शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

सागराची विशालता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:42 IST

सागरासारखा विशालहृदय, मनाच्या अंतरंगात दडलेली नीरवता, स्थिरता, स्पष्टता अनुभव करा. जे या चर्मचक्षुंनी कधी दिसू शकले नाही ते सर्व काही आपणास या अंतर्विश्वात दिसू लागेल. जीवनाचा प्रवास सरळ आणि सुखद होईल.

- नीता ब्रह्मकुमारीकितीही लाटा आल्या आणि किनाऱ्याला वेगाने धडकल्या, तरी त्यांना पुन्हा सागराकडे परतावेच लागते. मनुष्याच्या जीवनातही तसेच आहे. आपण कितीही क्रोधीत झालो, आदळआपट केली तरी शेवटी आपण प्रेमाचे, शांतीचे, आनंदाचे भुकेले आहोत. आपली धाव परत त्या सुखाच्या, प्रेमाच्या सागराकडेच असते. सागर कितीही विशाल असला तरी त्याची एक लाटही सुखद अनुभव देऊन जाते. आपल्या दिवसभराचा असा एखादा सुखद क्षणही पुरेसा असतो. विशाल हृदयाने, मुक्त मनाने विचार प्रकट करण्याची सवय लावावी. कारण, विचारांचे दमन हे अतिशय नुकसानकारक आहे. शुद्ध विचारांचा स्पर्श जीवनाला सुखद बनवण्यासाठी मदत करतो. आपण जेव्हा किनाऱ्यावर उभे राहतो, तेव्हा अलगद आपले पाय वाळूत रुततात, खड्डा पडतो. काही वेळाने समुद्राच्या लाटा ती जागा भरून काढतात; पण आपण पुन्हा त्याच जागेवर उभे राहिलो, तर पाय आणखी आत जातात. जीवनातही तसेच आहे.विचारांच्या शुद्ध लाटा येऊ दिल्या तर परिस्थितीरूपी खड्डा अलगद भरून येतो; पण त्याच परिस्थितीवर वारंवार विचार करीत राहिलो, तर ती परिस्थिती आपल्याला खोलवर नेते. सागरकिनारी कोणीही उभे राहिले, तरी त्याला सागराची विशालता, शुद्धतेचे दर्शन होते. आपणही संपर्कात येणाºया सगळ्यांसाठी सागराप्रमाणे एकसमान राहावे. मनात प्रत्येकाप्रति शुभभावना, कल्याणाची भावनाच ठेवावी. ही भावना सर्वांना आपलेसे करील. विचारांच्या अथांग सागराला उधाण आले, तरी त्याच्या तळाशी अनुभवांचे, ज्ञानाची रत्ने दडलेली आहेत. मनुष्यजीवन अमूल्य आहे. त्यातून जे योग्य आहे ते सामावून, बाकी राहिलेले किनाऱ्यावर सोडून द्या. सागरासारखा विशालहृदय, मनाच्या अंतरंगात दडलेली नीरवता, स्थिरता, स्पष्टता अनुभव करा. जे या चर्मचक्षुंनी कधी दिसू शकले नाही ते सर्व काही आपणास या अंतर्विश्वात दिसू लागेल. जीवनाचा प्रवास सरळ आणि सुखद होईल.