शहरं
Join us  
Trending Stories
1
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
2
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
3
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
4
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
5
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
6
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
7
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
8
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
9
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
10
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
11
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
12
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
13
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
14
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
15
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
16
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
17
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
18
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
19
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
20
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन

एकला विजया

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2020 05:40 IST

बा. भो. शास्त्री जय-पराजय ह्या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुखाइतकाच सहजतेने दु:खाचाही स्वीकार हवा, असं गीता व इतर ...

बा. भो. शास्त्रीजय-पराजय ह्या मानवी नाण्याच्या दोन बाजू आहेत. सुखाइतकाच सहजतेने दु:खाचाही स्वीकार हवा, असं गीता व इतर धर्म सांगतात. अनुकरण कृतीचं असतं व अनुसरण विचाराचं असतं. अनुकरणानं फसगत होते व अनुसरणातही पतन होतं. तेव्हा काय करावं, असं नागदेव श्रीचक्रधरांना विचारतात. त्यातून सावरण्याचा मार्ग आहे का? तेव्हा स्वामींनी ‘एकला विजया’ हे सूत्र सांगितलं. आपण तीन कप्प्यांत जगणारी माणसं आहोत. एक सामाजिक, दुसरा कौटुंबिक, तिसरा वैयक्तिक. प्रत्येक कप्प्याचे अनुभव वेगळे असतात. समाजात वावरताना सन्मान, अपमान मिळतो. कुटुंबात प्रेम, जिव्हाळा मिळतो. तिसरा व्यक्तिगत कप्पा महत्त्वाचा असतो. इथंच वैयक्तिक आवडी-नावडी जपता येतात. एकमताने निवड करायची ही एकमेव जागा असते. एकांतात भावी नियोजनाला वाव मिळतो. त्याला विवेकाचं अधिष्ठान असावं हे लक्षात घ्यावं. नागदेवाचं सामाजिक जीवन विकार-विकल्पाने भरलेलं होतं. कौटुंबिक जीवन उद्ध्वस्त झालं होतं. सर्वत्र पराभव झाला. आता विजयाची उपलब्ध करून देणारी एकच जागा शिल्लक होती. जी तुकोबांना सापडली,‘येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुणदोष अंगा येतआकाश मंडप पृथिवी आसन, रमे तेथे मन क्रीडा करीवृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे’असा एकला साधक विजयाचा अधिकारी आहे; पण संसारिकाचं काय? त्यासाठी हे सूत्र आहे. साधक नित्य, तर गृहस्थ दिवसातून तासभर एकला असावा. लोकांतात जय, तर एकांतात एकट्याचा विजय आहे. आपल्यातल्यांना आपलंसं करून घेता येतं. कोण आपल्यातले नकारात्मक ऊर्जा देणारे आपले मनोविकार असतात, त्यांना आपुलाची वाद आपणासी करून सकारात्मक ऊर्जा देणारे करता येते. तेव्हा क्रोधाला बोध, मोहाला विमोह करता येतं. संत मीरा एकटी एकतारी होती. एकदा तानसेनने मीराचं गायन ऐकल्यावर म्हणाला, ‘तू छान गातेस, पण तुझ्या गाण्यात राग दिसला नाही.’ मीरा म्हणाली, ‘मी रागात नाही अनुरागात गाते.’ हा अनुराग वैयक्तिक कप्प्यात तयार होतो.