री जुनी अशा गावातून गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट अधिक गडद बनत आहे. प्रशासनाने मात्र मुळा पाटपाण्याचे रोटेशन सुटल्याने वरील टंचाईग्रस्त गावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने सध्या टँकर सुरू करण्याची आवश्यकता नसल्याचा अभिप्राय वरिष्ठ स्तरावर सादर केल्याने संबंधितांच्या कामकाज पद्धतीबाबत टंचाईग्रस्त गावातील नागरिकांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर येथील जाणापूर, बोरबंद, चेकेवस्ती, दलित वस्ती, बडे वस्ती व बुधवंत वस्ती परिसरात पाणी टंचाईचे सावट कायम असल्याने प्रशासनाच्या पातळीवरुन ४ खेपा सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या टंचाई शाखेतून सांगण्यात आली. इतर प्रस्तावाबाबत वास्तविक मुळा पाटपाण्याचे रोटेशन 'टेल टू हेड' या पद्धतीने करण्याची मागणी असताना संबंधितांनी ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे पाटपाण्याच्या लाभापासून कायम वंचित असलेल्या परिसराला यंदाही पाटपाण्याचा लाभ मिळाला नाही. ही वस्तुस्थिती असल्याने पाणी टंचाईच्या परिस्थितीची वरिष्ठांनी पाहणी करून तातडीने टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी) ■ अत्यल्प पावसामुळे लागोपाठ चौथ्या वर्षी तालुक्यात खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. त्यामुळे शेतकर्‍यांना रब्बी हंगामाची आशा लागली होती. मात्र, पावसाने निराशा केल्याने रब्बी हंगामही अडचणीच्या विळख्यात सापडल्याने शेती व शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडून पडले. त्यामुळे कमी पावसावर येणार्‍या कांदा लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असून, तालुक्यात तीन ते साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड झाल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयातून सांगण्यात आली. मध्यंतरी कांदा अडीच ते तीन हजारापर्यंत गेला होता. मात्र सध्या कांद्याचे भाव बाराशे ते पंधराशे पर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. तालुक्यात ज्वारीचे २७ ते २८ हजार तर हरभर्‍याचे ८ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र असून, ज्वारीवर चिकटा तर हरभर्‍यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.