शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
2
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
3
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
4
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
5
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
6
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
7
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
8
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
9
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
10
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
11
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी
12
भारतात द्वेषाचा वणवा पेटवण्याचं एक षड्‌यंत्र; ‘बदला’ घेण्याची घाई नको, ‘धडा’ शिकवला पाहिजे
13
नरेंद्र मोदी यावेळी बालाकोटच्याही पुढे जाणार?; पुढच्या दोन आठवड्यांत आणखी कठोर पावले
14
हम सब एक है! अतिरेकी व त्यांच्या सूत्रधारांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी
15
कृषी विकासासाठी ६५ बाजार समित्या; अद्याप राज्यातील ६८ तालुक्यांत समित्याच नाहीत
16
"आणखी किती वेळ सहन करणार..."; चिठ्ठी लिहून नवी मुंबईतील विकासकानं संपवलं आयुष्य
17
मेमध्ये जिल्हा समित्या, जूनमध्ये महामंडळे; भाजपाच्या वरिष्ठांचा कार्यकर्त्यांना शब्द
18
‘साहेब’ होऊ घातलेला बिरदेव म्हणतो, शेळ्या-मेंढ्यांना काय लाजायचं? तीच माझी ताकद
19
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
20
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे

राग- स्वनिर्मित खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 06:12 IST

राग येणे हे तसे कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तीविरोधात नाही.

सद्गुरु जग्गी वासुदेवराग येणे हे तसे कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तीविरोधात नाही. राग येणे, संतापणे, तो व्यक्त होणे म्हणजे तुम्ही रागावलेले आहात. मग तुम्ही एखाद्या दगडावर रागावलेले आहात किंवा ईश्वर किंवा गुरू किंवा आणखी कोणावर रागावलेले असाल. राग हा केवळ राग आहे. तुम्हाला वगळता त्याचा इतर कोणाशी किंवा कशाशी काहीच संबंध नसतो. तुम्हाला सतत राग येत राहतो, याचे कारण म्हणजे तुमचा असलेला असा विश्वास की, तुमच्या रागाचे कारण दुसरे कोणीतरी आहे. जर तुम्ही हे जाणलेत की, त्याचा संबंध फक्त आणि फक्त तुमच्या स्वत:शीच आहे, तर मग तुमचा राग फार काळ टिकणार नाही. ते समजून घेणे, राग येण्याच्या कारणाबाबत, त्याचे मूळ शोधण्याबाबत काम करणे सर्वात महत्वाचे आहे.  

कोणत्याही गोष्टीचा राग येण्याचे मूळ कारण म्हणजे, एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा प्रसंगाबद्दल तुमच्या तीव्र आवडी आणि नावडी. एखादी विशिष्ट विचारसरणी किंवा भावनेशी खोलवर ओळख जोडल्याने राग येतो. तो राग हाच जगण्याचा, विचार करण्याचा आणि भावना प्रकट करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, अशी तुमची ठाम धारणा बनते. जो कोणी त्या अपेक्षांच्या चौकटीत बसत नाही, तुम्ही त्यांच्यावर रागावता. तुमची त्या विषयाबाबतची तीव्र भावना तुम्ही त्या व्यक्तीसमोर व्यक्त करता. तुमच्या भावनेला मोकळी वाट करून देता. कधी कधी राग थेटपणे व्यक्त होतो. त्यातून तुम्ही तुमच्या भावनांचे प्रकटीकरण करता. अनेकदा त्या भावना जर आपण व्यक्त केल्या नाहीत, तरी त्या आपल्या कृतीतून इतरांना जाणवत राहतात. त्या प्रसंगाबाबतची, घटनेबाबतची तुमची भावना कधी तीव्र रूपाने, कधी नाराजीतून तर कधी धुसफुशीतून तुम्ही व्यक्त करत राहता. त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर, नातेसंबंधांवर, तुमच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या परस्पर संवादावर होत राहतो.

जसजशा तुमच्या आवडी-नावडी, पसंती-नापसंती तीव्र होत जातात, जसजशा तुमच्या इतर गोष्टींबरोबर जोडल्या गेलेल्या ओळखी अधिक गाढ होत जातात, तेव्हा हळूहळू अस्तित्वातील सर्वकाही तुम्ही वगळत असता. मी जर असे म्हणालो, ‘मला हे खूपच आवडते,’ तर त्याच क्षणी बाकी सारे अस्तित्वच मी वगळतो. म्हणजे फक्त आवत्या गोष्टीवरच आपले मन, लक्ष्य केंद्रित झालेले असते. तुमच्या पसंती किंवा नापसंती जितक्या तीव्र बनत जातात, तितके खोलवर तुम्ही अस्तित्वापासून विभक्त होत जाता. अनेकदा हा राग मर्यादा ओलांडतो. कारण तुम्ही कोणाला किंवा कशाला तरी तुमचाच एक भाग म्हणून सामावून घेतलेले नाही, हे त्या कृतीतून तुम्ही दाखवून देता. राग हे कर्म नाही, पण सामावून न घेण्याची वृत्ती, हे मात्र कर्म आहे. तुमच्या आयुष्याची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, हे दाखविण्यासाठी राग हा फक्त एक छोटासा संकेत आहे. त्यातून तुम्ही तुमच्या व्यक्तित्त्वाचा एक पैलू सर्वांसमोर आणता.

मुक्तीची अवघी प्रक्रियाच मुळात सामावून घेण्यात आहे, वगळण्यात नाही. विभक्त असलात की तुम्ही एका सापळ्यात अडकता, तुम्ही वेगळे पडता. सामावून घेण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही मुक्त होता. ज्या दिवशी एकूणएक गोष्ट, संपूर्ण अस्तित्व तुमच्यात सामावले जाते, त्याच क्षणी तुम्ही मुक्त होता. हे मुक्त होणे साध्य करायचे असेल तर रागावर नियंत्रण गरजेचे आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक