शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

बुद्धांवरचा निराधार कलंक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2020 06:01 IST

जेव्हा शरीरी आणि चित्ताच्या अनित्य क्षेत्राचे अतिक्रमण करून इंद्रियापलीकडील नित्य, ध्रुव, शाश्वत निर्वाणाचा साक्षात्कार होतो, हेच विपश्यनेतून शक्य होते.

- फरेदुन भुजवाला

भगवान बुद्धांवर एक नितांत, निराधार कलंक लावला जातो की, त्यांच्या मान्यतेतून सर्वकाही भंगुरच भंगुर आहे़ अपरिवर्तनीय काहीही नाही़ शतकानुशतके आमच्या देशवासीयांच्या मनावर या खोट्या आरोपणाचे किती घट्ट लेप लावले गेले. अनेक लोक भगवान बुद्धांवर दु:खवादी आणि अनित्यवादी होण्याचा कलंक लावून आजही विपश्यना विद्येला विरोध करतात. अनेक लोकांच्या मनात हा मोठा गैरसमज आहे की, विपश्यना साधनेचे एकमेव लक्ष्य अनित्याचे ध्यान आहे़ परंतु जे साधना करतात ते खूप समजतात की, शरीर आणि चित्त तसेच समस्त इंद्रिय क्षेत्राच्या अनित्येचा अनुभव अशासाठी करीत आहेत की, त्यामुळे याविषयी जागलेला तादात्म्यभाव दूर होईल, असे विपश्यनाचार्य सत्यनारायण गोएंका सांगतात़ ते म्हणतात, तादात्म्यभाव असतो तेव्हा आसक्ती आणि द्वेष जागतो़ साधक स्वानुभूतीच्या स्तरावर जाणू लागतो की, शरीर आणि चित्त ‘मी’ नाही, ‘माझे’ नाही, ‘माझा’ आत्मा नाही़ स्वानुभूतीद्वारे या सत्यात जेवढा-जेवढा पुष्ट होतो, तेवढा-तेवढा याविषयीचा त्याचा तादात्म्यभाव नष्ट होतो़ देहात्म आणि चितात्म बुद्धी नष्ट होते़ त्याचा परिणाम म्हणून त्याविषयीची आसक्ती आणि द्वेष नष्ट होतात़ साधना करीत असताना स्वानुभूतीने समजू लागतो की, जे अनित्य आहे़, त्याबद्दल काय आसक्ती जागवू? तरी आपल्या जुन्या स्वभावाव्या अधीन होऊन कधी-कधी कोणत्या सुखद अनुभूतीवर आसक्ती जागविण्याची चूक करून असतो़ काही वेळानंतर जेव्हा ती सुखद संवेदना बदलते, तेव्हा त्याच्याविषयी जेवढी खोल आसक्ती होती, तेवढे मोठे दु:ख प्रकट होते़ या सत्याला वारंवार अनुभूतीवर उतरवता-उतरवता आसक्ती आपोआप नष्ट होते़ शेवटी अशी अवस्था उत्पन्न होते की, जेव्हा शरीरी आणि चित्ताच्या अनित्य क्षेत्राचे अतिक्रमण करून इंद्रियापलीकडील नित्य, ध्रुव, शाश्वत निर्वाणाचा साक्षात्कार होतो, हेच विपश्यनेतून शक्य होते.