शहरं
Join us  
Trending Stories
1
‘स्वर्गाचा दरवाजा उघडलाय!, त्यांना मरण येऊ दे’ नाताळादिवशी झेलेन्स्कींनी केली पुतीन यांच्या मृत्यूची कामना  
2
सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात 'तारा'चा भीमपराक्रम! मगरींच्या विळख्यात दीड किमी पोहून वारणा धरण केले पार
3
उल्हासनगर: शाखा ताब्यात घेण्यावरून उद्धवसेना व शिंदेसेना आमने-सामने, पोलिसांचा हस्तक्षेप
4
KTM Duke: केटीएम ड्यूक १६० आता आणखी पॉवरफुल! ग्राहकांना मिळणार नवीन अपडेट्स
5
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
6
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
7
ग्लॅमर अन् परंपरेचा 'गुलाबी संगम'... BIGG BOSS गाजवणाऱ्या मालती चहरचा 'सुपरहॉट' लूक (PHOTOS)
8
बॉक्सर नीरजनं विचारलं, कसे आहात? पंतप्रथान मोदींनी उत्तर दिलं, तुझ्यासारखाच...!; VIDEO व्हायरल
9
भाजपाचा मित्रपक्षाच्या आमदारांवरच डोळा? पक्षाच्या बैठकीला दांडी, बिहारमध्ये मोठी उलथापालथ होणार
10
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
11
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
12
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
13
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
14
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
15
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
16
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
17
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
18
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
19
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
20
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
Daily Top 2Weekly Top 5

कोठे मथुरा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 05:40 IST

भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये कलहातून एकांत प्राप्त होतो व थोडासा आपणच आपल्या मनाशी संवाद साधू लागतो. लोकभावनेतील हलकल्लोळातून कधी तरी मनाशी ...

भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये कलहातून एकांत प्राप्त होतो व थोडासा आपणच आपल्या मनाशी संवाद साधू लागतो. लोकभावनेतील हलकल्लोळातून कधी तरी मनाशी संवाद साधणे ही सज्जन माणसाची सांस्कृतिक भूक आहे. ती त्यांनी भागविलीच पाहिजे तरच समाजात सज्जन माणसांचा सुकाळ होईल. दुसऱ्या बाजूला या देशातील काही तीर्थक्षेत्रे आपल्या स्थान महात्म्याविषयी प्रसिद्ध आहेत म्हणूनच कबिराने म्हटले होते -चलों मन गंगा जमुना तीर, गंगा-जमुना निर्मल पानीशीतल होत शरीर ऽ चलो मन गंगा जमुना तीर ।शरीराला शीतलता व मनाला शांतता देणारे निर्मल स्रोत म्हणून तीर्थक्षेत्राचे महत्त्व मान्य जरी केले तरी हल्ली तीर्थाटने माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. आपल्या देशातील बरीचशी मंडळी तीर्थाटनात कर्मकांड करण्यात गुंतली आहेत. पापक्षालनासाठी व मोक्षाच्या प्राप्तीसाठी आम्ही तीर्थात जाऊन वरून कातडी धूत आहोत, पण वरून कातडी धुतल्यानंतर आतून केलेले पाप धुऊन जाते हा प्रकारच हास्यास्पद वाटतो. म्हणूनच देहू गावचे धगधगते चालते ज्ञानबिंब तुकोबारायांनी एक विवेकवादी प्रश्न विचारला होता -जाऊनियां तीर्था काय तुवा केले ?चर्म प्राक्षाळीले वरी-वरी ।आंतरिचे शुद्ध कासयाने झाले ?भूषण त्वा केले अपण पया ।तीर्थाटनात जाऊन दाढी आणि डोके भादरून घेणाºया मंडळींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशा वेळी मनात विवेक निर्माण होत नाही की, अंतरंगात जर पापाची कोडी भरली असेल तर वरून दाढी करून काय करायचे? वरून कातडी धुतल्यानंतर आतले मन कधी शुद्ध होत नाही, त्यापेक्षा मथुरा, द्वारका, काशी ही सारी तीर्थक्षेत्रे आपण आपल्या मनातच निर्माण करायची आहेत. तर सद्, चित् आनंदाची अनुभूती मिळायला वेळ लागणार नाही.- प्रा. शिवाजीराव भुकेले