शहरं
Join us  
Trending Stories
1
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
2
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
3
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
4
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
5
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
6
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
7
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
8
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
9
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
10
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
11
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
12
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
13
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...
14
Stock Market Update: १३१ अंकांच्या तेजीसह खुला झाला Sensex; PSU बँकांमध्ये तेजी, IT-FMGC आपटले
15
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
16
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
17
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
18
दहशतवादी हल्लानंतर मृत्यू पावलेल्या पर्यटकांसाठी श्रद्धांजली यात्रा, मकरंद देशपांडे म्हणाले...
19
'मी १५ दिवस स्वतःचीच लघवी प्यायलो', कारण...; परेश रावल यांचा खुलासा, अजय देवगणच्या वडिलांनी दिला होता सल्ला
20
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी

दया तेथे धर्म । धर्म तेथे सुखागम ॥

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 19:13 IST

दया करतांना आप पर भाव नसावा. आपला किंवा परका, मित्र किंवा शत्रू कोणीही संकटात सापडला असता, त्याच्या रक्षणासाठी धावून जाणे यालाच 'दया' म्हणतात..!

-  युवा कीर्तनकार ऋतुपर्ण भरतबुवा रामदासी (बीड)

परमेश्वर प्राप्तीसाठी ध्यान-धारणा, पूजा-अर्चना, जप-जाप्य करीत असतांना अंगी दया, क्षमा, शांती या दैवी गुणांची नितांत गरज आहे. ज्ञानराज माऊली वर्णन करतात -

दया तेथे धर्म । धर्म तेथे सुखागम ॥सुखी पुरुषोत्तम । वसे जैसा ॥

आता प्रश्न असा आहे की, दया म्हणजे तरी काय? दयेची व्याख्या काय? तर शास्त्रकार दयेची व्याख्या करतांना म्हणतात -

परेवा बंधुवर्गे वा मित्रे द्वेष्टारिवासदा ।आपन्ने रक्षितवय्यंतु दर्येषा परिकीर्तिता ॥

दया करतांना आप पर भाव नसावा. आपला किंवा परका, मित्र किंवा शत्रू कोणीही संकटात सापडला असता, त्याच्या रक्षणासाठी धावून जाणे यालाच 'दया' म्हणतात. अशाच भक्तांवर भगवंत प्रसन्न होतो. आपपर भावविरहित वर्तन हेच भगवंताला आवडते.तुकाराम महाराज दया या सर्वश्रेष्ठ मूल्याबाबत लिहितात -

दया करणे जे पुत्रासी ।तेचि दासा आणि दासी ॥

जी दया आप्तेष्टांवर तीच दया घरातील नोकर चाकरांवर असल्यास आपले वर्तन आपपर भावविरहित समजावे. ईश्वराला आपपर भाव आवडत नाही कारण -

परमात्मा श्रीहरि ।जो अंतर्यामि सर्व शरीरि ॥जो परांचा द्वेष करि ।तेणे द्वेषिला परमात्मा ॥

भगवंत सर्वांच्या ह्रदयात आहे. इतरांच्या ठिकाणी द्वेष, वैरभाव ठेवल्यास त्याच्या ह्रदयात असलेल्या श्रीहरिचाच द्वेष केल्याचे पातक लागेल. सर्वांतरयामि भगवद् भाव ठेवणारा जो भक्त आहे तोच मला आवडतो असे भगवान म्हणतात.

जो सर्व भूतांचे ठायी ।द्वेषाते नेणेंचि कांही ॥आपपरु नाही । चैतन्य जैसा ॥तैसा आवघाचि भूतमात्री । एकपणे जया मैत्री ॥कृपेशी धात्री । आपण या जी ॥

जो कोणाचाही द्वेष करत नाही. सर्वांशी मित्रत्वाने वागतो. प्रत्येक प्राणीमात्रांच्या बद्दल ज्याच्या अंतःकरणांत करुणा आहे, अशाच भक्तांवर मी कृपा करतो असा वरील ओव्यांचा आशय. या सर्व संत वचनांवरुन आपल्या सहज लक्षात येईल की, दया हा गुण जीवनात निर्माण झाल्याशिवाय परमेश्वर प्राप्त होणे शक्य नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी दयेची अत्यंत सुंदर व्याख्या केली आहे. माऊली म्हणतात -

आता दया ते ऐसी ।पूर्ण चंद्रिका जैसी ॥निवविता न कडसी । साने थोर ॥तैसे दुःखिताचे शिणणे ।हिरता सकणवपणे ॥उत्तम अधम नेणे । विचंगू गा ॥

अनाथांचे नाथ शांतीसागर श्री एकनाथ महाराजांच्या जीवन चरित्रातील प्रसंग..नाथबाबा काशीतीर्थ यात्रा आटोपून पैठणक्षेत्री येत होते. सोबत बरीच भक्तमंडळी होती. दुपारची वेळ, ऊन कडक पडलेलं. सर्वांगाची लाही लाही होत होती. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. नाथबाबा शिष्याच्या समवेत एका झाडाच्या सावलीत थांबले. इतक्यात एका गाढवाचे ओरडणे नाथांच्या कानी आले. दर्याद्रनाथ तो आवाज ऐकून अशांत झाले. गाढवाचा शोध घेण्यासाठी ते इतस्ततः फिरु लागले. एका वाळूच्या ढिगाऱ्यावर एक गाढव तृषार्त होऊन लोळत होते. ते करुणदृष्य पाहून नाथांना गहिवरुन आले. धावत धावत जाऊन त्यांनी काशीवरुन आणलेली गंगामाता गाढवाच्या मुखात ओतली व ते ताडकन उठून परत चालू लागले. सोबतची भक्तमंडळी आश्चर्यचकित झाली. त्यातील एका सद्गृहस्थाने नाथांना विचारले.. आता रामेश्वर भगवंताला कोणत्या गंगेने अभिषेक करणार.? नाथ म्हणाले, बाबांनो.! हाच माझा रामेश्वर आहे. अरे.! गाढव म्हणून जर आपण त्याला मरु दिलं तर, याला निर्माण करणारा परमेश्वर प्रसन्न होईल का..? शिवाय त्याचा आत्मा आणि माझा आत्मा यात फरक कोणता.? देहांचा पडदा दूर केला तर या जगांत हरिवाचून दुसरं आहे कोण?सज्जनहो! केवढी ही समत्व बुद्धी..! अशी समत्व बुद्धी निर्माण झाली तर भगवद् दर्शन दूर नाही. अशा दर्याद्र भक्तावरच भगवंत प्रेमाचा वर्षाव करतात.श्रीमद् भागवतात नाथ महाराज म्हणतात -बालक देखूनि संकटी ।जेवी न सावरता माय उठी ॥तेवी दिन देखोनि दृष्टी ।ज्याचे पोटी दया द्रवे ॥दीनाचिये दये लागी ।जो रिघे जळत्या आगी ॥त्याचे चरण मी वंदीवेगी ।धन्य जगी दयाळू ॥

हरिजनाचे मूल तापलेल्या वाळूत रडत असतांना नाथांनी त्याला आपल्या घरी आणले. बिना तूप लावलेली पोळी खाल्ली तर पोट दुखेल म्हणून तुपाची वाटी घेऊन कुत्र्यामागे धावणारे नामदेव महाराज आपणास माहिती आहेत, अशा अनेक संतांची भूतदया बघितली म्हणजे वाटते खरा समाजवाद या देशांत फक्त संत जगले. आज प्रगतीच्या वैज्ञानिक युगात माणूस अंतराळात गेला पण शेजारच्या माणसाच्या अंतःकरणात करुणेची गंगा त्याला निर्माण करता आली नाही. पद, प्रतिष्ठा, पैसा या गर्वात तो आपलं माणूसपण हरवून बसला. संत बहिणाबाई म्हणतात -

अरे माणसा माणसा ।कधी होशील माणूस ॥

आज आपल्या देशावर नव्हे तर संपूर्ण जगावर कोरोना सारख्या वैश्विक महामारीचं भीषण संकट आलं आहे. अशावेळी आपल्या या देशात असंख्य दीन, दुबळे, आंधळे, पांगळे, मुके, बहिरे, गरजू जीव दरिद्री जीवन जगत आहेत आणि हीच खरी वेळ आणि आताच खरी गरज आहे त्यांच्यावर दया दाखविण्याची आणि त्यांच्यावर ममतेची छाया धरण्याची..! परमेश्वर हा फक्त देवळातच नाही तो तर या संपूर्ण विश्वात नटलेला आहे पण विकारविवशतेने भरलेल्या या बाजारात आज फक्त स्वार्थ, हिंसा, खून, दरोडे, बलात्कार या पाशवी अत्याचारांनीच थयथयाट मांडला आहे. या काळोख्या अंधारात संतसंगाची ही दीपकलिका प्रज्वलित ठेवण्याचा हा अल्पसा प्रयत्नवाद..!

॥ जय जय रघुवीर समर्थ ॥

( लेखक हे युवा कीर्तनकार आहेत, त्यांचा भ्रमणध्वनी ८७ ९३ ०३ ०३ ०३ )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक