शहरं
Join us  
Trending Stories
1
LGEC 2025: 'लाडकी बहीण' योजनेमुळे महाराष्ट्रातील अर्थव्यवस्थेला चालनाच मिळाली; सुनील तटकरेंनी समजावलं 'गणित'
2
Donald Trump : डोनाल्ड ट्रम्प यांनी पाकिस्तानला जवळ केले! पण अमेरिकी कंपन्यांसाठी धोक्याची घंटा ठरणार
3
भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्तांना संविधानाचं 'सुरक्षा कवच'; पदावरून हटवणं इतकं सोपं नाही, कारण...
4
संतापजनक! 23 वर्षीय तरुणीवर अनेक वेळा बलात्कार, सराफा व्यावसायिकाने व्हिडीओही बनवले
5
Mumbai Rain : हवामान विभागाकडून मुंबईला अतिसतर्कतेचा इशारा; मंगळवारी शाळांना सुट्टी जाहीर
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बोलावली महत्त्वाची बैठक; ७ केंद्रीय मंत्री राहणार उपस्थित
7
ज्याने ओळखले त्याला १०० तोफांची सलामी! हर्ष गोएंकांनी खाल्लेल्या टोस्टचा तुकडा शेअर केला...
8
अ‍ॅप्पलने मोठी डील केली...! २.७ लाख स्के. फुटांचे ऑफिस भाडेतत्वावर घेतले, १०१८ कोटी मोजणार... 
9
Amreen Kaur Vikramaditya Singh: कोण आहेत अमरीन कौर ज्यांच्यासोबत मंत्री विक्रमादित्य सिंह करणार लग्न?
10
राष्ट्राध्यक्ष पुतिन यांचा PM मोदींना फोन; अलास्कामध्ये ट्रम्प यांच्याशी झालेल्या चर्चेची दिली माहिती
11
शिंदेंची साथ सोडून अजित पवारांकडे...हेमलता पाटील यांच्या पक्षप्रवेशाची तारीख ठरली
12
दुसरीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा शाळेच्या वसतिगृहात सापडला मृतदेह, पोलिसांनी काय सांगितले?
13
मेट्रोमधून सामान नेण्यासाठी पैसे लागणार; एका बॅगेसाठी ३० रुपये...; तिकीट नाही काढले तर...
14
बंगाली स्थलांतरितांनी घरी परतावं, दरमहिना ५ हजार देऊ; CM ममता बॅनर्जी यांची मोठी घोषणा
15
Thane Rain Alert: ठाण्याला अतिवृष्टीचा इशारा; महापालिकेने शाळा-महाविद्यालयांबद्दल घेतला निर्णय
16
वाल्मीक कराडच्या वकिलाने १ तास ४५ मिनिटे युक्तीवाद केला; उज्ज्वल निकम म्हणतात...
17
Airtel Down! कॉल आणि इंटरनेटवर परिणाम; हजारो युजर्सनी नोंदवल्या तक्रारी
18
आता Zepto वर १० मिनिटांत मिळणार प्लॉट? 'या' रिअल इस्टेट कंपनीसोबत केला मोठा करार
19
'वरण भात म्हणजे गरिबांचं जेवण', विवेक अग्निहोत्रींच्या वक्तव्यावर मराठी अभिनेत्रीचा संताप
20
प्रीमियम लक्झरीमध्ये 'स्पोर्टी' टच! टोयोटा कॅमरीची नवीन 'स्प्रिंट एडिशन' भारतात लॉन्च

रब्बी हंगाम अडचणीत : टंचाईग्रस्त गावांना १२ टँकरने पाणी पुरवठा

By admin | Updated: December 14, 2015 20:51 IST

पाणी टंचाईमुळे कर्जत तालुक्यातील कुळधरण, करमनवाडी भागातील ज्वारीची पिके जळू लागली आहेत. त्यामुळे या पिकांना जीवदान मिळण्यासाठी अजूनही कुकडीचे आवर्तन सोडावे

पाणी टंचाई शेवगावमध्ये पाणी टंचाईचे संकट गडद शेतीचे अर्थकारण कोलमडलेपाणी टंचाईमुळे कर्जत तालुक्यातील कुळधरण, करमनवाडी भागातील ज्वारीची पिके जळू लागली आहेत. त्यामुळे या पिकांना जीवदान मिळण्यासाठी अजूनही कुकडीचे आवर्तन सोडावे, अशी मागणी होत आहे. शेवगाव : ऐन हिवाळय़ात शेवगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट गडद बनत आहे. टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्याची मागणी तहानलेल्या गावांमधून जोर धरू लागली आहे. प्रशासनाने मात्र मुळा धरणाचे पाणी सुटल्याने टँकरची मागणी असलेल्या गावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविल्याने नागरिकांमधून नाराजी तसेच संतापाचा सूर व्यक्त होत आहे.तालुक्यातील १३ गावे व ४९ वाड्या- वस्त्यांना १२ टँकरद्वारे पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरू आहे. तालुक्यातील निंबेनांदूर, ढोरजळगाव शे, जोहरापूर, सामनगाव, लोळेगाव, ठाकूर निमगाव, भातकुडगाव, खामपिंप्री नवी, खामपिंप्री जुनी अशा गावातून गेल्या काही दिवसांपासून पिण्याच्या पाण्याच्या टंचाईचे संकट अधिक गडद बनत आहे. प्रशासनाने मात्र मुळा पाटपाण्याचे रोटेशन सुटल्याने वरील टंचाईग्रस्त गावात काही प्रमाणात पाणी उपलब्ध झाल्याने सध्या टँकर सुरू करण्याची आवश्यकता नसल्याचा अभिप्राय वरिष्ठ स्तरावर सादर केल्याने संबंधितांच्या कामकाज पद्धतीबाबत टंचाईग्रस्त गावातील नागरिकांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे.शेवगाव तालुक्यातील निंबेनांदूर येथील जाणापूर, बोरबंद, चेकेवस्ती, दलित वस्ती, बडे वस्ती व बुधवंत वस्ती परिसरात पाणी टंचाईचे सावट कायम असल्याने प्रशासनाच्या पातळीवरुन ४ खेपा सुरू करण्याचा प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्याची माहिती पंचायत समितीच्या टंचाई शाखेतून सांगण्यात आली. इतर प्रस्तावाबाबत वास्तविक मुळा पाटपाण्याचे रोटेशन 'टेल टू हेड' या पद्धतीने करण्याची मागणी असताना संबंधितांनी ही मागणी मान्य केली नाही. त्यामुळे पाटपाण्याच्या लाभापासून कायम वंचित असलेल्या परिसराला यंदाही पाटपाण्याचा लाभ मिळाला नाही. ही वस्तुस्थिती असल्याने पाणी टंचाईच्या परिस्थितीची वरिष्ठांनी पाहणी करून तातडीने टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव मंजूर करण्याची मागणी होत आहे. (तालुका प्रतिनिधी) ■ अत्यल्प पावसामुळे लागोपाठ चौथ्या वर्षी तालुक्यात खरीप हंगाम पूर्णपणे वाया गेला. त्यामुळे शेतकर्‍यांना रब्बी हंगामाची आशा लागली होती. मात्र, पावसाने निराशा केल्याने रब्बी हंगामही अडचणीच्या विळख्यात सापडल्याने शेती व शेतकर्‍यांचे अर्थकारण कोलमडून पडले. त्यामुळे कमी पावसावर येणार्‍या कांदा लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला असून, तालुक्यात तीन ते साडेतीन हजार हेक्टर क्षेत्रात कांद्याची लागवड झाल्याची माहिती तालुका कृषी कार्यालयातून सांगण्यात आली. मध्यंतरी कांदा अडीच ते तीन हजारापर्यंत गेला होता. मात्र सध्या कांद्याचे भाव बाराशे ते पंधराशे पर्यंत खाली आल्याने कांदा उत्पादक शेतकर्‍यांतून नाराजीचा सूर व्यक्त होत आहे. तालुक्यात ज्वारीचे २७ ते २८ हजार तर हरभर्‍याचे ८ हजार हेक्टरपर्यंत क्षेत्र असून, ज्वारीवर चिकटा तर हरभर्‍यावर घाटेअळीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकर्‍यांच्या चिंतेत अधिक भर पडली आहे.