शहरं
Join us  
Trending Stories
1
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
2
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
3
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
4
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
5
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
6
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
7
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
8
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार
9
रतन टाटांच्या आवडत्या कंपनीला मोठा धक्का? मार्केट कॅप २००९ नंतर पहिल्यांदाच नीचांकी पातळीवर
10
सोनं १ लाखांपार, का उदय कोटक यांनी भारतीय महिलांना जगातील सर्वोत्तम फंड मॅनेजर म्हटलं?
11
डॉ. शिरीष वळसंगकरांनी काही दिवसांपूर्वीच बनवलं होतं मृत्यूपत्र; धक्कादायक माहिती उघड
12
'या' ज्येष्ठ नागरिकांना आयकरात मिळते ५ लाखांची सवलत; आयटीआर भरण्याची प्रक्रिया जाणून घ्या
13
वहिनीच्या बेडरूममधून येत होते चित्रविचित्र आवाज, दिराला आला संशय, दरवाजा उघडताच... 
14
छत्रपती संभाजीनगरच्या 'तेजस्वी'चे यूपीएससीत झळाळते यश; तिसऱ्याच प्रयत्नात ९९ वी रँक
15
राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र येणार? शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका, म्हणाले...
16
Astro Tips: अनेक जोडप्यांची इच्छा असूनही त्यांना संतती सौख्य लाभत नाही, असे का? जाणून घ्या!
17
UPSC परीक्षेचा निकाल जाहीर; पुण्याचा अर्चित डोंगरे देशात तिसरा, प्रयागराजची शक्ती दुबे पहिल्या स्थानी
18
९ दिवसांत ३ शहरं! "व्हायरल झालो, आमच्याच बातम्या सर्वत्र"; जावयासह पळून गेलेली सासू म्हणाली...
19
Maharashtra Politics :'उद्धव ठाकरे युतीसाठी कमालीचे सकारात्मक, कटुता नाही'; संजय राऊतांनी एकत्र येण्याबाबत पुन्हा दिले संकेत
20
१००-२०० नाही तर ट्रम्प यांनी थेट ३५२१% लावलं टॅरिफ, पण भारताच्या 'या' कंपन्यांचे शेअर बनले रॉकेट

वास्तुशास्त्र म्हणजे काय ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2018 14:42 IST

निसर्ग नियमानुसार आपले घर कसे बांधावेयाचे शास्त्र आहे वास्तुशास्त्र. पुर्वी माणुस जंगलात ,शेतामध्ये , डोंगरात रहायचा म्हणजे निसर्गाच्या जवळ राहायचा ऊन , वारा , पाऊस , मोकळी हवा या सर्व गोष्टी शरीराला आवश्यक त्या मिळायचा त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहायचे .

- मकरंद सरदेशमुखनिसर्ग नियमानुसार आपले घर कसे बांधावेयाचे शास्त्र आहे वास्तुशास्त्र. पुर्वी माणुस जंगलात ,शेतामध्ये , डोंगरात रहायचा म्हणजे निसर्गाच्या जवळ राहायचा ऊन , वारा , पाऊस , मोकळी हवा या सर्व गोष्टी शरीराला आवश्यक त्या मिळायचा त्यामुळे त्यांचे आरोग्य चांगले राहायचे . मेडिकल प्रॉब्लेम कमी असायचे गावाकडील कोणता ही शेतकरी पहा त्याचे आरोग्य शहरातील माणसापेक्षा नक्कीच चांगले असते कारण शेतकरी शेतामध्ये दिवसातील १२ तास हवेत उजेडामध्ये  , उन्हामध्ये राहुन काम करतो आणि शहरातील माणुस १२ तास बंदिस्त रूममध्ये बसुन काम करतो .शरीराला आवश्यक हवा , उजेड , सुर्यप्रकाश मिळतच नाही त्यामुळे आरोग्याच्या समस्याया वाढत आहेत येणारी पुढची पिढी आपले वंशज हे चार भिंतीचा आत स्वतःला बांधून घेणार हे पूर्वीचा काळातील ऋषी मुनी यांना माहित होते त्यामुळे त्यांनी निसर्गनियमानुसार घर कसे बांधता येईल याचा शास्त्रोक्त अभ्यास करून मयमुनी मयासुर व विश्वकर्मा यांनी भारतीय वास्तुशास्त्राची ग्रंथरचना केली आणि वेदिक पद्धतीने बांधकाम कसे करता येईल याची शास्त्रोक्त माहिती मयमतम व विश्वकर्मा प्रकाश या ग्रंथामध्ये दिली आहे .२) वास्तुशास्त्राचे फायदे१) वास्तुशास्त्रानुसार घर असल्याने माणुस जास्तीत जास्त निसर्गाच्या जवळ रहातो.२) पृथ्वीचा मॅग्नाटिक फिल्ड नुसार उत्तरेला पाय करून झोपल्याने आरोग्य सुधारते .३) आग्नेयेला किचन असल्याने स्वयंपाक रुचकर , स्वादिष्ट , पौष्टिक होतो त्यामुळे चांगले अन्न तयार होते व शरीर सुदृढ होते .४) घर वास्तुनुसार असेल तर शिक्षण  , आरोग्य , व्यवसायत भर -भराट  उत्तम  राहते.५) शुभऊर्जा घरामध्ये संतुलित राहिल्याने आनंददायी वातावरण कायम राहते व घरातील सगळ्यांची  मानसिक , शारिरीक , अध्यात्मिक प्रगती होते .६) मुलांची शारिरीक , बौद्धिक , मानसिक , शैक्षणिक  प्रगती  चांगली  होते .७) नव नवीन कल्पना आयुष्यात सुचतात व व्यवसायात प्रगतीमध्ये चांगली वाढ होते व आर्थिक आवक चांगली राहते .८) वास्तुनूसार  घर  असेल  तर नातेवाईक संबंध व शेजारील मित्र यांच्याशी सलोख्याचे प्रेमळ संबंध राहतात .९) बांधकामाचे नियम शास्त्रोक्त पद्धतीचे असल्यामुळे केलेल बांधकाम कायम स्वरूपी टिकुन राहते .१०) पाणी , अग्नी , वायु , पृथ्वी  व आकाश या पंचतत्वांचा एकत्रीत संतुलनामुळे वास्तुमध्ये शुभ ऊर्जा कायम टिकुन राहते व घरातील सर्वांचा सर्वांगीण प्रगती चांगली होते .

(लेखकांनी वास्तुशास्त्रामध्ये डॉक्टरेट केलं असून ते पुण्यात असतात. गेली आठ वर्षे ते वास्तुविषयक सल्ला देण्याचे काम करत आहेत.www.vastutathastu.com)