शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

कोण श्रेष्ठ? कर्म, भाग्य की बुद्धी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 29, 2020 05:21 IST

प्रत्येक व्यक्तीला चांगले-वाईट, चूक-बरोबरचे ज्ञान आहे. ते समजल्यानंतर काय करायचे याचे स्वातंत्र्यही आहे. म्हणूनच सर्वांचे भाग्य वेगवेगळे आहे.

- नीता ब्रह्मकुमारी‘देवा! मला चांगली बुद्धी दे’ अशी लहानपणी ईश्वराजवळ प्रार्थना करायचो. खरं तर मनुष्य जेव्हा जन्म घेतो तेव्हा ईश्वराकडून आपल्याला विवेक आणि स्वतंत्रता मिळते. प्रत्येक व्यक्तीला चांगले-वाईट, चूक-बरोबरचे ज्ञान आहे. ते समजल्यानंतर काय करायचे याचे स्वातंत्र्यही आहे. म्हणूनच सर्वांचे भाग्य वेगवेगळे आहे.एकदा एक राजा जंगलामध्ये शिकार करण्यास गेला. काही अंतरावर त्याला काही लोकांच्या भांडणाचा आवाज ऐकायला येतो. आवाजाच्या दिशेने तो त्या ठिकाणी पोहोचतो तेव्हा तिथे तीन व्यक्ती भांडताना दिसतात. राजाला बघताच ते स्तब्ध उभे राहतात आणि गोंधळून राजालाच प्रश्न विचारतात की, ‘राजा, तुम्हीच सांगा आमच्यामध्ये श्रेष्ठ कोण?’ राजा आश्चर्यचकित होऊन म्हणतो, पहिले तुम्ही मला स्वत:चा परिचय तरी द्या. पहिली व्यक्ती म्हणते मी कर्म आहे, दुसरा म्हणतो मी भाग्य आहे आणि तिसरा म्हणतो मी बुद्धी आहे. राजाला पण प्रश्न पडतो. राजा उत्तर देतो की, ‘कोण श्रेष्ठ आहे हे समजण्यासाठी तुम्हाला काहीतरी करून दाखवायला लागेल.’ त्याच वेळी एक लाकूडतोड्या जाताना त्यांना दिसतो. राजा त्याच्याकडे बोट दाखवून म्हणतो की, या लाकूडतोड्यामध्ये प्रवेश करून प्रत्येकाला आपली श्रेष्ठता दाखवावी लागेल. सात दिवसांच्या कालावधीमध्ये तुम्ही किती श्रेष्ठ आहात याचे प्रमाण आपल्या सर्वांनाच मिळेल. ठीक आहे? तिघेही या गोष्टींसाठी मंजुरी देतात. पहिला नंबर ‘कर्म’ त्या लाकूडतोड्यामध्ये प्रवेश करतो. कर्म करण्याची शक्ती त्या लाकूडतोड्याकडे आहे. परंतु भाग्य आणि बुद्धी नाही. सकाळपासून संध्याकाळपर्यंत कर्मठ होऊन तो फक्त लाकडे तोडत राहतो. सात ही दिवस तो खूप परिश्रम करतो. लाकडाचा ढीग तयार होतो, परंतु भाग्य आणि बुद्धी नसल्यामुळे लाकडांचा व्यापार करून पैसे कमवण्याच्या शक्तीचा अभाव दिसून येतो. सात दिवसांनंतरही त्याची परिस्थिती तशीच राहते. (क्रमश:)

टॅग्स :spiritualअध्यात्मिक