शहरं
Join us  
Trending Stories
1
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
2
"मराठीच्या आधी हिंदी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळाला, तेव्हा महाराष्ट्रही अस्तित्वात नव्हता"
3
एकनाथ शिंदेंनी केला करेक्ट कार्यक्रम, बेळगावात पक्ष बळकट होणार; अनेक मठाधिपती शिवसेनेत
4
'किमान माणसासारखी तरी वागणूक...' IT अभियंता तरुणीची पोस्ट व्हायरल, म्हणाले मॅनेजरसमोरच मी...
5
Mumbai: बलात्कारानंतर गर्भवती राहिलेल्या अल्पवयीन मेहुणीची घरीच प्रसूती; भाऊजींसह बहिणीलाही अटक
6
“हिंदूंना बदनाम करण्याच्या आव्हाडांच्या आरोपांशी उद्धव ठाकरे सहमत आहेत का?”; भाजपाचा सवाल
7
धक्कादायक! रात्री ३ वाजता मुलीच्या खोलीत दिसले भयंकर दृश्य; वडिलांनी पाहताच पायाखालची जमीन सरकली
8
रीलस्टारलाही नॅशनल अवॉर्ड पण टीव्ही स्टार्सला नाही! स्पष्टच बोलली अनुपमा, म्हणाली- "आता स्मृती इराणींनी कमबॅक केलंय तर..."
9
"इतक्या दूरची नोकरी..."; रिक्षा चालकाने महिलेला रस्त्याच्या मध्येच सोडलं अन् विचारला प्रश्न
10
तिसऱ्या बाईच्या प्रेमासाठी दुसऱ्या पत्नीला संपवलं; नवऱ्याचं प्लॅनिंग, तान्ह्या बाळासमोर घडलं क्रूर कृत्य
11
जबरदस्त! ११३७ कोटींच्या मोहिमेसाठी सारा तेंडुलकरची निवड, सचिनच्या लेकीला मिळाली मोठी जबाबदारी
12
Baba Ramdev: "हिंदू धर्मात जन्मलेले काही लोक..." जितेंद्र आव्हांडाच्या वक्तव्यावर बाबा रामदेव यांची प्रतिक्रिया
13
मुलाची इंजिनियरिंग कॉलेजमध्ये निवड, पण फी चे पैसे जमवणे शक्य झाले नाही, हतबल पित्याने संपवलं जीवन
14
अमिताभ बच्चन यांच्या चित्रपटातून मिळाली प्रेरणा; फुटपाथवरुन सुरू झाला प्रवास, आता बनले व्यवसाय क्षेत्रातील 'शहंशाह'
15
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
16
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
17
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
18
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
19
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
20
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य

एकला विजया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:40 IST

बा. भो. शास्त्री जय-पराजय ह्या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुखाइतकाच सहजतेने दु:खाचाही स्वीकार हवा, असं गीता व इतर ...

बा. भो. शास्त्रीजय-पराजय ह्या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुखाइतकाच सहजतेने दु:खाचाही स्वीकार हवा, असं गीता व इतर धर्म सांगतात. अनुकरण कृतीचं असतं व अनुसरण विचाराचं असतं. अनुकरणानं फसगत होते व अनुसरणातही पतन होतं. तेव्हा काय करावं, असं नागदेव श्रीचक्रधरांना विचारतात. त्यातून सावरण्याचा मार्ग आहे का? तेव्हा स्वामींनी ‘एकला विजया’ हे सूत्र सांगितलं. आपण तीन कप्प्यांत जगणारी माणसं आहोत. एक सामाजिक, दुसरा कौटुंबिक, तिसरा वैयक्तिक. प्रत्येक कप्प्याचे अनुभव वेगळे असतात. समाजात वावरताना सन्मान, अपमान मिळतो. कुटुंबात प्रेम, जिव्हाळा मिळतो. तिसरा व्यक्तिगत कप्पा महत्त्वाचा असतो. इथंच वैयक्तिक आवडी-नावडी जपता येतात. एकमताने निवड करायची ही एकमेव जागा असते. एकांतात भावी नियोजनाला वाव मिळतो. त्याला विवेकाचं अधिष्ठान असावं हे लक्षात घ्यावं. नागदेवाचं सामाजिक जीवन विकार-विकल्पाने भरलेलं होतं. कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त झालं होतं. सर्वत्र पराभव झाला. आता विजयाची उपलब्ध करून देणारी एकच जागा शिल्लक होती. जी तुकोबांना सापडली,‘येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येतआकाश मंडप पृथिवी आसन, रमे तेथे मन क्रीडा करीवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’असा एकला साधक विजयाचा अधिकारी आहे; पण संसारिकाचं काय? त्यासाठी हे सूत्र आहे. साधक नित्य, तर गृहस्थ दिवसातून तासभर एकला असावा. लोकांतात जय, तर एकांतात एकट्याचा विजय आहे. आपल्यातल्यांना आपलंसं करून घेता येतं. कोण आपल्यातले नकारात्मक ऊर्जा देणारे आपले मनोविकार असतात, त्यांना आपुलाची वाद आपणासी करून सकारात्मक ऊर्जा देणारे करता येते. तेव्हा क्रोधाला बोध, मोहाला विमोह करता येतं. संत मीरा एकटी एकतारी होती. एकदा तानसेनने मीराचं गायन ऐकल्यावर म्हणाला, ‘तू छान गातेस, पण तुझ्या गाण्यात राग दिसला नाही.’ मीरा म्हणाली, ‘मी रागात नाही अनुरागात गाते.’ हा अनुराग वैयक्तिक कप्प्यात तयार होतो.