शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

राग- स्वनिर्मित खेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 16, 2019 06:12 IST

राग येणे हे तसे कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तीविरोधात नाही.

सद्गुरु जग्गी वासुदेवराग येणे हे तसे कोणत्याही व्यक्तीबद्दल किंवा व्यक्तीविरोधात नाही. राग येणे, संतापणे, तो व्यक्त होणे म्हणजे तुम्ही रागावलेले आहात. मग तुम्ही एखाद्या दगडावर रागावलेले आहात किंवा ईश्वर किंवा गुरू किंवा आणखी कोणावर रागावलेले असाल. राग हा केवळ राग आहे. तुम्हाला वगळता त्याचा इतर कोणाशी किंवा कशाशी काहीच संबंध नसतो. तुम्हाला सतत राग येत राहतो, याचे कारण म्हणजे तुमचा असलेला असा विश्वास की, तुमच्या रागाचे कारण दुसरे कोणीतरी आहे. जर तुम्ही हे जाणलेत की, त्याचा संबंध फक्त आणि फक्त तुमच्या स्वत:शीच आहे, तर मग तुमचा राग फार काळ टिकणार नाही. ते समजून घेणे, राग येण्याच्या कारणाबाबत, त्याचे मूळ शोधण्याबाबत काम करणे सर्वात महत्वाचे आहे.  

कोणत्याही गोष्टीचा राग येण्याचे मूळ कारण म्हणजे, एखाद्या गोष्टीबद्दल, व्यक्तीबद्दल किंवा प्रसंगाबद्दल तुमच्या तीव्र आवडी आणि नावडी. एखादी विशिष्ट विचारसरणी किंवा भावनेशी खोलवर ओळख जोडल्याने राग येतो. तो राग हाच जगण्याचा, विचार करण्याचा आणि भावना प्रकट करण्याचा सर्वोत्तम मार्ग आहे, अशी तुमची ठाम धारणा बनते. जो कोणी त्या अपेक्षांच्या चौकटीत बसत नाही, तुम्ही त्यांच्यावर रागावता. तुमची त्या विषयाबाबतची तीव्र भावना तुम्ही त्या व्यक्तीसमोर व्यक्त करता. तुमच्या भावनेला मोकळी वाट करून देता. कधी कधी राग थेटपणे व्यक्त होतो. त्यातून तुम्ही तुमच्या भावनांचे प्रकटीकरण करता. अनेकदा त्या भावना जर आपण व्यक्त केल्या नाहीत, तरी त्या आपल्या कृतीतून इतरांना जाणवत राहतात. त्या प्रसंगाबाबतची, घटनेबाबतची तुमची भावना कधी तीव्र रूपाने, कधी नाराजीतून तर कधी धुसफुशीतून तुम्ही व्यक्त करत राहता. त्याचा परिणाम तुमच्या व्यक्तिमत्त्वावर, नातेसंबंधांवर, तुमच्या आणि समोरच्या व्यक्तीच्या परस्पर संवादावर होत राहतो.

जसजशा तुमच्या आवडी-नावडी, पसंती-नापसंती तीव्र होत जातात, जसजशा तुमच्या इतर गोष्टींबरोबर जोडल्या गेलेल्या ओळखी अधिक गाढ होत जातात, तेव्हा हळूहळू अस्तित्वातील सर्वकाही तुम्ही वगळत असता. मी जर असे म्हणालो, ‘मला हे खूपच आवडते,’ तर त्याच क्षणी बाकी सारे अस्तित्वच मी वगळतो. म्हणजे फक्त आवत्या गोष्टीवरच आपले मन, लक्ष्य केंद्रित झालेले असते. तुमच्या पसंती किंवा नापसंती जितक्या तीव्र बनत जातात, तितके खोलवर तुम्ही अस्तित्वापासून विभक्त होत जाता. अनेकदा हा राग मर्यादा ओलांडतो. कारण तुम्ही कोणाला किंवा कशाला तरी तुमचाच एक भाग म्हणून सामावून घेतलेले नाही, हे त्या कृतीतून तुम्ही दाखवून देता. राग हे कर्म नाही, पण सामावून न घेण्याची वृत्ती, हे मात्र कर्म आहे. तुमच्या आयुष्याची वाटचाल कोणत्या दिशेने होत आहे, हे दाखविण्यासाठी राग हा फक्त एक छोटासा संकेत आहे. त्यातून तुम्ही तुमच्या व्यक्तित्त्वाचा एक पैलू सर्वांसमोर आणता.

मुक्तीची अवघी प्रक्रियाच मुळात सामावून घेण्यात आहे, वगळण्यात नाही. विभक्त असलात की तुम्ही एका सापळ्यात अडकता, तुम्ही वेगळे पडता. सामावून घेण्याचा प्रयत्न केलात, तर तुम्ही मुक्त होता. ज्या दिवशी एकूणएक गोष्ट, संपूर्ण अस्तित्व तुमच्यात सामावले जाते, त्याच क्षणी तुम्ही मुक्त होता. हे मुक्त होणे साध्य करायचे असेल तर रागावर नियंत्रण गरजेचे आहे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक