शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
5
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
6
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
7
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
8
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
9
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
10
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
11
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
12
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
13
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
14
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
15
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
16
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
17
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
18
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
19
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
20
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?

आनंद तरंग - जीवसृष्टीचे कल्याण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2020 01:45 IST

सद्गुरू जग्गी वासुदेव

विकास आणि समृद्धी म्हणजे काय, हे आपण पुन्हा एकदा समजावून घेणे आवश्यक आहे. समृद्धी म्हणजे केवळ जे आहे त्यापेक्षा अधिक, त्यापेक्षा अधिक, त्याहीपेक्षा अधिक असे नाही. आपल्याला जगण्यासाठी केवळ एकच ग्रह उपलब्ध आहे. आपण निरंतरपणे अधिक आणि अधिक पाहिजे याच्या मागे लागू शकत नाही. आपल्याकडे उपलब्ध असणाऱ्या संसाधनांमधूनच प्रत्येकाचे कल्याण करण्याचे मार्ग समाजाने शोधून काढणे आवश्यक आहे. आशियामधील सर्वांत मोठे दु:ख म्हणजे गेल्या काही दशकांमध्ये अनेक देशांनी पाश्चात्य देशांच्या समाजाने त्यांना कसे घडविले याचे अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. मात्र, हे पूर्वेकडील लोकांचे विचार, भावना आणि कार्य करण्याच्या चौकटीत बसलेले नाही आणि त्यामुळे लोकांना भयंकर संघर्षाचा सामना करावा लागत आहे.

अनेक धोरणकर्ते एका यशस्वी संस्कृतीने प्रभावित झाले आहेत आणि ती इतरत्र अमलात आणताना अनेक दु:खं आणि संकटे ओढवून घेतली आहेत. हे योग्य किंवा अयोग्य आहे हा प्रश्न मुळीच नाही. हा प्रश्न केवळ एखादी संस्कृती किंवा राष्ट्रासाठी काय सुसंगत असेल याचा आहे. इतिहासात प्रथमच, एक मानवजात म्हणून, आपल्याकडे पृथ्वीवरील लोकांच्या सर्व समस्या सोडविण्यासाठी आवश्यक असणारी संसाधने, तंत्रज्ञान व क्षमता उपलब्ध आहे. सर्वसमावेशक मानवी चैतन्य या एकाच गोष्टीचा अभाव जाणवतो. समाजाने अशा योग्य व्यक्ती निर्माण करणे आवश्यक आहे, ज्यांचा जीवनाकडे पाहण्याचा सर्वव्यापी दृष्टिकोन आहे. जर सहृदय आणि करुणेने भरलेली अर्थव्यवस्था निर्माण करायची असेल, जेथे प्रत्येक मनुष्याला आपले कार्यकौशल्य वापरता येऊ शकते, तर हे फार महत्त्वाचे आहे. सामाजिक धोरणे अधिकाधिक सर्वसमावेशकतेच्या जाणिवेतून आली पाहिजेत. मुख्यत: प्रत्येक मनुष्याने पृथ्वीवरील सर्व जिवांच्या कल्याणाकडे लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे. हेच मूलभूत धोरण असले पाहिजे.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक