शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
3
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
4
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
5
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
6
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
7
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
8
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
9
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
10
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
11
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
12
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
13
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
14
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन
15
राजा रघुवंशी हत्याकांडाची पुनरावृत्ती; पैसे देऊन गुंड बोलावले, पत्नीने प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं!
16
आम्ही मोसादचं हेडक्वार्टर उडवलं, इस्रायली मिलिट्री इंटेलिजन्सलाही निशाणा बनवलं; इराणचा मोठा दावा
17
IND vs ENG : तेंडुलकर-अँडरसन ट्रॉफीसह आता मालिका विजेत्या कर्णधाराला दिले जाणार 'पतौडी मेडल'
18
मस्करीची झाली कुस्करी! मित्राने चिडविले म्हणून ठोसा मारला, त्याने हॉस्पिटलमध्ये जीव सोडला
19
"आता आमची वेळ आलीय..."; इस्त्रायल-इराण युद्धाला नवं वळण, खामेनेईविरोधात पुकारला एल्गार
20
Kareena Kapoor : "मी २ महिने शाहिदच्या मागे लागलेली, खूप सारे SMS करायची, मी पहिली व्यक्ती होती, जी..."

कर्मनिष्ठा आणि श्रमप्रतिष्ठेतूनच कल्याण साध्य होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 6, 2019 18:06 IST

निष्काम कर्म ही संकल्पना अत्यंत विरळ झाली आहे.

कामे सर्वचि मूल्यवान | त्यांची योग्यता समसमान ||श्रीकृष्णे सिध्द केले उच्छिष्टे काढून | ओढिले ढोरे विठ्ठले ||

केल्या जाणाऱ्या सर्व विकासोन्मूख कामांची योग्यता सामाजिकदृष्टया सारखीच असून विकास कामांत त्यांचा वाटा हा कमी किंवा जास्त नसतो असे राष्ट्रसंत तूकडोजी महाराज ग्रामविकासाचे महत्व सांगतांना नमुद करतात. कोणीही सर्व विद्या आत्मसात करित नाही. परिस्थितीनुसार व श्रमपरत्वे माणूस कला अवगत करतो. जो तिन्ही जगाचा स्वामी, ब्रम्हांड रचेता पांडवाचे सारथ्य करितो ही देखील मानवी रुपात महानता आहेच. एकदा का एखादया कार्यास स्वत: होऊन वाहून घेतले की त्यात समर्पणाची भावना ओतप्रोत भरलेली असावी. स्वत:च्या विकासासाठी आणि पर्यायाने देशाच्या विकासासाठी आपल्या वाटयाला आलेली कामे तन्मयतेने, सचोटीने व कार्यकूशलतेने करणे म्हणजेच राष्ट्रभक्ती आहे.

कार्य ही परंपरा नसून ध्येय असावे लागते. बहूतांश वेळेस कामे न करताच श्रेयवादात माणसे अडकतात आणि नामोहरम होतात. “कर्मण्ये वाधिकारस्ये मा फलेषु कदाचन” असे गीतेत श्रीकृष्णाने अर्जूनाला सांगितले आहे. काम करीत राहणे व फळाची अपेक्षा करु नये असे असतांना देखील काम न करता फलप्राप्ती कशी होईल ही प्रवृत्ती बळावत आहे. काम न करिता दाम, नाम आणि पदाची अपेक्षा हया विकृती बळावल्या आहेतच. प्रत्येक क्षेत्रात आत्मचिंतन होण्याची गरज असून कर्म हीच पूजा आहे यांचा विचार ठासून रुजविण्याची गरज आज निर्माण झाली आहे.            खरे नाम विष्काम ही ग्रामसेवा |            झटू सर्वभावे करु स्वर्ग गावा ||            कळो हे वळो, देह कार्यी पडू दे |            घडु दे प्रभो ! एवढे हे घडू दे ||कार्यासक्ती कशी असावी याचे हे ज्वलंत भाष्य आहे आपल्या हातून असे कार्य घडणे गरजेचे आहे जे निष्काम स्वरुपाचे असावे. आपण जेथे वावरतो तेथे स्वर्गासम भास झाला पाहीजे. असे मागने काय असावे तर मरावे परी किर्तीरुपी उरावे, पण असे घडतांना दिसते का? याचा फार विचार करण्याची गरजच नाही कारण निष्काम कर्म ही संकल्पना अत्यंत विरळ झाली आहे.

व्यक्ती कर्म करण्यासाठी स्वतंत्र आहे. कर्म-फळ संबंध नैतिकतेच्या दृष्टीने अत्यंत महत्वपूर्ण आहे. यालाच कर्मवादाचा सिध्दांत म्हणतात. संत मीराबाई, सूरदास, कबीर इत्यादी कवींनी कर्माची धारणा सूस्पष्ट करित असताना ”कर्मगति टारे नही टरै | जो जस करै सो फल चाखा” असे सांगितले आहेच. कर्माची व फळाची प्राप्ती एकाच वेळी शक्य नसते अर्थात दोहोत खूप अंतर असते. कर्मावस्थेत कर्ता आणि फळावस्थेत भोक्ता असे असेल तर कर्मावस्थेतील कर्त्यास त्याची फलप्राप्ती होत नाही. जर कर्म करणारा फलप्राप्तीवेळी बदलला तर फलप्राप्तीचा उपभोक्ता कोण ? अशा परिस्थितीत दोन दोष निर्माण होण्याची शक्यता असते. एक कृत प्रणाश म्हणजे केलेले कर्म नष्ट होणे आणि दूसरे अकृताभ्यूगम म्हणजे अकृत कर्माचे फळ. यावरुन असे स्पष्टपणे जागवते की कर्मफळ हे निश्चित प्राप्त होतेच.

कर्म फळ संबंध कर्त्याच्या इच्छेवर नसून कर्माच्या स्वरुपावर अवलंबून असते. जसे कर्म तसे फळ या उक्तीशी साधर्म्यता निष्पण होते वर्तमानात केलेले सदाचरण प्रत्येकाच्या भावी सूखी आयूष्याची उपलब्धी असते. कर्म करित असतांना व्यक्तीस अहंभाव अर्थात कर्ताभा असता कामा नये. कोणतेही कर्म हे विकार रहित असणे गरजेचे आहे. आचारभाव व इतरांच्या कल्याणाच्या दृष्टीने केलेले कर्म हे पूण्य मानले जाते. ज्या विचारामूळे व कर्मामूळे मनूष्य निसर्ग, पशू, पक्षी यांची हानी होते हे पापकर्म म्हणतात. कर्म उपासना आणि ज्ञान “त्रिकांड वेद हे प्रमाण ज्ञानाचे होते विज्ञान, परब्रम्ही” असे समर्थांनी म्हटले आहे. आपले कर्म, आणि ज्ञान याचा संगम होऊन परोपकारी क्रियानिर्मीती होणे ही काळाची गरज आहे. परंतू कर्म हे विज्ञाननिष्ट व समवर्ती विचाराचे असणे गरजेचे आहे. कर्मनिष्ठा ही सर्वश्रेष्ट तर आहेच कारण त्यातूनच मानवाच्या विकासाची बीजे पेरली जातात. सूकर्माधिष्टीत व्यक्ती स्वत:चा विकास तर करतोच त्यासोबतच जनकल्याणास देखील तो पूरक असतो.

आजच्या कालावधीत कर्मनिष्ठा आणि श्रमप्रतिष्ठा आवश्यक झाल्या आहेत. ज्यांच्याकडे हया गोष्टी आढळतात त्यांच्या हातून मानव कल्याण होणे शक्य आहे म्हणूनच प्रार्थना केली आहे की, “तूझ्या श्रमास प्रतिष्ठा मिळो सकळांचे लक्ष तूजकडे वळो, मानवतेचे तेज झळझळो विश्वामाजी या योगे”.

- डॉ भालचंद्र ना. संगनवार

( लेखक लातूर येथे वरिष्ठ भूवैज्ञानिक आहेत )

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिकspiritualअध्यात्मिक