शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
2
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
3
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
4
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
5
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
6
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
7
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
8
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
9
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
10
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
11
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
12
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
13
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
14
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
15
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
16
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
17
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
18
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
19
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
20
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
Daily Top 2Weekly Top 5

अध्यात्माचा खरा अर्थ ठाऊक आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 15:28 IST

आत्म्याला शुद्धता देणे, त्याची शुद्धता अनुभवणे, त्याच्या सभोवतीची परिस्थिती स्वच्छ पवित्र व पुनीत करणे म्हणजे अध्यात्मशास्त्र चोखाळणे होय.

आत्म्याला शुद्धता देणे, त्याची शुद्धता अनुभवणे, त्याच्या सभोवतीची परिस्थिती स्वच्छ पवित्र व पुनीत करणे म्हणजे अध्यात्मशास्त्र चोखाळणे होय. असे हे दिव्य शास्त्र आहे. ही जीवन विद्या, आध्यात्मिक विद्या मनुष्याला आवश्यक आहे. या ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या जीवनात निश्चितच सुखी होऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. यावर जर विचार करायला लागलात तर खोलवर जाणे आवश्यक असल्याचा प्रतिभास व्हायला वेळ लागणार नाही.

अध्यात्म आपल्याला ईश्वराबद्दलचे ज्ञान कोणाकडे आणि कोणत्यावेळी कशा पद्धतीने वागणे, अधिक चांगल्या पद्धतीने वागणे हे काटेकोरपणे अनुभवायला सांगते. अर्थात हा सुद्धा एकप्रकारचा अभ्यास मानला जातो? त्याला शास्त्र हे नाव दिले गेले आहे. या आध्यात्मिक शास्त्राचा अभ्यास करता करता मनुष्य स्वत:च्या आत्म्याकडे केंद्रित होतो. आत्म्यामध्ये विलीन होतो. त्याच्याशी तद्रूप होतो.

आपणास आत्मिक शक्ती प्राप्त व्हावी म्हणून सर्व काही करत असतो. एक गोष्ट सर्वांनी ध्यानी ठेवायला हवी. ती म्हणजे, अनेकदा आपण असे कर्म करतो जेथे आपली शक्ती नाहक वाया जाते. अशा कर्मामध्ये आपण कधीही सहभागी होऊ नये. आत्म्याची ताकद कमी होईल अशा कर्मकांडामध्ये आपण पडताच कामा नये. यालाच अध्यात्मशास्त्र म्हणतात. अनुभावाअंती अध्यात्मशास्त्र काही वेगळेच आहे, असे वाटायला लागते. याला कारण म्हणजे आपल्या जीवनात जे प्रसंग येतात, त्याकडे आपण कधीच अभ्यासू वृत्तीने बघितलेले नसते. अध्यात्म म्हणजे देव. या देवाची पूजा करणे, देव देव करणे, जप-तप करणे, देवळात जाऊन देवांच्या पाया पडणे, दान करणे, अशा एका भ्रामक कल्पनेमध्ये आपण अध्यात्माचा अर्थ डोक्यात बिंबवून घेतलेला आहे. तो चुकीचा आहे.

अध्यात्माच्या क्षेत्रात जेव्हा आपण प्रवेश करतो, त्या वेळी आपणास असे वाटायला लागते की, आपण काही गैर करीत नाही. चांगलेच करतो. आध्यात्मिक पार्श्वभूमीवर आपण सर्वसामान्यपणे आपल्या जीवनाचा पट म्हणजे पडदा वेगळ्या पद्धतीने वापरतो. आपल्या संसारातही एक पडदा असतो, परमार्थाचाही असतो. हे सगळे एवढ्याचसाठी की, देवळात गेल्यावर चांगले वागणे हे योग्यच; पण घरी आल्यानंतर वाईट वागणे; मात्र योग्य नव्हे. हे का घडते? कारण, आपण आपल्या मनात खोट्या पद्धतीने तो पडदा ठेवल्याने तो चुकीच्या पद्धतीने वापरतो. प्रसंगाचा परिपूर्ण अभ्यास नसल्याने, अभ्यासू वृती न ठेवल्याने आणि आध्यात्मिक शास्त्राचा खरा अर्थ जीवनात न लावता आल्यामुळे साहजिकच आपल्या हातून लहान-मोठ्या चुका घडतात. याचा अर्थ म्हणजे देवाचे शास्त्र आम्हास कळत नाही, ईश्वराचा आशीर्वाद आम्हास लाभत नाही.

आपण जीवनाला कंटाळू नये. ईश्वराचे आशीर्वाद सहज प्राप्त होणे शक्य नाही. आपल्या जीवनात चांगला बदल तेव्हाच घडून येईल, जेव्हा आपण श्रीगुरूंनी दिलेली उपासना चालू ठेवाल, ती व्यर्थ जाणार नाही. परमेश्वराचे कार्य आम्ही करतो आहोत तर आपली पवित्रता त्यात अडकलेली असते. परमेश्वराचे कार्य करताना पवित्रता यासाठी पाहिजे की, ती पवित्रता आपल्या आत्म्याला चांगल्या गोष्टींच्या जवळ जाण्याची संधी देते. म्हणून परमेश्वराला आवश्यक असलेली ती स्वच्छता महत्त्वाची आहे.

- संकलन : किशोर स नाईक, डोंगरी

टॅग्स :spiritualअध्यात्मिक