शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू
2
सोनिया गांधींची प्रकृती अचानक बिघडली, सर गंगाराम रुग्णालयात दाखल
3
खामेनेईंवर कोसळणार होते इस्रायली मिसाईल; डोनाल्ड ट्रम्प यांनी थांबवलं म्हणून...
4
कुंडमळा पूल घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत; जखमींच्या उपचाराचा खर्च शासन करणार
5
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
6
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
7
Pune Bridge Collapse: जुन्या पुलांचे स्ट्रक्चरल ऑडीट करण्याच्या सूचना; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
8
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
9
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
10
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
11
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
12
वळ केमिकल गोदामाला भीषण आग; एका कामगाराचा होरपळून मृत्यू
13
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
14
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
15
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
16
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
17
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
18
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
19
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
20
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!

अध्यात्माचा खरा अर्थ ठाऊक आहे का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2018 15:28 IST

आत्म्याला शुद्धता देणे, त्याची शुद्धता अनुभवणे, त्याच्या सभोवतीची परिस्थिती स्वच्छ पवित्र व पुनीत करणे म्हणजे अध्यात्मशास्त्र चोखाळणे होय.

आत्म्याला शुद्धता देणे, त्याची शुद्धता अनुभवणे, त्याच्या सभोवतीची परिस्थिती स्वच्छ पवित्र व पुनीत करणे म्हणजे अध्यात्मशास्त्र चोखाळणे होय. असे हे दिव्य शास्त्र आहे. ही जीवन विद्या, आध्यात्मिक विद्या मनुष्याला आवश्यक आहे. या ज्ञानाच्या आधारे मनुष्य आपल्या जीवनात निश्चितच सुखी होऊ शकतो. ही वस्तुस्थिती आहे. यावर जर विचार करायला लागलात तर खोलवर जाणे आवश्यक असल्याचा प्रतिभास व्हायला वेळ लागणार नाही.

अध्यात्म आपल्याला ईश्वराबद्दलचे ज्ञान कोणाकडे आणि कोणत्यावेळी कशा पद्धतीने वागणे, अधिक चांगल्या पद्धतीने वागणे हे काटेकोरपणे अनुभवायला सांगते. अर्थात हा सुद्धा एकप्रकारचा अभ्यास मानला जातो? त्याला शास्त्र हे नाव दिले गेले आहे. या आध्यात्मिक शास्त्राचा अभ्यास करता करता मनुष्य स्वत:च्या आत्म्याकडे केंद्रित होतो. आत्म्यामध्ये विलीन होतो. त्याच्याशी तद्रूप होतो.

आपणास आत्मिक शक्ती प्राप्त व्हावी म्हणून सर्व काही करत असतो. एक गोष्ट सर्वांनी ध्यानी ठेवायला हवी. ती म्हणजे, अनेकदा आपण असे कर्म करतो जेथे आपली शक्ती नाहक वाया जाते. अशा कर्मामध्ये आपण कधीही सहभागी होऊ नये. आत्म्याची ताकद कमी होईल अशा कर्मकांडामध्ये आपण पडताच कामा नये. यालाच अध्यात्मशास्त्र म्हणतात. अनुभावाअंती अध्यात्मशास्त्र काही वेगळेच आहे, असे वाटायला लागते. याला कारण म्हणजे आपल्या जीवनात जे प्रसंग येतात, त्याकडे आपण कधीच अभ्यासू वृत्तीने बघितलेले नसते. अध्यात्म म्हणजे देव. या देवाची पूजा करणे, देव देव करणे, जप-तप करणे, देवळात जाऊन देवांच्या पाया पडणे, दान करणे, अशा एका भ्रामक कल्पनेमध्ये आपण अध्यात्माचा अर्थ डोक्यात बिंबवून घेतलेला आहे. तो चुकीचा आहे.

अध्यात्माच्या क्षेत्रात जेव्हा आपण प्रवेश करतो, त्या वेळी आपणास असे वाटायला लागते की, आपण काही गैर करीत नाही. चांगलेच करतो. आध्यात्मिक पार्श्वभूमीवर आपण सर्वसामान्यपणे आपल्या जीवनाचा पट म्हणजे पडदा वेगळ्या पद्धतीने वापरतो. आपल्या संसारातही एक पडदा असतो, परमार्थाचाही असतो. हे सगळे एवढ्याचसाठी की, देवळात गेल्यावर चांगले वागणे हे योग्यच; पण घरी आल्यानंतर वाईट वागणे; मात्र योग्य नव्हे. हे का घडते? कारण, आपण आपल्या मनात खोट्या पद्धतीने तो पडदा ठेवल्याने तो चुकीच्या पद्धतीने वापरतो. प्रसंगाचा परिपूर्ण अभ्यास नसल्याने, अभ्यासू वृती न ठेवल्याने आणि आध्यात्मिक शास्त्राचा खरा अर्थ जीवनात न लावता आल्यामुळे साहजिकच आपल्या हातून लहान-मोठ्या चुका घडतात. याचा अर्थ म्हणजे देवाचे शास्त्र आम्हास कळत नाही, ईश्वराचा आशीर्वाद आम्हास लाभत नाही.

आपण जीवनाला कंटाळू नये. ईश्वराचे आशीर्वाद सहज प्राप्त होणे शक्य नाही. आपल्या जीवनात चांगला बदल तेव्हाच घडून येईल, जेव्हा आपण श्रीगुरूंनी दिलेली उपासना चालू ठेवाल, ती व्यर्थ जाणार नाही. परमेश्वराचे कार्य आम्ही करतो आहोत तर आपली पवित्रता त्यात अडकलेली असते. परमेश्वराचे कार्य करताना पवित्रता यासाठी पाहिजे की, ती पवित्रता आपल्या आत्म्याला चांगल्या गोष्टींच्या जवळ जाण्याची संधी देते. म्हणून परमेश्वराला आवश्यक असलेली ती स्वच्छता महत्त्वाची आहे.

- संकलन : किशोर स नाईक, डोंगरी

टॅग्स :spiritualअध्यात्मिक