शहरं
Join us  
Trending Stories
1
अहमदाबाद विमान अपघात एक गूढच राहणार? ब्लॅक बॉक्समधून माहिती मिळेना; अमेरिकेला पाठवणार
2
नोबेलच्या शिफारशीबदल्यात लंच! मोठं स्वप्न बघतायत डोनाल्ड ट्रम्प; व्हाइट हाऊसनं आसिम मुनीरला आमंत्रण का दिलं? बिंग फुटलं
3
ट्रम्प यांच्या इशाऱ्यानंतरही इराणनं केली हल्ल्याची तयारी; आता अमेरिकाही युद्धात उतरणार?
4
"आधी युक्रेनसोबतचा तुमचा वाद निस्तरा, मग…’’, मध्य पूर्वेची चिंता करणाऱ्या पुतीन ट्रम्प यांचा टोला  
5
युनिफाईड पेन्शन स्कीमवर मोठी अपडेट; सरकारनं जोडले 'हे' फायदे, काय परिणाम होणार?
6
इराणमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणले; ११० विद्यार्थ्यांना घेऊन विमान सकाळीच पोहोचले
7
Guru Purnima 2025: २० जूनपासून गुरुपौर्णिमेपर्यंत सलग २१ दिवस करा 'ही' स्वामी उपासना!
8
अनिल अंबानींकडे असलेली सर्वात महागडी वस्तू कोणती? किंमत ऐकून अवाक व्हाल!
9
Anaya Bangar: संजय बांगरची ट्रान्सजेंडर मुलगी अनाया बांगरची BCCI कडे खास मागणी, म्हणाली- 'मला सहानुभूती नकोय, पण..."
10
Israel Iran: इस्रायलचे हल्ले, इराणमध्ये मृत्यूचे तांडव! आतापर्यंत किती लोकांचा झाला मृत्यू? 
11
बाबा भरतशेठ, अघोरी विद्या अन्...; पालकमंत्रीपदासाठी गोगावलेंकडून पूजा? राष्ट्रवादी काँग्रेसचा आरोप
12
इराणच्या अयातुल्ला खामेनीला घरातूनच विरोध; पुतण्या म्हणतो- शांततेसाठी या हुकुमशाही शासनाचा अंत आवश्यक!
13
"तुमच्या अंगाशी येईल, वाचवायला येणार नाही"; स्क्रीनशॉट दाखवत नितेश राणे म्हणाले, "निलेशजी, धमकवणे बरोबर नाही"
14
रायगडात धो धो पाऊस, शाळा, कॉलेजनां सुट्टी, अलिबाग-रोहा , पाली खोपोली रस्ता वाहतुकीस बंद
15
मुकेश अंबानी बनले ट्रम्प यांचे नवे बिझनेस पार्टनर; सर्वात श्रीमंत भारतीयानं किती गुंतवलेत पैसे?
16
सोनमने २५ दिवसांत ११२ वेळा फोन केला तो संजय वर्मा कोण? अखेर झालं उघड, धक्कादायक माहिती आली समोर 
17
बाजारात नवा 'लव्ह स्कॅम'! प्रेमाच्या जाळ्यात ओढून तरुणांना लुबाडतायत, तुम्ही तर बळी नाही ना?
18
करिश्मा कपूरची लेक समायरा नक्की काय करते? वडिलांच्या निधनानंतर समायरा कपूर चर्चेत
19
Karisma Kapoor : संजय कपूरसोबत घटस्फोट घेतल्यानंतर करिश्मा कपूरने का केलं नाही लग्न? जाणून घ्या याबद्दल
20
Sant Dnyaneshwar Maharaj Palkhi 2025: "ज्ञानोबा तुकारामांचा" अखंड जयघोष! आळंदीतून माऊलींच्या पालखीचे यंदा रात्री प्रस्थान

आपल्यामुळे दुसऱ्यांचे जीवन धन्य व्हायला हवे

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2019 21:38 IST

मनुष्य जीवन हे आनंददायी आहे. मनुष्य देह हे परमात्म प्राप्तीचे साधन आहे. शरीर माद्यम खलुधर्म साधनम्... अशा स्वरूपाचा जीवनाचा साकल्याने विचार केला आहे. आपल्या संस्कृतीत नकारात्मक भूमिका मांडण्याची पद्धत रूढ झाली आहे. 

-चंद्रकांत महाराज वांजळे

मनुष्य जीवन हे आनंददायी आहे. मनुष्य देह हे परमात्म प्राप्तीचे साधन आहे. शरीर माद्यम खलुधर्म साधनम्... अशा स्वरूपाचा जीवनाचा साकल्याने विचार केला आहे. आपल्या संस्कृतीत नकारात्मक भूमिका मांडण्याची पद्धत रूढ झाली आहे. जीवन आणि शरीर याविषयी जगद्गुरू संतश्रेष्ठ तुकाराममहाराज एकाठिकाणी सुंदर विचार मांडतात, ‘शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीरा साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रम्ह...’’ एवढी मोठी गुणवत्ता मनुष्य शरीरामध्ये आहे. त्याच अनुषंगाने मनुष्य अनेक इती कर्तव्ये पूर्ण करतो. यात फार मोठी अद्भुतता आहे. जीवन हे चंगळवादी आणि भोगवादी असेल, बंदिस्त झालेले असेल, तर ही हानी संत महात्मे पाहू शकत नाहीत. म्हणून अशा स्वरूपाच्या समाज जीवनाकडे पाहताना ‘बुडते हे जन न देखवे डोळा, येतो कळवळा म्हणोनिया...’, अशा स्वरूपाचे उद्गार मुखाविरंदातून बाहेर पडतात. त्यासाठी महात्मे कृतिशील राहतात.

 स्वत:चे जीवन समाजासाठी खर्ची करत असतात. आपलाच एक आदर्श निर्माण करीत असतात. संतश्रेष्ठ तुकोबाराय प्रतिज्ञेने सांगतात की, ‘धन्य म्हणविले इहलोकी लोका, भाग्य आम्ही तुका देखियेला...’’ मी असा एक जगेन की मला ज्या लोकांनी पाहिलेय ते म्हणतील आम्ही धन्य आहोत. अगदी महात्मा गांधीजींना सुद्धा विचारले होते की, ‘‘आपण एखादा संदेश द्या, त्यांवर गांधीजींनी माय लाईफ इज माय मॅसेज, माझे जीवनच माझा संदेश, आहे असे म्हटले होते. ही अहंकाराची भावना नाही. आपल्या जीवनावर असणारी श्रद्धा, विश्वास आहे. त्याचे हे प्रतीक आहे. तुकोबारायांनी म्हणावे की मी अशा पद्धतीने जगेन की ज्यांनी मला पाहिलेय ते मला धन्य म्हणतील. आणि योगायोग अशा स्वरूपाचा आहे की तुकोबारायांना ज्यांनी पाहिले. तुकोबारायांचा ज्यांचाशी व्यवहार आला ते रामेश्वर भट्टही म्हणाले की, ‘धन्य तुकोबा समर्थ, जेणे केला हा पुरुषार्थ, तुकाराम-तुकाराम नाम घेता कापे यम....’’सांगण्याचा समग्र भाव अशा स्वरूपाचा की ही माणसे स्वत:चे जीवन अशा पद्धतीने जगली, की त्यांच्यामुळे अनेकांचे जीवन धन्य झाले. त्यामुळे आपल्यामुळे दुसऱ्यांचे जीवन धन्य होईल, असे आचार, विचार असावेत. आपले जीवन दुसऱ्यांना प्रेरक ठरावेत. त्यातून माणसाचा विकास होणार आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड