शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

तुळशी माळ

By admin | Updated: August 29, 2016 16:11 IST

वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणारास तुळशीमाळ धारण करावयाची असते. त्याचबरोबर त्याला नित्यनेम म्हणून पंढरीची वारी स्वीकारावी लागते

- डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणारास तुळशीमाळ धारण करावयाची असते. त्याचबरोबर त्याला नित्यनेम म्हणून पंढरीची वारी स्वीकारावी लागते. वारकरी तुळशीमाळ हेच भूषण मानून गळ्यात ती धारण करतो. खरे म्हणजे ही दीक्षा घेणे म्हणजे ईश्वर कार्यासाठी जीवन समर्पित करणे असा अर्थ आहे. जेव्हा भगवंताला नैवेद्य अर्पण केला जातो. किंवा जल अर्पण केले जाते त्यावेळी त्यावर तुळशीपात्र ठेवले जाते. ते म्हणजे ‘इदं न मम!’ हे प्रभो हे माझे नाही तुझेच आहे. हा भाव त्यामागे असतो. देह देवाला अर्पण करावयाचा झाल्यास त्यावरही असेच तुळशीपत्र ठेवावे लागेल. परंतू असे करणे शक्य होत नाही. त्याकरिता तुळशीकाष्टाचे मणी बनवून त्याची माळ गळ्यामध्ये घातली जाते. ही माळ सातत्याने स्मरण देत असते की तू तुझा देह भगवंतासाठी अर्पण केलेला आहे म्हणून तुळशीमाळ हे भगभ्दवतीचे, भगवंताला समर्पित देहाचे सर्वोच्च प्रतीक आहे. माळेद्वारे हे सातत्याने लक्षात ठेवायचे आहे की, ह्या देहाचा मालक भगवान आहे. चालविणारा तोच आहे आणि नियंता भगवानच आहे. ‘‘क्षेत्रज्ञं चापि मां विध्दि सर्वश्रेत्रेपु भारत’’ आपले शरीर हे केवळ शेत आहे आणि ईश्वर त्याचा मालक आहे. तेव्हा या शेतात काय पेरायचे ते देवच निश्चित करतो. या शरीराकडून जे काही कार्य होते ते प्रभूप्रीत्यर्थ झााले पाहिजे. मानव तर देवाच्या हातचे साधन आहे. म्हणूनच गीतेचा कर्मयोग शिकवितो की मानवाने प्रत्येक कृती भगदर्पण भावाने, कुठलाही अहंकार न बाळगता तसेच फळाची अपेक्षा नकरता केली तर चित्र शुध्दी होते. तसेच हे भक्तीचे प्रमुख साधन आहे. भक्तीसाठी जीवनामध्ये सातत्याने देवाचे अनुसंधान ठेवले पाहिजे हे अनुसंधान सहज त्याच्या नाम चिंतनाने होते. तुळशीमाळ हे सतत भगवंतांच्या नामचिंतनाचे प्रतीक आहे आणि जवळजवळ सर्वधम्र आणि संप्रदाय भगवन्नाम चिंतनाचा आग्रह धरुन आहेत. वारकरी संप्रदायाने भक्तीचे प्रमुख साधनच नामचिंतन मानले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘काय नोहे केले । एका चिंतिता विठ्ठले ।।’’ एका विठ्ठल नामाच्या चिंतनाने मानव जीवनासाठी जे अत्यांवश्यक आहे ते सर्वच प्राप्त होते. परंतू हे चिंतन जाणीवपूर्णक झाले पाहिजे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ‘‘हरि बुध्दि जपे तो नर दुर्लक्ष ।।’’ याचाच अर्थ जप हा बुध्दि पुरस्सर झाला पाहिजे.