शहरं
Join us  
Trending Stories
1
गुप्तचर यंत्रणेतील त्रुटी; पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत सरकारने मान्य केली चूक, म्हणाले...
2
"पहलगाम दहशतवादी हल्यामागे पाक असेल तर..."; पाकिस्तानच्या उलट्या बोंबा, मंत्री इशाक डार म्हणाले...
3
"आक्रमण...!" पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी आकाश दणाणलं, काय घडणार?
4
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
5
"...तर अर्जुन तेंडुलकर क्रिकेटमधला पुढचा ख्रिस गेल बनेल"; युवराज सिंगच्या वडिलांची मोठी भविष्यवाणी
6
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
7
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
8
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
9
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
10
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
11
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
12
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
13
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
14
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
15
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
16
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
17
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
18
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
19
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
20
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!

तुमचं अध्यात्म हे २४ तास ‘ऑन’ असलं पाहिजे, म्हणजे काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2020 03:12 IST

लोकांची समस्या ही आहे की, त्यांना नेहमी त्यांच्या आयुष्यात काहीतरी विलक्षण, उत्तम असं घडावं अशी इच्छा असते.

-सद्गुरू जग्गी वासुदेवएकदा काही विद्यार्थी कुठल्यातरी सामाजिक कामासाठी वर्गणी गोळा करता करता गल्लीतल्या एका घराजवळ पोहोचले. त्यांनी दारावर टकटक केली. एका ऐंशी वर्षांच्या आजीने दार उघडलं. आजीने त्यांना आत बोलावलं. विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या सामाजिक कार्याची माहिती दिली. त्यांनी आजींना या कार्याला त्या वेगवेगळ््याप्रकारे कशी मदत करू शकतात, हे समजावून सांगितलं आणि मग ते आजींना म्हणाले, ‘तुम्ही सगळी रक्कम लगेच द्यायचीही गरज नाही, तुम्ही तीन वर्षांचा वायदा करू शकता.’ आजी म्हणाल्या, ‘मी या वयात आता कच्ची फळंसुद्धा पिकल्यावर खाईन म्हणून घेत नाही. तीन वर्षांचा वायदा तर शक्यच नाही.’ अध्यात्म मार्गाच्या प्रवाशांनीही असंच असलं पाहिजे. तुम्ही कच्ची केळीसुद्धा विकत घ्यायला कचरलं पाहिजे, तुम्हाला घाई असायलाच हवी! लोकांची समस्या ही आहे की, त्यांना नेहमी त्यांच्या आयुष्यात काहीतरी विलक्षण, उत्तम असं घडावं अशी इच्छा असते. यासाठी सातत्य लागतं, मग प्रगतीही सातत्याने होत जाते व मग काही कालावधीतच तुम्हाला स्वत:मध्ये लक्षणीय फरक जाणवेल. तुम्ही सातत्य मात्र राखलं पाहिजे. तुमचं अध्यात्म हे २४ तास ‘आॅन’ असलं पाहिजे. म्हणजे काय? म्हणजे मी कामावर जायचं नाही का? कुटुंबाबरोबर राहायचं नाही का? तर तुम्ही सर्वकाही एक आध्यात्मिक प्रक्रिया बनायचंय. लोकांशी बोलताना, आॅफिसमध्ये काम करताना, प्रत्येक कृती, तुम्ही घेत असलेला प्रत्येक श्वास हे सर्व काहीएक आध्यात्मिक प्रक्रिया बनली पाहिजे. मग तुम्ही पाहाल की, काही महिन्यांतच तुम्ही एका वेगळ््या विश्वात असाल, जिथे तुमच्या अस्तित्वाचा सुगंध सर्वांनाच आनंद देईल. फक्त लोकच नव्हे, तर इतर जीवसृष्टीसुद्धा. अगदी प्राणिमात्र आणि वनस्पतीही तुम्हाला अप्रतिम प्रतिसाद देतील. तुम्ही फक्त सातत्य राखायला हवं. तुम्ही जर आॅन- आॅफ, आॅन-आॅफ असे करत राहिलात, तर मात्र यासाठी अनेक जन्म लागतील.