शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
2
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
3
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
4
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
5
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
6
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
7
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
8
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
9
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
10
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
11
तज्ज्ञांचा इशारा...! ‘या’ बँकेचा स्टॉक 17 रुपयांपर्यंत कोसळणार, गुंतवणूकदारांचे टेन्शन वाढले; SBI सह अनेक दिग्गजांनी शेअर विकले
12
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
13
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
14
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
15
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
16
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
17
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
18
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
19
यंदाच्या गणेशोत्सवात तब्बल ६ लाख कोकणवासीयांचा STने सुखरुप प्रवास; २३ कोटींचे उत्पन्न
20
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”

एकला विजया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:40 IST

बा. भो. शास्त्री जय-पराजय ह्या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुखाइतकाच सहजतेने दु:खाचाही स्वीकार हवा, असं गीता व इतर ...

बा. भो. शास्त्रीजय-पराजय ह्या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुखाइतकाच सहजतेने दु:खाचाही स्वीकार हवा, असं गीता व इतर धर्म सांगतात. अनुकरण कृतीचं असतं व अनुसरण विचाराचं असतं. अनुकरणानं फसगत होते व अनुसरणातही पतन होतं. तेव्हा काय करावं, असं नागदेव श्रीचक्रधरांना विचारतात. त्यातून सावरण्याचा मार्ग आहे का? तेव्हा स्वामींनी ‘एकला विजया’ हे सूत्र सांगितलं. आपण तीन कप्प्यांत जगणारी माणसं आहोत. एक सामाजिक, दुसरा कौटुंबिक, तिसरा वैयक्तिक. प्रत्येक कप्प्याचे अनुभव वेगळे असतात. समाजात वावरताना सन्मान, अपमान मिळतो. कुटुंबात प्रेम, जिव्हाळा मिळतो. तिसरा व्यक्तिगत कप्पा महत्त्वाचा असतो. इथंच वैयक्तिक आवडी-नावडी जपता येतात. एकमताने निवड करायची ही एकमेव जागा असते. एकांतात भावी नियोजनाला वाव मिळतो. त्याला विवेकाचं अधिष्ठान असावं हे लक्षात घ्यावं. नागदेवाचं सामाजिक जीवन विकार-विकल्पाने भरलेलं होतं. कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त झालं होतं. सर्वत्र पराभव झाला. आता विजयाची उपलब्ध करून देणारी एकच जागा शिल्लक होती. जी तुकोबांना सापडली,‘येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येतआकाश मंडप पृथिवी आसन, रमे तेथे मन क्रीडा करीवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’असा एकला साधक विजयाचा अधिकारी आहे; पण संसारिकाचं काय? त्यासाठी हे सूत्र आहे. साधक नित्य, तर गृहस्थ दिवसातून तासभर एकला असावा. लोकांतात जय, तर एकांतात एकट्याचा विजय आहे. आपल्यातल्यांना आपलंसं करून घेता येतं. कोण आपल्यातले नकारात्मक ऊर्जा देणारे आपले मनोविकार असतात, त्यांना आपुलाची वाद आपणासी करून सकारात्मक ऊर्जा देणारे करता येते. तेव्हा क्रोधाला बोध, मोहाला विमोह करता येतं. संत मीरा एकटी एकतारी होती. एकदा तानसेनने मीराचं गायन ऐकल्यावर म्हणाला, ‘तू छान गातेस, पण तुझ्या गाण्यात राग दिसला नाही.’ मीरा म्हणाली, ‘मी रागात नाही अनुरागात गाते.’ हा अनुराग वैयक्तिक कप्प्यात तयार होतो.