शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

आत्मोद्धाराची वाट मोकळी करणारी वारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2019 09:13 IST

आपल्या इष्टदेवतेची त्यांनी कास धरलेली असते. सर्वांना समानतेने पाहणारा, सर्वांमध्ये विठ्ठलरूप बघणारा वारकरी दुस-यांच्या दु:खाने हळहळ व्यक्त करतो

- डॉ. तुळशीराम गुट्टे महाराजआता सध्या वारकऱ्यांना पंढरपूरचे वेध लागले आहेत. महाराष्ट्रात हा मोठा उत्सव आहे. ‘पंढरपूरची वारी’ हा अनेक पिढ्यांचा ठेवा आहे. न चुकता दरवर्षी वारी करणारी अनेक घराणी आहेत. वारकऱ्यांचा मूळ स्वभाव सात्त्विक होय. कारण वारी सात्त्विकतेतून येते. वारक-यांचे ‘मन’ निर्मळ असते. आपल्या मनाच्या भावछटा वारकरी वारीत व्यक्त करतो. प्राचीन काळापासून वारकरी एकनिष्ठेने राहातो. वारक-यांचे मन अढळ असते. आपल्या ध्येयासाठी तो जागृत असतो. स्व-तत्त्वाची त्याला जाणीव असते.

आपल्या इष्टदेवतेची त्यांनी कास धरलेली असते. सर्वांना समानतेने पाहणारा, सर्वांमध्ये विठ्ठलरूप बघणारा वारकरी दुस-यांच्या दु:खाने हळहळ व्यक्त करतो. दुस-याच्या सुखात आनंदाने सहभागी होणारा, छल-कपट न करणारा, वारकरी विठ्ठलाच्या नामस्मरणात रमतो. मिळेल तेथे निवारा शोधणारा, पंढरीचा आवडता असणारा वारकरी जगण्याचे भान आणून देत असतो. वारक-यांचे मन पवित्र असते. चिखल, पाऊस, वारा याची तमा न बाळगता तो आनंदाने माउलींसोबत चालतो. माउलींंवर विश्वास ठेवून जगत असतो.

कर्तृत्वाची मशागत करत असतो. प्रेमाची शिदोरी वाटत असतो. अंतर्बाह्य एका विठ्ठलाला शोधत असतो. वारक-यांच्या मनाची स्थिती, लय, गती विठ्ठल होऊन जाते. जगत्रूप विठ्ठलरूप आहे, असे समजून चालतो तो वारकरी. समानतेची बीजतत्त्वे वारीत सापडतात. धर्माची परिभाषा वारीत कळते. आत्मोद्धाराची वाट मोकळी होते. कर्म-धर्माची शिकवण वारीत मिळते. वारक-यांचे भांडवल म्हणजे प्राणिमात्रावर दया करणे. समाजाला नैतिक अधिष्ठान प्राप्त करून देणे होय.

पाखंडी लोकांचे खंडण करणे. कर्मकांडाला छेद देणे, भागवत धर्माचा विस्तार करणे, हे वारकरी सातत्याने करत असतो. प्राचीन काळापासून-आधुनिक काळापर्यंत वारकरी तग धरत आहे. अनेक शासक आले तरी वारकरी मात्र डगमगला नाही. अढळपणे आपले कार्य करीत राहिला. वारक-यांचे मन कणखर असते. दया, धर्म, नीती, अहिंसा या मूल्यांचा तो पुरस्कर्ता आहे. सातत्य त्यांच्या जीवनाचे वैशिष्ट्य असते. मनाची स्थिरता कशी करावी वारक-यांकडून शिकावे. वारक-यांचे मन अथांग सागरासारखे असते. अखंडितपणे मनाला सावरणारे असते. मनाचे मनपण वारीत कळते.(लेखक हे संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

टॅग्स :Pandharpur Wariपंढरपूर वारीspiritualअध्यात्मिक