शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडकी बहीण योजनेत e-KYC करताना चूक झाली? सरकारने दिली दुरुस्तीची संधी; ‘ही’ आहे शेवटची तारीख
2
फुटबॉलचा जादूगार २२ मिनिटेच का थांबला? मेस्सीचे लगेचच स्टेडियम सोडण्याचे खरे कारण आले समोर
3
"या मुलांना धडा शिकवायला हवाच"; वरळी हिट-अँड-रन प्रकरणात कोर्टाचा दणका, मिहिर शाहचा जामीन फेटाळला
4
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
5
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
6
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
7
प्रवाशांनो… वंदे भारत, राजधानीने प्रवास करताय? ‘हा’ नियम अनिवार्य; अन्यथा तिकीट मिळणार नाही!
8
५१००० हजारांचे कोल्हापुरी चप्पल थेट निघाले प्राडाच्या गावी; एक ग्रॅम ही वजनात फरक नसलेली एकमेव जोड
9
डोंबिवलीत पुन्हा प्रदूषण; रस्त्यावर गुलाबी रंग; पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे म्हणाल्या, 'तथ्ये तपासून कारवाई करू'
10
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
11
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
12
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
13
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
14
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
15
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
16
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
17
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
18
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
19
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
20
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
Daily Top 2Weekly Top 5

वन्दे मातरम्

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2017 01:40 IST

‘मरावे परि कीर्तिरूपे उरावे’ समर्थ सांगते झाले़ कोणत्याही गोष्टीची अभिलाषा न बाळगता निरपेक्ष बुद्धीने भारतमातेसाठी सेवाकार्यरत असणारे असंख्य ऋषी, साधुसंत, विचारवंत होऊन गेले, ‘कुणी त्याची गणती ठेविली असे?’ १५ आॅगस्ट १९४७ भारत भू स्वतंत्र झाली.

- डॉ. गोविंद काळे‘मरावे परि कीर्तिरूपे उरावे’ समर्थ सांगते झाले. कोणत्याही गोष्टीची अभिलाषा न बाळगता निरपेक्ष बुद्धीने भारतमातेसाठी सेवाकार्यरत असणारे असंख्य ऋषी, साधुसंत, विचारवंत होऊन गेले, ‘कुणी त्याची गणती ठेविली असे?’ १५ आॅगस्ट १९४७ भारत भू स्वतंत्र झाली.  परदास्याच्या शृंखला गळून पडल्या़ देशभर एकच घोषणा ‘वन्दे मातरम्। वन्दे मातरम्।’ पुढे तर बाबूजींनी गायिलेले ‘वेदमंत्राहून आम्हा वंद्य वन्देमातरम्’ मराठी माणसाच्या अंत:करणाचा ठाव घेते झाले.‘वन्दे मातरम्’ पहिल्यांदा कुणी उच्चारले असेल? कुणी लिहिले असतील हे दोन शब्द? त्याने आपला ठावठिकाणा सांगितला नाही. त्याचा शोध घ्यावासा वाटतो, पण तो कसा आणि कुठे भेटणार? संस्कृत बृहत् स्तोत्ररत्नाकरची फार जीर्ण झालेली आवृत्ती मिळाली. या ग्रंथामध्ये देवदेवताविषयक अनेक स्तोत्रे आहेत़ त्यातील अनेक स्तोत्रे मुखोद्गत असणारी मंडळी आजही विद्यमान आहेत. ग्रंथातील स्तोत्रांचे वर्गीकरण गणेश स्तोत्राणि, शिवस्तोत्राणि, देवीस्तोत्राणि अशा पद्धतीने केले आहे. भारतमाता ही देवीस्वरूप आहे त्यामुळे देवीस्तोत्राणि विभागाच्या सुरुवातीस भारतभूमातृ स्तोत्रम असून त्या स्तोत्राची सुरुवातच मुळी ‘वन्दे मातरम्’ शब्दाने करण्यात आली आहे.‘वन्दे मातरम् अव्यक्तां व्यक्तांच जननीं पराम्दीनोऽहं बालक: कांक्षे सेवां जन्मनि जन्मनि’हे माते जन्मोजन्मी ह्या दीन बालकाला तुझी सेवा करण्याचे भाग्य लाभो अशी इच्छा व्यक्त होते़ देशभक्तीने ओतप्रोत भरलेले हे स्तोत्र नव्या बृहत्स्तोत्र रत्नाकर आवृत्तीतून गायब झाले आहे़ कर्ता कोण त्याचा नामनिर्देश आढळत नाही़ सत्कर्म करणारे सर्व भारतीय पुराणपुरुष सत्कीर्तीला मूठमाती देऊनच मन:पूर्वक योगदान देत होते़ कमवायचे तर त्यांना काहीच नव्हते़ सेवा हेच त्यांचे जगणे होते़ कोणतीही नावनिशाणी मागे न ठेवता मनुष्य जन्म सार्थकी लावून कृतार्थ व्हावे ही एकच उदात्त आकांक्षा होती़शाळा-महाविद्यालयातून, मठ-मंदिरातून एवढेच नव्हे तर कोणत्याही धार्मिक, सांस्कृतिक, शैक्षणिक कार्यक्रमाची सांगता भारतभूमातृ स्तोत्राच्या सामूहिक पठनाने व्हायला काय हरकत आहे़निरंतरं भवतु मे मातृसेवांशभाग्यभाक्।एषैव वांछा हृदये साक्षी सर्वात्मक : प्रभु: ॥निरंतर भारतमातेची सेवा हीच एकमेव इच्छा सर्व भारतीयांची असली पाहिजे़

टॅग्स :spiritualअध्यात्मिक