शहरं
Join us  
Trending Stories
1
राज-उद्धव ठाकरे एकत्र आले तर महापालिका निवडणुकीत ५४ टक्के मते मिळतील; सर्व्हे आल्याचा शिवसेना नेत्याचा दावा
2
बलात्कार करणाऱ्याला महिलेने घडवली जन्माची अद्दल; विळ्याने नराधमाचे गुप्तांगच कापले
3
लंच ब्रेक झाला म्हणून २० वर्षीय तरुणी घरी गेली; बेडरुममध्ये तिचा बॉस... 
4
Ahmedabad Plane Crash : "माणुसकी दाखवा, माझी मुलगी रुग्णालयात..."; विमान अपघातानंतर डॉक्टरची हात जोडून विनंती
5
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
6
Israel Rran War: 'हल्ले थांबवा नाहीतर तेहरानला आग लावू'; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इराणच्या खोमेनींना इशारा
7
आत्महत्येबाबत इन्स्टावर तरूणाने टाकली पोस्ट; १२ मिनिटांत पोलिसांनी फासावरून खाली उतरवला
8
WTC 2025 Final Prize Money : चांदीची गदा अन् IPL चॅम्पियन्स RCB पेक्षा अधिक रक्कम; दक्षिण आफ्रिकेसह कोणत्या संघाला किती बक्षीस मिळालं?
9
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
10
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
11
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
12
दिवसभर खुर्चीवर बसून वाढतंय वजन? ३०-३०-३० नियमाची जादू, लठ्ठपणाला कराल बाय-बाय
13
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
14
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
15
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
16
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
17
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
18
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
19
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
20
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 

कोठे मथुरा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 26, 2019 05:40 IST

भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये कलहातून एकांत प्राप्त होतो व थोडासा आपणच आपल्या मनाशी संवाद साधू लागतो. लोकभावनेतील हलकल्लोळातून कधी तरी मनाशी ...

भारतातील तीर्थक्षेत्रांमध्ये कलहातून एकांत प्राप्त होतो व थोडासा आपणच आपल्या मनाशी संवाद साधू लागतो. लोकभावनेतील हलकल्लोळातून कधी तरी मनाशी संवाद साधणे ही सज्जन माणसाची सांस्कृतिक भूक आहे. ती त्यांनी भागविलीच पाहिजे तरच समाजात सज्जन माणसांचा सुकाळ होईल. दुसऱ्या बाजूला या देशातील काही तीर्थक्षेत्रे आपल्या स्थान महात्म्याविषयी प्रसिद्ध आहेत म्हणूनच कबिराने म्हटले होते -चलों मन गंगा जमुना तीर, गंगा-जमुना निर्मल पानीशीतल होत शरीर ऽ चलो मन गंगा जमुना तीर ।शरीराला शीतलता व मनाला शांतता देणारे निर्मल स्रोत म्हणून तीर्थक्षेत्राचे महत्त्व मान्य जरी केले तरी हल्ली तीर्थाटने माणसांच्या गर्दीने ओसंडून वाहत आहेत. आपल्या देशातील बरीचशी मंडळी तीर्थाटनात कर्मकांड करण्यात गुंतली आहेत. पापक्षालनासाठी व मोक्षाच्या प्राप्तीसाठी आम्ही तीर्थात जाऊन वरून कातडी धूत आहोत, पण वरून कातडी धुतल्यानंतर आतून केलेले पाप धुऊन जाते हा प्रकारच हास्यास्पद वाटतो. म्हणूनच देहू गावचे धगधगते चालते ज्ञानबिंब तुकोबारायांनी एक विवेकवादी प्रश्न विचारला होता -जाऊनियां तीर्था काय तुवा केले ?चर्म प्राक्षाळीले वरी-वरी ।आंतरिचे शुद्ध कासयाने झाले ?भूषण त्वा केले अपण पया ।तीर्थाटनात जाऊन दाढी आणि डोके भादरून घेणाºया मंडळींची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. अशा वेळी मनात विवेक निर्माण होत नाही की, अंतरंगात जर पापाची कोडी भरली असेल तर वरून दाढी करून काय करायचे? वरून कातडी धुतल्यानंतर आतले मन कधी शुद्ध होत नाही, त्यापेक्षा मथुरा, द्वारका, काशी ही सारी तीर्थक्षेत्रे आपण आपल्या मनातच निर्माण करायची आहेत. तर सद्, चित् आनंदाची अनुभूती मिळायला वेळ लागणार नाही.- प्रा. शिवाजीराव भुकेले