शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
4
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
5
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
6
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
7
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
8
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
9
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
10
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
11
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
12
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
13
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
14
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
15
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
16
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
17
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
18
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
19
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
20
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली

‘अहं ब्रह्मास्मि’ भावना आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 08:59 IST

ज्यांना जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यरुपी समुद्रात आपली बुद्धी स्थिर करून घ्यायची असेल त्यांनी वैराग्य धारण केले पाहिजे. अहं ब्रह्मास्मि मीच ब्रह्म आहे ही जाणीव करून घ्यायची असेल तर मनरुपी गंगेत स्नान केले पाहिजे.

ज्यांना जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यरुपी समुद्रात आपली बुद्धी स्थिर करून घ्यायची असेल त्यांनी वैराग्य धारण केले पाहिजे. अहं ब्रह्मास्मि मीच ब्रह्म आहे ही जाणीव करून घ्यायची असेल तर मनरुपी गंगेत स्नान केले पाहिजे. माझ्यातला ‘मी’च ब्रह्म होऊ शकतो. यासाठी मनाची स्थिती ब्रह्मरूप व्हावी लागते. संपूर्ण विश्व परब्रह्माचे स्वरूप आहे हा अनुभव घेतला पाहिजे. स्वप्रकाशाने सर्वांना व्यापणे ही त्याची अनुभूती असते. कारण आत्मानुभवरूपी पंखाने चिदाकाशात हवा संचार करणारा समर्थ का होऊ नये. त्या चिदाकाशात जितके आपण उंच जाऊ तितका आपणाला सुखाने संचार करायला हवा तसा विस्तार होऊ शकतो. सर्वांना माझे ज्ञान नाही कारण मी योगमायेने आच्छादित झालो आहे. म्हणूनच हे जग जन्मरहित व नाशरहित आहे असे लोक स्वत:ला समजू शकत नाहीत.

सहज विचार करून पाहिला तर ज्यामध्ये मी नाही असा एकही पदार्थ, वस्तू आहे का? मीच एक सगळ्या ठिकाणी व्यापून आहे हा विश्वास मनात ठेवणे म्हणजे त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे, त्या निराकार स्वरूपाला साकार का समजावे, कारण मी स्वत: सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरिता का साधने करावीत. ह्या सर्व विचारांचा गोंधळ मनात असतो. मन श्रद्धेने युक्त होऊन एखाद्या देवतेची आराधना करते आणि मग त्या देवतेपासून मी इच्छित फळ घेतो. ही त्या मनाची खात्री असते. म्हणून ते मन आपले कार्य सिद्ध होईपर्यंत त्याची आराधना सुरू ठेवते. त्यावेळेस देवतेप्रति त्याची श्रद्धा, विश्वास कायम असतो. ही अल्पबुद्धी मनुष्य करू शकतो. तो देवतांची भक्ती करून आपले इच्छित प्राप्त करतो. अशी त्याच्या मनाची धारणा होते. थोड्या वेळासाठी हे बाजूला राहुू दे, मग वाटेल का ते का दैवत असेना, परंतु जो त्या देवतेला भजतो तो त्या देवत्वास प्राप्त होतो. म्हणजे शरीराने, मनाने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या मार्गात आहेत तो देह पडल्यावर मीच होतो. ही भावना असणे हीच ‘अहं ब्रह्मास्मि’ भावना आहे का? असे विचार आपल्या मनात कायम चालू असतात. सर्वात महत्त्वाची असते ती मनोधारणा.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक