शहरं
Join us  
Trending Stories
1
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदारला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
2
पाकिस्तानला जाणारे असे किती पाणी रोखू शकतो भारत? सिंधू जल कराराने तीन युद्धे झेलली, पण...
3
Western Railway Megablock: पश्चिम रेल्वेवर ३५ तासांचा मेगाब्लॉक, २६ ते २८ एप्रिलदरम्यान तब्बल १६३ लोकल फेऱ्या रद्द
4
"न्यूयॉर्क टाइम्स, तो दहशतवादी हल्लाच होता!’’ त्या उल्लेखावरून आघाडीच्या वृत्तपत्राला अमेरिकन सरकारने झापले  
5
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
6
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
7
EPFO ३ दिवसांत देणार ५ लाख रुपये, कागदपत्रांशिवायच होईल काम; काय आहे सुविधा?
8
मुलाला चांगले मार्क्स देऊन वर्गात पहिला आणतो; शिक्षकांकडून महिला पालकावर वारंवार बलात्कार
9
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
10
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
11
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
12
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
13
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
14
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
15
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
16
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
17
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
18
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
19
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
20
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 

आनंद तरंग - जीवन जगण्याची विद्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 4, 2020 01:42 IST

खरं म्हणजे तेव्हाच आपलं जीवनशिल्प परिपूर्ण होतं आणि ते कसं करायचं, हे समजावून देणारं जीवनाचं शास्त्र म्हणजे ‘जीवनविद्या’! जीवन जगण्याची विद्या! अशा या जीवनविद्येचे अनेक पैलू आपण आतापर्यंतच्या लेखांमध्ये पाहिले, अभ्यासले

प्रल्हाद वामनराव पैमित्रांनो, शिल्पकला जाणणारा शिल्प बनवू शकतो. चित्रकार सुंदर चित्र काढतो. शास्त्रज्ञ वेगवेगळे शोध लावतात. शेतकरी धान्य पिकवितात, तसेच वेगवेगळ्या कारखान्यांमध्ये अनेक प्रकारची कामे वेगवेगळी माणसे करीत असतात. या सगळ्या मंडळींकडे ती-ती विशिष्ट कामे करण्याचे ज्ञान असते. त्या ज्ञानाच्या आधारे काम करून जीवन जगण्यासाठी लागणारा पैसा ते मिळवितात आणि आपल्या अनेक गरजा पूर्ण करतात. आता जरा विचार करूया! वरील सर्वांनी जीवनासाठी मेहनत, कष्ट, श्रम केलेले आहेत. बरोबर! पण तरीही प्रश्न असा येतो की, गरजा जरी पूर्ण झाल्या तरी ते पूर्ण समाधानी, सुखी आहेत का? जीवनाचं शास्त्र त्यांना माहीत आहे का? म्हणजे जीवनात एखादी समस्या आल्यावर ते त्या समस्येला कसे सामोरे जातात, सुख-दु:खामध्ये त्यांचे विचार कसे असतात, स्वत:बरोबरच इतरांच्याही प्रगतीचा ते विचार करतात का, परस्परांशी त्यांचे सलोख्याचे संबंध आहेत का? मुलांनो, आपले यशस्वी जीवनशिल्प घडवत असताना इतरांच्या जीवनशिल्पालाही आपला हातभार नकळतपणे लागत असतो.

खरं म्हणजे तेव्हाच आपलं जीवनशिल्प परिपूर्ण होतं आणि ते कसं करायचं, हे समजावून देणारं जीवनाचं शास्त्र म्हणजे ‘जीवनविद्या’! जीवन जगण्याची विद्या! अशा या जीवनविद्येचे अनेक पैलू आपण आतापर्यंतच्या लेखांमध्ये पाहिले, अभ्यासले. जीवनविद्येच्या या शास्त्राचा पाया आहे. आपल्या ऋषिमुनींचे तत्त्वज्ञान, संतांची शिकवण, सद्गुरू वामनराव पै यांना त्यांच्या जीवनात आलेले अनुभव आणि आपल्या सद्गुरूंच्या आशीर्वादाने त्यांनी त्यावर केलेले सखोल चिंतन! त्यामुळे हे शास्त्र निश्चितच विश्वसनीय आणि शाश्वत आहे. जीवनविद्येची गुरुकिल्ली निसर्गनियमांवर आधारित आहे. मानवी संस्कृतीशी संबंधित आहे आणि विश्वातील प्रत्येक माणसासाठी उपयुक्त आहे. कारण, जीवनविद्या सांगते ‘तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार!’

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक