शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टार्गेट किलिंग! ५ मिलियन डॉलरचे इनाम असलेला टॉप कमांडर बेरूतमध्ये हवाई हल्ल्यात उडवला
2
शेख हसीनांच्या प्रत्यार्पणासाठी बांगलादेशची भारताला थेट मागणी; फाशीच्या शिक्षेमुळे वाढले टेन्शन!
3
Wing Commander Namansh Syal :'भारत माता की जय'च्या घोषणा, हजारो नागरिकांच्या उपस्थितीत वीरपत्नीचा 'तो' अखेरचा सॅल्यूट...
4
India ODI Squad vs SA: भारतीय वनडे संघाची घोषणा! KL राहुल कॅप्टन; ऋतुराजलाही मिळाली संधी
5
Travel : भारतातील ५ सुंदर गावं, जिथे फिरायला जाल तर इटली अन् पॅरिसही विसराल! पाहा कुठे आहेत...
6
अल-फलाह डॉक्टरांच्या अटकेनंतर सर्च ऑपरेशन सुरू; मशिदीतून संशयास्पद पावडरसह विदेशी दारूही जप्त!
7
“स्वामी समर्थांनी सांगितले, आळशी माणसाचे तोंड पाहू नका”; शिंदेंचा नाव न घेता ठाकरेंना टोला
8
गुरुवारी दत्त जयंती २०२५: ११ दिवस सेवा करा, नक्की फल मिळेल; काळजी सोडा, स्वामी शुभच करतील!
9
संतापजनक! सोयाबीनची भाजी केली म्हणून पतीने पत्नीचे डोके फोडले; सिद्धार्थनगरमध्ये हादरवणारी घटना
10
बिबट्या पुण्याच्या वेशीवर; पहाटे पहाटे औंधमध्ये  बिबट्याचे दर्शन; पुणे शहरात खळबळ, वनविभाग आणि RESQ सतर्क
11
“काँग्रेसच्या विकासकांमाची यादी करायची तर कागद संपतो, भाजपाने मात्र...”: हर्षवर्धन सपकाळ
12
IND vs SA 2nd Test Day 2 Stumps : धोक्याची घंटा वाजली! टीम इंडिया पलटवार करू शकेल का?
13
६, ९, ५, २२ अन् २५ हे केवळ अंक नाहीत, अयोध्या राम मंदिराशी खास कनेक्शन; तुम्हाला माहितीये?
14
"महिलेचा गर्भपात, पती म्हणून अनंत गर्जेंचे नाव"; डॉक्टर गौरींना मिळाली होती कागदपत्रे, प्रकरणाला धक्कादायक वळण
15
Smriti Mandhana Wedding Postponed: वडिलांची तब्येत बिघडली; स्मृतीनं घेतला लग्न पुढे ढकलण्याचा निर्णय
16
"अनंतचा फोन आलेला, खूप रडत होता; त्याने मला सांगितलं की..."; गौरी पालवे प्रकरणावर पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
17
Video - क्लिनिकबाहेर उभ्या असलेल्या डॉक्टरला आला हार्ट अटॅक, खाली कोसळला अन्...
18
“भाजपाने सुसंस्कृत राजकारण सोडले, सरकार नैतिक कर्तव्य विसरले”; सुप्रिया सुळेंची टीका
19
भारताच्या तेल पुरवठ्यावर अमेरिकेचा मोठा 'बॅन'; रशियाकडून मिळणारे ४०% स्वस्त तेल आता कमी होणार?
20
सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणेच मिळणार फायदे! नवीन लेबर कोडमुळे कामगारांना मिळणार मोठा आधार
Daily Top 2Weekly Top 5

शब्द हे मनाचे आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 17:40 IST

व्यक्तीचे सुप्त मन सुखावते ते फक्त प्रेमाच्या दोन शब्दांनी.

शब्द म्हणजे अर्थपूर्ण अक्षरांचा समूह. व्यक्तीचे संवाद साधण्याचे साधन म्हणजे शब्द.  शब्द व्यक्तीला कधी सुखावतात तर कधी दुखावतात. शब्दांनीच मन जुळते तर कधी आयुष्यभरासाठी दुरावते. शब्दचं मनाला भुरळ घालतात आणि गुंतवतात प्रेमाच्या नात्यांमध्ये. शब्द आणि मन यांचे जवळचे नाते आहे. दोन शब्द प्रेमाचे ऐकले की; मन प्रसन्न आणि उत्साहित होते. हेच दोन शब्द मन दुखावणारे असतील तर आयुष्यभर मन खट्टू राहते. इतके मन आणि शब्दांचे अतुट नाते आहे. अक्षरांपासून शब्द तयार होतात. शब्दांचे वाक्य आणि वाक्यांचा परिश्छेद. तसे बघितल्यास दोन व्यक्तिंमध्ये चांगल्या शब्दांचा संवाद असल्यास दोघेही एकमेकांच्या मनाची काळजी आयुष्यभर घेतात. आपल्याकडे लग्न जमवतांना पत्रिका बघतात. मुलाचे आणि मुलीचे छत्तीस गुण जुळणे हे भाग्याचे लक्षण समजले जाते. असे मानले जाते की छत्तीस गुण जुळणारे जोडपे एकमेकांना चांगल्या प्रकारे समजून घेतात, एकमेकांच्या शब्दांचा आदर ठेवतात ते पाळतात. पण हे छत्तीस गुण जुळणे म्हणजे नेमके काय ? 

आपल्या मराठी भाषेमध्ये १२ स्वर आणि ३४ व्यंजने आहेत. ‘ क्ष ’ आणि ‘ ज्ञ ’ मिळून ही वर्णमाला ४८ वर्णांची होते. यातील ३४ व्यंजने आणि ‘ क्ष ’ आणि ‘ ज्ञ ’ मिळून छत्तीस अक्षरे होतात. या अक्षरांपासून शब्द तयार होतो. शब्दांपासून तयार झालेली ही वाक्य ज्या प्रमाणात जुळतात तितके गुण जुळले असे तर नाही ना ? हे ३६ गुण म्हणजे ३६ अक्षरांपासून तयार होणारे शब्द आणि वाक्य, एकमेकांचे किती मन सांभाळतील असेच ना !  शब्द आधार असतात व्यक्तीच्या मनाचे. ज्या व्यक्तीच्या बोलण्याने आपल्या मनाला आधार असल्या सारखे वाटते त्या व्यक्ती सोबत तासंतास बोलत रहावेसे वाटते. मन हे फार चंचल असते. त्याला आवर घालणे फक्त शब्दांनाच जमते.व्यक्ती स्वत:च्या मनाशी रोज काहीना काही बोलत असते. मनाशी होणारा हा स्वतःचा संवाद शब्दांनीच होत असतो. व्यक्तीचे सुप्त मन सुखावते ते फक्त प्रेमाच्या दोन शब्दांनी. या सुप्त मनाला होणारा हा शाब्दिक आधार व्यक्तीच्या चेहऱ्यावर दिसतो. हा आनंद कुठल्या ही भौतिक वस्तूमुळे होत नाही. तो होतो प्रेमाच्या दोन शब्दांनी. म्हणून असे म्हणतात की व्यक्तीने आपले शब्द जपून वापरावे. कुणाचे मन दुखावेल असे काही बोलू नये. परंतू आजकाल व्यक्ती खूप व्यस्त झाला आहे. त्याला कुणाशी बोलायला वेळ नाही. तो विविध सोशल साईट वर अनोळखी व्यक्तींशी लिखीत स्वरुपात खूप बोलतोय.  

परंतू त्याला हे लक्षात येत नाहीये की, तो ज्या कुणाच्या सहजीवनात जगतोय. त्यांना त्याच्या दोन प्रेमळ शब्दांची किती गरज आहे ? त्याच्या या दोन शब्दांनी जन्मदात्यांचे, पतीचे- पत्नीचे, मुलांचे काही दिवसांनी आयुष्य वाढेल. ज्या साठी तो धाव-धावतोय त्या सर्वांना पैसा, प्रतिष्ठा, मान, सन्मान हे काही लागत नसून. त्यांना हवे आहेत मनाला सुखावणारे ओले दोन प्रेमळ शब्द. आजच्या वातावरणात हेच दोन प्रेमळ शब्द,  प्रेमळ संवाद कुठे तरी हरवलाय. मना-मनात निर्माण झाली आहे एक दरी, ती ही शब्दांमुळेच. दुखावली गेली आहेत नाती, मन ते ही शब्दांमुळेच. शब्द हे असे हत्यार आहे. जे असा घाव करतात की मनावर होणारी ओली चांगली-वाईट जखम कायम स्मरणात ठेवतात. मन जिंकणे सर्वांनाच जमत नाही. कारण मनावर राज्य करतील असे शब्द सर्वांनाच सुचत नाही. बाल कवी, बहिणाबाई, मंगेश पाडगावकर, मर्ढेकर या सारख्या कवींच्या कविता आज ही मना मनात अधिराज्य गाजवताय ते शब्दांमुळेच. म्हणून आज प्रत्येकाने लक्षात घ्यावे की, शब्द हे मनाचे आधार आहे. 

- सचिन काळे, जालना ( ९८८१८४९६६६) 

टॅग्स :spiritualअध्यात्मिकAdhyatmikआध्यात्मिकliteratureसाहित्य