शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

निर्बुद्धांच्या मार्गांवर असते फक्त काट्यांची शोकांतिका

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2019 06:30 IST

दूध तापवलं नाही तर ते जसं नासून जातं, अति तापवलं तर ते जसं जळून जातं आणि हवं तितकंच तापवलं तर त्यावर माया ममतेची जाडजूड साय येते.

- विजयराज बोधनकरदूध तापवलं नाही तर ते जसं नासून जातं, अति तापवलं तर ते जसं जळून जातं आणि हवं तितकंच तापवलं तर त्यावर माया ममतेची जाडजूड साय येते. अगदी माणसाचंही आयुष्यही दुधासारखंच आहे. आयुष्यात काहीच केलं नाहीतर आयुष्य दुधासारखं नासून जातं, अगदी तसंच अति सुखाच्या मागे लागलं तर सुखही नासून जातं. जसे दुधापासून कापलेले लिंबू चार हात दूर ठेवावे लागते, तसे षड्रिपूचे लिंबूही दूर ठेवावे लागते. दुधासाठी लिंबू जसे विष असते, तसे उत्तम जगण्यात अति सुखाचे आगमन झाले की माणसाचं मन अस्थिर होत जातं आणि आपल्या अवतीभोवती आपला द्वेष करणारे स्वार्थ साधू पाहणाीे भकास माणसे गोळा होत राहतात आणि ते लिंबूसारखेच असतात.दुधात लिंबू पिळणारी मंथरा वृत्ती आजही आपल्या आजूबाजूला घुटमळत राहू शकते. अशा बऱ्याच घातकी वृत्तीला जिंकणे हेच महत्त्वाचे असते, बरेचदा ती मंथरा मनातही दडलेली असते. म्हणून तर संतसंगतीची परंपरा आपल्या देशात जन्माला आली. चार शब्द कानावर पडले तरी ते औषधासारखे कामी पडतात. अति दु:खाचा डोंगर कोसळल्यानंतर मनाला तिथपर्यंत नेण्याअगोदरच मनातल्या सत्संगाची दारे उघडली तर मनातली, डोक्यातली भुतावळ हळूहळू पळून जाऊ शकते. त्यासाठी कुठल्याही सत्संगाच्या मंडपात जाण्याची गरज नसते. आपल्या मनबुद्धीच्या मंडपात आपणच आपला चिंतनाचा सत्संग करू शकतो, अज्ञान आणि ज्ञान याचा गुंता फक्त आपणच सोडू शकतो.अति सुखाची कुटुंबाला लागण झाली की समजायचे आता सत्संगाची वेळ आली आहे. षड्रिपूंचा विजय होण्याअगोदर आपले सत्यवृत्तीचे शस्त्र तयार ठेवले पाहिजे. मोहात अडकून कैकयीचे, रावणाचे काय झाले हे आपण जाणतो. आयुष्यात अकारण मोहात माणूस गुरफटत जातो आणि शेवटी हाती येत काय? केवळ निराशा, बुद्धाच्या मार्गांवर शांती आहे, निर्बुद्धांच्या मार्गांवर असते फक्त काट्यांची शोकांतिका.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक