शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

मानवी मनाच्या दोन विचारश्रेणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2019 04:44 IST

काहीवेळा संतमंडळींच्या सहवासात असताना भक्तिप्रेम सुखाची अनुभूती घेणारे मन इतर वेळेला वेगळा अनुभव मांडताना दिसते

डॉ. तुळशीराम गुट्टे महाराज

एका विशिष्ट क्षणी मनात उत्स्फूर्त झालेल्या भावनेला किंवा विचाराला दिलेला साज म्हणजे आटोपशीर, स्वयंपूर्ण असे शब्दरूप होय. त्यातून अभंग, काव्य किंवा साहित्यातील विविध प्रकारात मोडणारे वाङ्मय तयार होते. नंतर तोच विचार कायमस्वरुपी राहील असेही सांगता येत नाही. तो विचार नंतरच्या काळात निष्प्रभही होऊ शकेल. कारण ज्यावेळी संसारदु:खाने पोळलेली मनाची अवस्था असेल त्यावेळी त्याची स्थिती बिघडलेली असेल. संवेदनात्मक मनोभूमिकेत असणाऱ्या मनाची अवस्था त्या-त्या क्षणी सारखीच असू शकत नाही. विचारगर्भ किंवा भावनोत्कट मनाचे सहजोद्गार असतात. काहीवेळा संतमंडळींच्या सहवासात असताना भक्तिप्रेम सुखाची अनुभूती घेणारे मन इतर वेळेला वेगळा अनुभव मांडताना दिसते. म्हणजे मानवी मनाच्या दोन विचारश्रेणी आहेत. त्याचा आपण विचार करतो. मानवी जीवनाची कृतार्थता कोणत्या गोष्टीत आहे याचे विश्लेषण संतविचारांनी भावलेले मनच निर्णय देऊ शकते. मनाच्या या विविध आविष्कारामुळे त्याचा अधिकार समाजाच्या सर्व स्तरातून पाहायला मिळतो. प्रापंचिक दु:खांनी गांजलेले स्त्री-पुरुषाचे ‘मन’ नव्या आनंदमयी अशा वातावरणात रंगून जाते किंवा कधी-कधी आत्मसात केलेल्या ज्ञानाचे प्रात्यक्षिकिकरण दाखवते. साऱ्यांच्या जीवनाचे प्रयोजन मनच करीत असते. जन्म-मरणाच्या फेºयातून निरंतराची मुक्तता अनुभवण्याची किमयाही मनाचीच असते किंवा भक्तिप्रेमाचा आनंद मिळवण्यासाठी आपल्याला पुन: पुन्हा हा जन्म मिळावा ही अपेक्षा करणारेही मनच होय. कारण ईश्वरकृपेचा अनुग्रह व्हावा ही अपेक्षा बाळगणारे मनच असते. यामुळे जीवनात सुख जिवापाड असले तरी दु:ख पर्वताएवढे असते. याचाही अनुभव घेणारे मन. परमेश्वराने आपल्याला या दु:खमय संसारातून सोडवावे असे वाटणारेसुद्धा ‘मन’च होय. काही जणांच्या जीवनात वैफल्य येऊन या संसाराला कंटाळवाणेही मनच असते, तर काही जणांच्या भावमनाने परमेश्वरापाशी पोहचविणारे मनच असते. या संसारातील सुख-दु:खांच्या पाठीमागे मनच कार्यरत असते. त्यामुळे सर्वकाही मनावरच अवलंबून आहे. मन आनंदी ठेवा. सर्वदूर आनंद मिळेल.(लेखक संत साहित्याचे अभ्यासक व सिद्धिविनायक मानव कल्याण मिशनचे अध्यक्ष आहेत)

 

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक