शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०२७मध्ये गोव्यात ‘आप’ स्वबळावर सरकार स्थापन करेल”: अरविंद केजरीवाल; भाजपा-काँग्रेसवर टीका
2
आणखी एका मुलीने गमावला जीव, मृतांचा आकडा १० वर; काँग्रेसची ५० लाख भरपाई देण्याची मागणी
3
...तर रोहित-विराटवर वनडे वर्ल्ड कप स्पर्धेआधीच निवृत्ती घेण्याची वेळ येणार?
4
बिहारमध्ये लालू यादवांच्या निवासस्थांनी उमेदवारीवरून गोंधळ, घरात घुसले कार्यकर्ते, म्हणाले, आम्हाला...  
5
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
6
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
7
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
8
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
9
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
10
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
11
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
12
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
13
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
14
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
15
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
16
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
17
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
18
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
19
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
20
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले

जिल्ह्यात दहावीचा निकाल ९५.२७ टक्के; यंदाही मुलींनीच मारली बाजी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2024 16:27 IST

पारनेर तालुका अव्वल, ३४२ शाळांचा शंभर टक्के निकाल.

प्रशांत शिंदे, अहमदनगर :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी परीक्षेचा निकाल आज जाहीर केला आहे. जिल्ह्याचा दहावीचा यंदाचा एकूण निकाल ९५.२७ टक्के इतका लागला आहे. यंदाच्या निकालामध्ये पारनेर, जामखेड, श्रीगोंदा आणि अकोले तालुक्यांनी बाजी मारली आहे. श्रीरामपूर ९२.५२ टक्क्यांसह जिल्ह्यात तालुकानिहाय टक्केवारीनुसार सर्वात खाली आहे. तर निकालांमध्ये पुन्हा एकदा मुलींनी बाजी मारली आहे. 

मुलींचा निकाल ९७.०१ टक्के तर मुलांचा निकाल ९३.८५ टक्के लागला आहे. आकडेवारीनुसार, सर्वच तालुक्यांमध्ये मुलींनी बाजी मारली आहे.

जिल्ह्यातून मार्च २०२४ च्या परीक्षेसाठी ६७ हजार ९७० विद्यार्थी बसले होते. यामध्ये ३७ हजार ३९३ मुले तर ३० हजार ५७७ मुली होत्या. यापैकी ६४ हजार ७६१ विद्यार्थी पास झाले आहेत. यामध्ये ३५ हजार ९७ मुले तर २९ हजार ६६४ मुली आहेत. 

३४२ शाळांचा शंभर टक्के निकाल-

जिल्ह्यात ३४२ शाळांचा शंभर टक्के निकाल लागला आहे. यामध्ये नगर - ४८, अकोले - ४६, संगमनेर- ४१, पारनेर - ३५, श्रीगोंदा - २५, पाथर्डी - २६, नेवासा - २२, राहुरी - १७, श्रीरामपूर -१७, राहाता- १६, कोपरगाव- १६, कर्जत - १६, शेवगाव- १०, जामखेड - ७ 

गतवर्षी पेक्षा टक्केवारी वाढली-

गतवर्षी जिल्ह्याचा निकाल ९४.४८ टक्के लागला होता. यामध्ये देखील मुलींनीच बाजी मारली होती. मुलांचा निकाल ९२.७९ तर मुलींचा निकाल ९६.६२ टक्के लागला होता. मागील वर्षी श्रीगोंदा तालुक्याचा सर्वाधिक निकाल लागला होता. तर जिल्ह्यात २७६ शाळांचा निकाल शंभर टक्के लागला होता. 

तालुकानिहाय निकाल-

तालुका - निकालपारनेर -  ९६.५३जामखेड - ९६.५०श्रीगोंदा - ९६.४२अकोले - ९६.३६कर्जत - ९५.९९कोपरगाव - ९४.३३नगर -  ९५.३३नेवासा - ९५.७३पाथर्डी - ९५.७३राहाता - ९४.४३राहुरी - ९३.२३संगमनेर - ९५.६०शेवगाव - ९५.८९श्रीरामपूर - ९२.५२

टॅग्स :AhmednagarअहमदनगरSSC Resultदहावीचा निकाल