शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारले केले महत्त्वाचे आवाहन
2
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
3
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
4
जीएसटी कपातीनंतरही गाड्या स्वस्त होणार नाहीत? सणासुदीच्या काळातही डिस्काउंट नाही, 'हे' आहे कारण
5
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
6
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
7
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...
8
जीएसटी कपातीनंतर MRP चा गोंधळ: केंद्र सरकारचा मोठा निर्णय
9
आयटीआर भरताच आरबीआयचा मोठा निर्णय; क्रेडिट कार्डद्वारे करता येणार नाही हे काम...
10
"20 रुपयांच्या 6 ऐवजी फक्त 4 च पाणीपुरी दिल्या..."; गुजरातमध्ये भररस्त्यात महिलेनं सुरू केलं आंदोलन, अन् मग...!
11
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
12
'लवकरच व्यापार करार...', ट्रम्प टॅरिफबाबत परराष्ट्र मंत्रालयाने दिली महत्वाची माहिती
13
IND vs PAK: "जसप्रीत बुमराहला मैदानात.."; सुनील गावसकरांचा एक सल्ला, पाकिस्तानची निघाली लाज
14
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
15
"सकाळी उठा, व्होटर डिलीट करा अन् पुन्हा झोपी जा...", राहुल गांधींचा ECI वर पुन्हा हल्लाबोल; BJP चा पलटवार!
16
हायव्होल्टेज ड्रामा! २० रुपयांत ६ ऐवजी दिल्या ४ पाणीपुरी; 'ती' ढसाढसा रडली, रस्त्यामध्येच बसली अन्...
17
लवकरच नवी Thar लाँच करण्याच्या तयारीत महिंद्रा, आधीच्या तुलनेत मोठे बदल होणार; जाणून घ्या, किती असणार किंमत?
18
फिटनेस मंत्र! सरळ तर सर्वच चालतात, कधीतरी उलटं चालून पाहा; फक्त ५ मिनिटंही पुरेशी
19
Navratri 2025: प्रतापगडावर नवरात्रीत का बसवले जातात दोन घट? जाणून घ्या शिवकालीन परंपरा
20
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?

‘अहं ब्रह्मास्मि’ भावना आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2019 08:59 IST

ज्यांना जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यरुपी समुद्रात आपली बुद्धी स्थिर करून घ्यायची असेल त्यांनी वैराग्य धारण केले पाहिजे. अहं ब्रह्मास्मि मीच ब्रह्म आहे ही जाणीव करून घ्यायची असेल तर मनरुपी गंगेत स्नान केले पाहिजे.

ज्यांना जीव आणि परमात्मा यांच्या ऐक्यरुपी समुद्रात आपली बुद्धी स्थिर करून घ्यायची असेल त्यांनी वैराग्य धारण केले पाहिजे. अहं ब्रह्मास्मि मीच ब्रह्म आहे ही जाणीव करून घ्यायची असेल तर मनरुपी गंगेत स्नान केले पाहिजे. माझ्यातला ‘मी’च ब्रह्म होऊ शकतो. यासाठी मनाची स्थिती ब्रह्मरूप व्हावी लागते. संपूर्ण विश्व परब्रह्माचे स्वरूप आहे हा अनुभव घेतला पाहिजे. स्वप्रकाशाने सर्वांना व्यापणे ही त्याची अनुभूती असते. कारण आत्मानुभवरूपी पंखाने चिदाकाशात हवा संचार करणारा समर्थ का होऊ नये. त्या चिदाकाशात जितके आपण उंच जाऊ तितका आपणाला सुखाने संचार करायला हवा तसा विस्तार होऊ शकतो. सर्वांना माझे ज्ञान नाही कारण मी योगमायेने आच्छादित झालो आहे. म्हणूनच हे जग जन्मरहित व नाशरहित आहे असे लोक स्वत:ला समजू शकत नाहीत.

सहज विचार करून पाहिला तर ज्यामध्ये मी नाही असा एकही पदार्थ, वस्तू आहे का? मीच एक सगळ्या ठिकाणी व्यापून आहे हा विश्वास मनात ठेवणे म्हणजे त्या अमर्याद स्वरूपाला माप का घालावे, त्या निराकार स्वरूपाला साकार का समजावे, कारण मी स्वत: सिद्ध असता माझ्या प्राप्तीकरिता का साधने करावीत. ह्या सर्व विचारांचा गोंधळ मनात असतो. मन श्रद्धेने युक्त होऊन एखाद्या देवतेची आराधना करते आणि मग त्या देवतेपासून मी इच्छित फळ घेतो. ही त्या मनाची खात्री असते. म्हणून ते मन आपले कार्य सिद्ध होईपर्यंत त्याची आराधना सुरू ठेवते. त्यावेळेस देवतेप्रति त्याची श्रद्धा, विश्वास कायम असतो. ही अल्पबुद्धी मनुष्य करू शकतो. तो देवतांची भक्ती करून आपले इच्छित प्राप्त करतो. अशी त्याच्या मनाची धारणा होते. थोड्या वेळासाठी हे बाजूला राहुू दे, मग वाटेल का ते का दैवत असेना, परंतु जो त्या देवतेला भजतो तो त्या देवत्वास प्राप्त होतो. म्हणजे शरीराने, मनाने व प्राणाने अखंड माझ्या भजनाच्या मार्गात आहेत तो देह पडल्यावर मीच होतो. ही भावना असणे हीच ‘अहं ब्रह्मास्मि’ भावना आहे का? असे विचार आपल्या मनात कायम चालू असतात. सर्वात महत्त्वाची असते ती मनोधारणा.

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज(संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष)

 

टॅग्स :spiritualअध्यात्मिक