शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

जग ही बंदिशाळा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 22, 2020 04:28 IST

आज घराच्या सीमाही ओलांडणे धोकादायक ठरत आहे. माणूस माणसापासून अंतर ठेवत आहे, कारण ते त्याच्या आरोग्यासाठी हितावह आणि आवश्यक झाले आहे.

- फादर दिब्रिटोकोलंबसने सातासमुद्राच्या सीमा ओलांडून जागतिक संपर्काचा विक्रम नोंदवला. चिनी व्यापारी भारतात आले, भारतीय व्यापारी ग्रीसपर्यंत पोहोचले. प्रसारमाध्यमामुळे माणूस एकमेकांच्या जवळ आलेला आहे, आणि तो खऱ्या अर्थाने बोलू लागला आहे ‘दुनिया मेरे मुठ्ठी मे’. माणसाला मैत्रीचा हात देणारा माणूसच आज बंधनात आहे. आज संपर्क हेच संसर्गासाठी निमित्त बनत आहे. आज घराच्या सीमाही ओलांडणे धोकादायक ठरत आहे. माणूस माणसापासून अंतर ठेवत आहे, कारण ते त्याच्या आरोग्यासाठी हितावह आणि आवश्यक झाले आहे. आपल्या प्रगतीच्या घोडदौडीमुळे माणूस स्वत:ला अजिंक्य समजत होता. तो मंगळावर जायची तयारी करू लागला आहे, समुद्राचा तळ त्याने गाठला आहे आणि मी सर्वश्रेष्ठ आहे, मला कोणी आव्हान देऊ शकत नाही अशा मग्रुरीत तो होता. अशा तथाकथित अजिंक्य माणसावर घरात कैद होण्याची वेळ आलीे.कुठूनतरी वाºयाची झुळूक यावी आणि झाडांची शेकडो पाने गळून पडावीत तशी कोरोनामुळे माणसे मरत आहेत. कॅनडाच्या पंतप्रधानाच्या पत्नीला कोरोनाने घेरले आहे, त्यांच्या डोळ्यातील अश्रूंची ती क्लिप पाहून माझेही डोळे पाणावले. ही महामारी ती गरीब किंवा श्रीमंत, सुशिक्षित किंवा अशिक्षित, ग्रामीण किंवा शहरी असा भेद करीत नाही. बायबलमध्ये स्तोत्रकार म्हणतो, ‘मी जेव्हा भरल्या आकाशाकडे पाहतो तेव्हा मी चिंतामग्न होतो आणि स्वत:ला प्रश्न विचारतो, काय हा माणूस?, ज्याला देवाच्या मनामध्ये स्थान आहे, सर्व पशुपक्ष्यांमध्ये तो श्रेष्ठ आहे, या माणसाची काय ही परिस्थिती झाली आहे?’ मी एक व्यंगचित्र पाहिले त्यात माणूस पिंजºयात बंदिस्त आहे आणि पशुपक्षी त्याला बाहेरून जणूकाही हिणवून सांगतायेत, ‘तू स्वत:ला अजिंक्य समजतो आहेस, तू आम्हाला कावेबाजपणे फासे मांडून पकडतो आणि पिंजऱ्यात कोंबतोस, आता तरी तुला स्वातंत्र्याची किंमत कळली का?’

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या