शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

आनंदाचं गाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 16, 2019 18:49 IST

प्रत्येकानं बालपणी घेतलेला हा रम्य अनुभव. यातलं सर्वात महत्त्वाचं आहे ते ‘मामाचं गाव’.

- रमेश सप्रेकाही बालगीतं मराठीत अमर झालीयत. तशी बडबडगीतं (नर्सरी -हाईम्स) ध्वनीगीतं, कृतीगीतं पिढय़ानपिढय़ा चालत आलेली असतात. काऊचिऊच्या गोष्टीही अशाच चिरंजीव असतात; पण काही बालगीतं (चित्रपट गीतंसुद्धा) अशीच बालांच्या तसेच मोठय़ांच्याही मनात घर करून बसतात. जशी  ‘सांग सांग भोलानाथ, पाऊस पडेल काय?’, ‘ये रे ये रे पावसा, तुला देतो पैसा’, ‘नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच’ अशी अनेक गीतं आहेत. यातलंच एक गीत आहे ‘झुक झुक झुक झुक आगीनगाडी, धुरांच्या रेषा हवेत काढी, पळती झाडे पाहू याùù मामाच्या गावाला जाऊ याùù’ 

प्रत्येकानं बालपणी घेतलेला हा रम्य अनुभव. यातलं सर्वात महत्त्वाचं आहे ते ‘मामाचं गाव’. मुलांच्या दृष्टीनं आनंद निधान, आनंदाची खाण किंवा आनंदाचा खजिना म्हणजे मामाचं गाव. तिथं जणू मुक्तसंचार असतो. काहीही करायचं जणू लायसन्सच मुलंना मिळतं; पण ‘मामाचा गाव’ हा मुलांच्या दृष्टीनं आनंदाचा गाव असला तरी मामा-मामी, घरातील इतर वडील मंडळी, त्या गावातील लोक, त्यांचे व्यवहार हे इतर गावाप्रमाणेच सुखाच्या अंगानं कमी नि दु:खाच्या अंगानं अधिक प्रमाणात जात असतात. मग ‘आनंदाचा गाव’ असं म्हणून काही नसतंच का? ‘आनंदाचा डोह’ जर असतो तर ‘आनंदाचं गाव’ का नसावं?

जरा विचार करून पाहिलं तर ते असतंच असतं. बाहेर कुठं नाही तर आपल्या (प्रत्येकाच्या) आतच असतं. म्हणून तिथं पोचणं अवघड असतं. जिथं मी आहेच तिथं आणखी कसं पोचायचं? संतांनी आपल्या जीवनात याचं प्रात्यक्षिक करून दाखवलं. गीतेत एक महत्त्वाचा शब्दप्रयोग या संदर्भात येतो. ‘इंद्रियग्राम’ म्हणजे आपल्या शरीराच्या सा:या इंद्रियांचा समूह किंवा गाव. इंद्रियांच्या गावात मजेत, आरामात विहार करणं हे सहज शक्य आहे. यासाठीही शब्दप्रयोग वापरलाय इंद्रियाराम!

या दोन्ही शब्दप्रयोगात महत्त्वाचा शब्द आहे इंद्रियं. म्हणजे शरीराचे अवयव. आनंद हा इंद्रीय-मन-बुद्धी यांच्या पलिकडे असणारा नि तिथून आपल्यापर्यंत येणारा अनुभव आहे. म्हणजे आनंदाचं गाव वसलंय आत, पण आपण आनंद अनुभवायचा असतो जीवनात. आनंदाचा उगम जरी असला तरी तो आपल्या तनामनातून बाहेर बरसत असतो. वाहत असतो. अखंडपणे. आपल्याला या आनंदाची जाणीव मात्र असली पाहिजे. 

एका साधूला विचारलं, ‘आपलं नाव काय? त्यानं उत्तर दिलं ‘आनंद’, ‘आपले गाव?’ याही प्रश्नाला उत्तर ‘आनंद’ आणि ‘आपलं काम काय’ याचं उत्तरही ‘आनंद’च होतं. त्या साधूबद्दल सर्वाना प्रचंड कुतूहल असायचं. हा साधना-उपासना-पूजा-मंत्र-जप यापैकी काहीही करत नाही तर याच्यातून सतत अनुभवाचं प्रक्षेपण (ट्रान्स्मिशन) मात्र होत असतं. हा जातो तिथं आनंदाचं सिंचन करत असतो. याचं काय रहस्य? त्या गावातील काही मंडळी एकदा ठरवून त्याच्याभोवती जमली नि त्यांनी हा प्रश्न साधूला विचारला. साईबाबांभोवती शिर्डीला अशीच मंडळी जमत असत. हास्याविनोद प्रश्नोत्तरं, अनेकांची सुखदु:खाची गा-हाणी नि या सर्व प्रसंगात साईबाबांच्या मुखावरील हास्यातून निथळणारा आनंद. जसं चंद्रातून चांदणं पाझरत असतं. साधूला आपल्या आनंदाचं रहस्य विचारल्यावर आणखीनच आनंद झाला. तो म्हणाला ‘मी सांगतो ते नीट ऐका नि त्याप्रमाणे जगायला आरंभ करा. खरं तर मी या क्षणाची वाटच पाहत होतो. असो.’

मी कायम आनंदाच्या गावीच असतो. देहानं असतो; पण खरा आनंद उपभोगतो तो देहापलिकडच्या अनुभूतीतून. हे पाहा, माझ्यासमोर अनेकांचे वाद, भांडणं होतात. अनेकांवर अत्याचार केले जातात; पण मला बाहेरच्या डोळ्यांनी भांडताना दिसतात नि बाहेरच्या कानांनी ते एकमेकाला देत असलेल्या शिव्याही ऐकू येतात; पण तितकंच. दृष्य नि शब्द आत शिरताना ते आनंदाचे बनूनच शिरतात. तशी रचना (सवय) मी इंद्रियांना करून घेतलीय. एक प्रकारचं फिल्टर लावलं प्रत्येक इंद्रियाला. वाईट काही दिसत वा ऐकू येत नाही. एक प्रार्थना मनात सुरू होते ‘प्रभू, या लोकांना एकमेकांना समजून घेण्याची, एकमेकांवर प्रेम करण्याची बुद्धी दे! त्यांना नि:स्वार्थी बनव. निरपेक्ष भावनेनं एकमेकाची सेवा करण्याची युक्ती शिकव’ मी स्वत: हे करताना तुम्ही अनेकदा पाहिलं असेल. जखमी जनावरांच्या जखमा धुवून त्यावर मला माहीत असलेल्या झाडपाल्याचं औषध लावून त्यांच्यावर मायेची फुंकर घालून प्रेमाचा उबदार वत्सल स्पर्श करून आनंद देता देता मीही आनंदी होत असतो. तसंच इतर इंद्रीयांचं. नाकाला कधी दुर्गंध येतच नाही. जिभेला काहीही अमृतासारखं गोडच लागतं. स्पर्शाचं विचाराल तर मांजराची नखं, कुत्र्याचे दात किंवा गरीब कष्टक-याचे खडबडीत हात मला गुलाबाच्या पाकळ्यांसारखे मखमली वाटतात. 

मनानं तर मी सजीव निर्जीवाचं कल्याणच चिंतीत असतो नि बुद्धीनं सर्वाचं हित कशानं होईल याचाच विचार नि त्याप्रमाणे आचार करत असतो. बस! हे रहस्य माझ्या आनंदाचं! सर्व इंद्रीयातून आनंदच उपभोगल्यामुळे मी कायम आरामात असतो. जिथं जातो तिथं आनंद शिंपून आनंदाचे मळे पिकवतो. आनंद माङयाकडे वस्तीला असतो नि माझा मुक्काम असतो सदैव आनंद ग्रामात. आनंदाच्या गावात!