शहरं
Join us  
Trending Stories
1
ना ठराव, ना निर्णय! भारताच्या गैरहजेरीतही UNSC बैठकीत पाकिस्तानची 'अशी' झाली फजिती
2
"युद्ध झालं तर आम्ही भारताला साथ देऊ..."; पाकिस्तानच्या मशिदीत मौलानाची घोषणा
3
"विराटचे चाहते त्याच्यापेक्षा मोठे जोकर", राहुल वैद्यने कोहलीला मारला टोमणा; नक्की झालं काय?
4
भारताविरोधात आणखी एक इस्लामिक देश पाकच्या मदतीला धावला; कराचीला पाठवली युद्धनौका
5
PNB मध्ये १ लाख रुपये जमा करा, मिळेल ₹१६,२५० चं फिक्स व्याज; पटापट चेक करा स्कीम डिटेल्स
6
भारत-पाकिस्तान तणावावर UNSC बैठकीत काय चर्चा झाली?; पाक म्हणतं, "जे पाहिजे ते मिळाले..." 
7
भाजपच्या माजी खासदारावर प्राणघातक हल्ला, कार्यकर्त्यांनी घरात लपवल्यामुळे वाचला जीव
8
Stock Market Today: शेअर बाजाराचं फ्लॅट ओपनिंग, १११ अंकांच्या तेजीसह उघडला सेन्सेक्स; फार्मा-रियल्टी शेअर्स आपटले
9
पाकिस्तानसोबत युद्ध झाले तर मी पीएम फंडला ११ लाख देणार; 'या' व्यावसायिकाने केली मोठी घोषणा
10
या Mother's Day ला साडी-सोनं नको, आईला द्या इन्व्हेस्टमेंटचं बेस्ट गिफ्ट; भविष्य होईल सुरक्षित, मिळेल मोठं रिटर्न
11
महिला सेक्स अ‍ॅडिक्ट असली तरी...; निर्दोष सुटलेल्या आरोपीला सात वर्षांची शिक्षा, अलाहाबाद हायकोर्टाचा निकाल
12
Crime News : धक्कादायक! पत्नीचा मृतदेह दुचाकीवर घेऊन फिरत होता, पतीला पोलिसांनी अटक केली
13
Met Gala 2025: कियाराच्या बेबी बंप डेब्यूपासून शाहरूखच्या सिग्नेचर पोझपर्यंत, मेट गालामध्ये झळकले हे कलाकार
14
पाकिस्तान घाबरला! 'भारत नियंत्रण रेषेजवळ कधीही हल्ला करू शकतो', पाकिस्तानचे संरक्षण मंत्री चिंतेत
15
'ब्लॅकआऊट' म्हणजे काय?; १९७१ नंतर देशात पहिल्यांदाच युद्धजन्य परिस्थितीचे संकेत
16
India Pakistan: पाकिस्तानच्या सीमेवर कुरापती सुरूच; सलग १२व्या दिवशी गोळीबार
17
India-Pakistan War: उद्या देशात युद्धसज्जतेचा ‘मॉक ड्रिल’; सायरन, नागरिकांच्या बचावाचा सराव 
18
उद्या देशभरात 'सिव्हिल डिफेंस मॉक ड्रिल' होणार, राज्यांकडून अहवाल मागवले
19
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: नोकरीत बढती मिळेल; अचानक आर्थिक फायदा होईल
20
बारावीचा निकाल घसरला, यंदाही मुलींचाच डंका; कोकणची बाजी, लातूर पॅटर्न माघारला

तैसी चिंता अपार वाढविती निरंतर ..!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 30, 2019 15:51 IST

विषय प्राप्त न झाला तर प्राप्तीची चिंता, प्राप्त झाला तर रक्षणाची चिंता निर्माण होते.

- ह.भ.प. भरतबुवा रामदासी (बीड)

जगात प्रत्येक मानव प्राणी हा सतत चिंताग्रस्त असतो. सुखात असो की दुःखात, चिंता ही माणसाचा पाठलाग कधीच सोडत नाही. आपण म्हणाल, चिंता म्हणजे तरी काय.? जी वस्तू आपणाजवळ नसेल त्या वस्तूची प्राप्ती झाली नाही तर, अंतरंगात जी वृत्ती निर्माण होते तिला चिंता असे म्हणतात. सज्जनहो.! चिंता ही एक मानसिक विकृती आहे. विषय प्राप्त न झाला तर प्राप्तीची चिंता, प्राप्त झाला तर रक्षणाची चिंता निर्माण होते. चिंता या विकृतीला पूर्ण विराम कधीच नाही. अमर्याद विषयोपभोगाने ती सतत वाढत जाते.

संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -या चि एका आयती तयाचिया कर्म प्रवृत्तीआणि जिणयाहि परौती वाहवी चिंतातैसी चिंता अपार वाढविती निरंतरजीवी सुनी असार विषयादिक

चिंतेचे साधारण दोन प्रकार आहेत.1)सांसारिक चिंता व2)अध्यात्मिक चिंता 

संसारातील चिंता ही ज्याचे त्यालाच निवारण करावी लागते. निवारण झाली तरी ती परत निर्माण होणारच नाही याची खात्री देता येत नाही. अध्यात्मिक चिंता मात्र संतकृपेने किंवा सद्गुरुकृपेने निवारण होते व परत चिंता शिल्लक राहातच नाही. खरं तर परमेश्वराचा निस्सीम भक्त कधी ऐहिक चिंताच करत नाही कारण विषयोपभोगाची प्राप्ती ही इच्छेवर अवलंबून नसून ती आपल्या पूर्वकर्मानुसार अवलंबून असते, याची जाणीव हरिभक्ताला असते. त्यामुळे तो विषयोपभोगाच्या संदर्भात उदासीन असतो.

तुकाराम महाराज म्हणतात -ठेविले अनंते तैसेची राहावे चित्ती असू द्यावे समाधान 

हीच त्याची मनोवृत्ती असते. हरिभक्ताच्या चिंतनाचा, प्रेमाचा, विषयच भगवंत असल्यामुळे ऐहिक विषयांचे चिंतन करण्यास त्यास वेळ कुठे असतो..?  भक्ताची ही अनन्यता, निष्ठा, भाव, बघून परमेश्वर इतका संतुष्ट होतो की त्याची संसारिक जबाबदारी देखील देवालाच पार पाडावी लागते मात्र अनन्य भक्त असेल तरच हे घडणे शक्य आहे.

तुकोबा म्हणाले -

माझी सर्व चिंता आहे विठोबासीमी त्याच्या पायाशी न विसंबे

साम्राज्यज्ञान चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराज म्हणतात -

पै सर्व भावेसी उखिते जो वोपिले मज चित्तेजैसा गर्भ गोळु उद्यमाते कोणाही नेणे

ज्याप्रमाणे आईच्या गर्भातील मूल सर्वार्थाने आईशी अनन्य असते. किंवा पतिव्रता स्त्री पतीशी अनन्य असते. सूर्याची किरणें जशी सूर्याशी अनन्य असतात. तितका भक्त जर देवाशी अनन्य असेल तर

मागे पुढे उभा राहे संभाळीत आलिया आघात निवाराया 

संतश्रेष्ठ तुकाराम महाराज बहारीचे वर्णन करतात. सर्वसामान्यपणे माणसाला अन्न, वस्त्र, निवारा याचीच सदैव चिंता असते परंतु जगाचा पालनकर्ता आपल्या जवळ असतांना तो भक्ताची उपेक्षा करील का...? 

तुकाराम महाराज म्हणतात -पाषाणाचे पोटी बैसला दर्दुर

तया मुखी चारा कोण घाली

पक्षी अजगर न करी संचय

तयासी अनंत प्रतिपाळीपरमात्मा षड्गुणऐश्वर्य संपन्न असल्यामुळे भक्ताच्या इच्छा पूर्ण करणे त्याला अशक्य नाही त्याने सुदाम देवाला सुवर्णनगरी देऊन त्याचे दारिद्र्य दूर केले. उपमन्यूस क्षीरसागर दिला. द्रौपदीची लज्जा रक्षण केली. कबीराचे शेले विणले. ज्या ज्या वेळी भक्तावर संकटे आली त्या वेळी भक्ताला संकटातून चिंतामुक्त केल्याच्या कथा पुराणात आहेत मग आपण कशाला उगाच चिंता करत बसावे..? चिंता न करणारे प्राणी सुखात जीवन जगतात ना..? 

भगवान तुलसीदास स्वामी अतिशय बहारीचे वर्णन करतात -

तुलसी मुरदें को देत है कपडा लकडी आगजिता रहकर सोस खरे सो नर बडे अभाग

निर्जीव प्रेताला देखील वेळेवर कपडा, लाकूड व अग्नी इत्यादि साहित्य देव देतो मग माणसाला जगण्याएवढे देणार नाही का.? फक्त अनन्य भक्त होता आले पाहिजे. एवढी अनन्य भक्ती साधली की माऊली वर्णन करतात -

ते एकवटुनि जिये क्षणी अनुसरले गा माझिये वाहणी तेव्हाचि तयाचि चिंतवणी मजचि पडली

म्हणोनि गा भक्ता नाही एकही चिंतातयाते मी समुध्दर्ता आथी मी सदा

( लेखक हे राष्ट्रीय कीर्तनकार आहेत; त्यांचा संपर्क क्रमांक 8329878467 ) 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक