शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

बुद्धांवरचा निराधार कलंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 06:01 IST

जेव्हा शरीरी आणि चित्ताच्या अनित्य क्षेत्राचे अतिक्रमण करून इंद्रियापलीकडील नित्य, ध्रुव, शाश्वत निर्वाणाचा साक्षात्कार होतो, हेच विपश्यनेतून शक्य होते.

- फरेदुन भुजवाला

भगवान बुद्धांवर एक नितांत, निराधार कलंक लावला जातो की, त्यांच्या मान्यतेतून सर्वकाही भंगुरच भंगुर आहे़ अपरिवर्तनीय काहीही नाही़ शतकानुशतके आमच्या देशवासीयांच्या मनावर या खोट्या आरोपणाचे किती घट्ट लेप लावले गेले. अनेक लोक भगवान बुद्धांवर दु:खवादी आणि अनित्यवादी होण्याचा कलंक लावून आजही विपश्यना विद्येला विरोध करतात. अनेक लोकांच्या मनात हा मोठा गैरसमज आहे की, विपश्यना साधनेचे एकमेव लक्ष्य अनित्याचे ध्यान आहे़ परंतु जे साधना करतात ते खूप समजतात की, शरीर आणि चित्त तसेच समस्त इंद्रिय क्षेत्राच्या अनित्येचा अनुभव अशासाठी करीत आहेत की, त्यामुळे याविषयी जागलेला तादात्म्यभाव दूर होईल, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका सांगतात़ ते म्हणतात, तादात्म्यभाव असतो तेव्हा आसक्ती आणि द्वेष जागतो़ साधक स्वानुभूतीच्या स्तरावर जाणू लागतो की, शरीर आणि चित्त ‘मी’ नाही, ‘माझे’ नाही, ‘माझा’ आत्मा नाही़ स्वानुभूतीद्वारे या सत्यात जेवढा-जेवढा पुष्ट होतो, तेवढा-तेवढा याविषयीचा त्याचा तादात्म्यभाव नष्ट होतो़ देहात्म आणि चितात्म बुद्धी नष्ट होते़ त्याचा परिणाम म्हणून त्याविषयीची आसक्ती आणि द्वेष नष्ट होतात़ साधना करीत असताना स्वानुभूतीने समजू लागतो की, जे अनित्य आहे़, त्याबद्दल काय आसक्ती जागवू? तरी आपल्या जुन्या स्वभावाव्या अधीन होऊन कधी-कधी कोणत्या सुखद अनुभूतीवर आसक्ती जागविण्याची चूक करून असतो़ काही वेळानंतर जेव्हा ती सुखद संवेदना बदलते, तेव्हा त्याच्याविषयी जेवढी खोल आसक्ती होती, तेवढे मोठे दु:ख प्रकट होते़ या सत्याला वारंवार अनुभूतीवर उतरवता-उतरवता आसक्ती आपोआप नष्ट होते़ शेवटी अशी अवस्था उत्पन्न होते की, जेव्हा शरीरी आणि चित्ताच्या अनित्य क्षेत्राचे अतिक्रमण करून इंद्रियापलीकडील नित्य, ध्रुव, शाश्वत निर्वाणाचा साक्षात्कार होतो, हेच विपश्यनेतून शक्य होते.