शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
3
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
4
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
5
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
6
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
7
१२४ वर्षांनंतर अक्षय तृतीया-चतुर्थी-रोहिणी नक्षत्र अन् बुधवारचा दुर्मीळ योग!
8
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
9
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
10
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
11
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
12
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
13
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
14
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
15
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
16
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
17
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
18
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
19
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
20
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल

सागराची विशालता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2020 07:42 IST

सागरासारखा विशालहृदय, मनाच्या अंतरंगात दडलेली नीरवता, स्थिरता, स्पष्टता अनुभव करा. जे या चर्मचक्षुंनी कधी दिसू शकले नाही ते सर्व काही आपणास या अंतर्विश्वात दिसू लागेल. जीवनाचा प्रवास सरळ आणि सुखद होईल.

- नीता ब्रह्मकुमारीकितीही लाटा आल्या आणि किनाऱ्याला वेगाने धडकल्या, तरी त्यांना पुन्हा सागराकडे परतावेच लागते. मनुष्याच्या जीवनातही तसेच आहे. आपण कितीही क्रोधीत झालो, आदळआपट केली तरी शेवटी आपण प्रेमाचे, शांतीचे, आनंदाचे भुकेले आहोत. आपली धाव परत त्या सुखाच्या, प्रेमाच्या सागराकडेच असते. सागर कितीही विशाल असला तरी त्याची एक लाटही सुखद अनुभव देऊन जाते. आपल्या दिवसभराचा असा एखादा सुखद क्षणही पुरेसा असतो. विशाल हृदयाने, मुक्त मनाने विचार प्रकट करण्याची सवय लावावी. कारण, विचारांचे दमन हे अतिशय नुकसानकारक आहे. शुद्ध विचारांचा स्पर्श जीवनाला सुखद बनवण्यासाठी मदत करतो. आपण जेव्हा किनाऱ्यावर उभे राहतो, तेव्हा अलगद आपले पाय वाळूत रुततात, खड्डा पडतो. काही वेळाने समुद्राच्या लाटा ती जागा भरून काढतात; पण आपण पुन्हा त्याच जागेवर उभे राहिलो, तर पाय आणखी आत जातात. जीवनातही तसेच आहे.विचारांच्या शुद्ध लाटा येऊ दिल्या तर परिस्थितीरूपी खड्डा अलगद भरून येतो; पण त्याच परिस्थितीवर वारंवार विचार करीत राहिलो, तर ती परिस्थिती आपल्याला खोलवर नेते. सागरकिनारी कोणीही उभे राहिले, तरी त्याला सागराची विशालता, शुद्धतेचे दर्शन होते. आपणही संपर्कात येणाºया सगळ्यांसाठी सागराप्रमाणे एकसमान राहावे. मनात प्रत्येकाप्रति शुभभावना, कल्याणाची भावनाच ठेवावी. ही भावना सर्वांना आपलेसे करील. विचारांच्या अथांग सागराला उधाण आले, तरी त्याच्या तळाशी अनुभवांचे, ज्ञानाची रत्ने दडलेली आहेत. मनुष्यजीवन अमूल्य आहे. त्यातून जे योग्य आहे ते सामावून, बाकी राहिलेले किनाऱ्यावर सोडून द्या. सागरासारखा विशालहृदय, मनाच्या अंतरंगात दडलेली नीरवता, स्थिरता, स्पष्टता अनुभव करा. जे या चर्मचक्षुंनी कधी दिसू शकले नाही ते सर्व काही आपणास या अंतर्विश्वात दिसू लागेल. जीवनाचा प्रवास सरळ आणि सुखद होईल.