शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

कोठे मथुरा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 05:40 IST

भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये कलहातून एकांत प्राप्त होतो व थोडासा आपणच आपल्या मनाशी संवाद साधू लागतो. लोकभावनेतील हलकल्लोळातून कधी तरी मनाशी ...

भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये कलहातून एकांत प्राप्त होतो व थोडासा आपणच आपल्या मनाशी संवाद साधू लागतो. लोकभावनेतील हलकल्लोळातून कधी तरी मनाशी संवाद साधणे ही सज्जन माणसाची सांस्कृतिक भूक आहे. ती त्यांनी भागविलीच पाहिजे तरच समाजात सज्जन माणसांचा सुकाळ होईल. दुसऱ्या बाजूला या देशातील काही तीर्थक्षेत्रे आपल्या स्थान महात्म्याविषयी प्रसिद्ध आहेत म्हणूनच कबिराने म्हटले होते -चलों मन गंगा जमुना तीर, गंगा-जमुना निर्मल पानीशीतल होत शरीर ऽ चलो मन गंगा जमुना तीर ।शरीराला शीतलता व मनाला शांतता देणारे निर्मल स्रोत म्हणून तीर्थक्षेत्राचे महत्त्व मान्य जरी केले तरी हल्ली तीर्थाटने माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. आपल्या देशातील बरीचशी मंडळी तीर्थाटनात कर्मकांड करण्यात गुंतली आहेत. पापक्षालनासाठी व मोक्षाच्या प्राप्तीसाठी आम्ही तीर्थात जाऊन वरून कातडी धूत आहोत, पण वरून कातडी धुतल्यानंतर आतून केलेले पाप धुऊन जाते हा प्रकारच हास्यास्पद वाटतो. म्हणूनच देहू गावचे धगधगते चालते ज्ञानबिंब तुकोबारायांनी एक विवेकवादी प्रश्न विचारला होता -जाऊनियां तीर्था काय तुवा केले ?चर्म प्राक्षाळीले वरी-वरी ।आंतरिचे शुद्ध कासयाने झाले ?भूषण त्वा केले अपण पया ।तीर्थाटनात जाऊन दाढी आणि डोके भादरून घेणाºया मंडळींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशा वेळी मनात विवेक निर्माण होत नाही की, अंतरंगात जर पापाची कोडी भरली असेल तर वरून दाढी करून काय करायचे? वरून कातडी धुतल्यानंतर आतले मन कधी शुद्ध होत नाही, त्यापेक्षा मथुरा, द्वारका, काशी ही सारी तीर्थक्षेत्रे आपण आपल्या मनातच निर्माण करायची आहेत. तर सद्, चित् आनंदाची अनुभूती मिळायला वेळ लागणार नाही.- प्रा. शिवाजीराव भुकेले