शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात तांत्रिक बिघाड; दिल्ली-पॅरिस विमानाचे उड्डाण रद्द
2
"अल्लाहच्या मदतीने लवकरच..."; कुरानमधील एक आयत शेअर करत खामेनेई यांची इस्रायलला थेट धमकी!
3
"सोनम रघुवंशीने आपल्या आजारी वडिलांच्या आरोग्यासाठी माझ्या भावाचा बळी दिला"
4
मृत्यूपासून वाचायचे असेल तर तातडीने हे काम करा; इराणचा अधिकाऱ्यांसाठी नवा फर्मान
5
इराण-इस्रायल युद्धाचा बाजारावर परिणाम; सेन्सेक्स-निफ्टी गडगडले; फक्त 'या' सेक्टरमध्ये वाढ
6
आषाढी एकादशी २०२५: पंढरपूर वारीसाठी रेल्वेकडून ८० ट्रेन, वारकऱ्यांसाठी विशेष सेवा चालवणार
7
"मला वाटलं कार्यक्रम उद्या आहे, म्हणून..."; बडगुजरांचा पक्षप्रवेश होताच चंद्रशेखर बावनकुळेंनी काय म्हटलं?
8
Mumbai: संपत्तीसाठी मुलाची वृद्ध आईला मारहाण!
9
या छोट्याशा देशाने घेतली भारतीयांची जबाबदारी! इराणमधील ११० विद्यार्थी सीमेवर पोहोचले...
10
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
11
परेश रावल यांच्यासोबतच्या वादावर अक्षय कुमारची प्रतिक्रिया, म्हणाला, "मला खात्री आहे की..."
12
Mumbai: भर पावसात रेनकोटसह कुणी रडत तर कुणी हसत पोहोचले शाळेत!
13
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
14
इस्रायलने इराणवर केलेल्या हवाई हल्ल्यात किती लोकांचा मृत्यू झाला? दूतावासाने जारी केली धक्कादायक आकडेवारी
15
रिक्षा, दुचाकी कचऱ्यासारख्या वाहून गेल्या; गुजरातमध्ये तुफान पाऊस, व्हिडीओ व्हायरल
16
Rohit Sharma: तुमची भांडणं होतात का? हरभजनच्या प्रश्नावर रोहित शर्मा पत्नी रितिकासमोरच म्हणाला...
17
चार दिवस कसोटीचे! रुपडं बदलणार; पण टीम इंडियासह हे २ संघ जुनी परंपरा जपणार?
18
Ashadhi Ekadashi 2025: यंदा आषाढी एकादशी आणि चतुर्मासाची सुरुवात कधी ते जाणून घ्या!
19
Mumbai: मुंबईतील दोन आंतरराष्ट्रीय शाळांना बॉम्बची धमकी, तपासात असं समजलं की...
20
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव

निर्बुद्धांच्या मार्गांवर असते फक्त काट्यांची शोकांतिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 06:30 IST

दूध तापवलं नाही तर ते जसं नासून जातं, अति तापवलं तर ते जसं जळून जातं आणि हवं तितकंच तापवलं तर त्यावर माया ममतेची जाडजूड साय येते.

- विजयराज बोधनकरदूध तापवलं नाही तर ते जसं नासून जातं, अति तापवलं तर ते जसं जळून जातं आणि हवं तितकंच तापवलं तर त्यावर माया ममतेची जाडजूड साय येते. अगदी माणसाचंही आयुष्यही दुधासारखंच आहे. आयुष्यात काहीच केलं नाहीतर आयुष्य दुधासारखं नासून जातं, अगदी तसंच अति सुखाच्या मागे लागलं तर सुखही नासून जातं. जसे दुधापासून कापलेले लिंबू चार हात दूर ठेवावे लागते, तसे षड्रिपूचे लिंबूही दूर ठेवावे लागते. दुधासाठी लिंबू जसे विष असते, तसे उत्तम जगण्यात अति सुखाचे आगमन झाले की माणसाचं मन अस्थिर होत जातं आणि आपल्या अवतीभोवती आपला द्वेष करणारे स्वार्थ साधू पाहणाीे भकास माणसे गोळा होत राहतात आणि ते लिंबूसारखेच असतात.दुधात लिंबू पिळणारी मंथरा वृत्ती आजही आपल्या आजूबाजूला घुटमळत राहू शकते. अशा बऱ्याच घातकी वृत्तीला जिंकणे हेच महत्त्वाचे असते, बरेचदा ती मंथरा मनातही दडलेली असते. म्हणून तर संतसंगतीची परंपरा आपल्या देशात जन्माला आली. चार शब्द कानावर पडले तरी ते औषधासारखे कामी पडतात. अति दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर मनाला तिथपर्यंत नेण्याअगोदरच मनातल्या सत्संगाची दारे उघडली तर मनातली, डोक्यातली भुतावळ हळूहळू पळून जाऊ शकते. त्यासाठी कुठल्याही सत्संगाच्या मंडपात जाण्याची गरज नसते. आपल्या मनबुद्धीच्या मंडपात आपणच आपला चिंतनाचा सत्संग करू शकतो, अज्ञान आणि ज्ञान याचा गुंता फक्त आपणच सोडू शकतो.अति सुखाची कुटुंबाला लागण झाली की समजायचे आता सत्संगाची वेळ आली आहे. षड्रिपूंचा विजय होण्याअगोदर आपले सत्यवृत्तीचे शस्त्र तयार ठेवले पाहिजे. मोहात अडकून कैकयीचे, रावणाचे काय झाले हे आपण जाणतो. आयुष्यात अकारण मोहात माणूस गुरफटत जातो आणि शेवटी हाती येत काय? केवळ निराशा, बुद्धाच्या मार्गांवर शांती आहे, निर्बुद्धांच्या मार्गांवर असते फक्त काट्यांची शोकांतिका.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक