शहरं
Join us  
Trending Stories
1
"ट्रम्प यांनी हस्तक्षेप केला नसता तर...'; शहबाज शरीफ बनले अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे प्रवक्ते, शांतीदूत म्हणत नोबेल देण्याची मागणी
2
सुपर ओव्हरचा थरार! श्रीलंका २ धावांवर All Out; पहिल्या बॉलवर मॅच संपवत टीम इंडियाचा विजयी 'षटकार'
3
"सात भारतीय विमानं पाडली...!"; संयुक्त राष्ट्रांच्या मंचावर खोटारड्या शाहबाज शरीफ यांची नुसती 'फेका-फेक'
4
IND vs SL Match Super Over: अखेरच्या चेंडूवर ड्रामा अन् सामन्यात सुपर ओव्हर ट्विस्ट; नेमक काय घडलं (VIDEO)
5
सोनम वांगचुक जोधपूर मध्यवर्ती कारागृहात; अटक केल्यानंतर लेहमधून विमानाने आणलं, CCTV खाली देखरेख
6
Pathum Nissanka Century : पहिली सेंच्युरी अन् श्रीलंकेच्या पठ्ठ्यानं किंग कोहलीचा मोठा विक्रमही मोडला
7
फुल-ऑन ड्रामा! संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत नेतन्याहू भाषणाला येताच अनेक देशांचं 'वॉकआउट'
8
संजूचा गगनचुंबी सिक्सर! चाहतीचे ठुमके अन् ड्रेसिंग रुममध्ये सनथ जयसूर्याला कळायचं झालं बंद (VIDEO)
9
अभिषेक शर्माचा महारेकॉर्ड! T20 आशिया कप स्पर्धेत ३०९ धावांसह पाकच्या रिझवानला दिली 'धोबीपछाड'
10
आशिया कप फायनल आधी ICC कडून सूर्यकुमार यादव याच्यावर कारवाई; PCB नं केली होती तक्रार
11
"त्या डोंगरेला निलंबित करा, माझं नाव खराब करता"; वाहतूक कोंडीवरुन एकनाथ शिंदे अधिकाऱ्यांवर संतापले
12
अग्निशमन दलाचे जवान घरात घुसताच सिलिंडरचा स्फोट; फ्लॅटमध्ये लागलेल्या आगीत मुलाचा मृत्यू, ५ जण जखमी
13
ठरलं, ८-९ ऑक्टोबरला PM मोदी महाराष्ट्रात येणार; CM फडणवीस म्हणाले, “नवी मुंबई विमानतळ...”
14
“राऊतांनी खासदारकीचा एक महिन्याचा पगार दिला असता तर आभार मानले असते”; कुणी केली खोचक टीका?
15
"रशियन सैन्यात जावू नका, तुमच्या जीवाला धोका"; सरकारने दिला इशारा, म्हणाले, "२७ भारतीय..."
16
या एसयूव्हीचं फक्त नावच काफी...! विक्रीच्या बाबतीत पुन्हा ठरली नंबर-1; 38% मार्केट केला एकटीनं 'कॅप्चर'
17
भारताच्या दिग्गज डिफेंस कंपनीला थेट इस्रायलमधून मिळाली मोठी ऑर्डर, अशी आहे शअरची स्थिती
18
VIDEO: बापरे... चिमुरड्याने बसल्या बैठकीला कचाकचा खाल्ल्या हिरव्या मिरच्या, नेटकरीही थक्क
19
कोण आहेत अरुणाचल प्रदेशात पंतप्रधान मोदींचं स्वागत करणाऱ्या या 'डॅशिंग' IAS अधिकारी? सोशल मीडियावर होतायत व्हायरल!
20
“६०० कोटींचा फंड, लोक मरत होते, पण एक पैसा खर्च केला नाही”; CM फडणवीसांचा ठाकरेंवर हल्लाबोल

तुळशी माळ

By admin | Updated: August 29, 2016 16:11 IST

वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणारास तुळशीमाळ धारण करावयाची असते. त्याचबरोबर त्याला नित्यनेम म्हणून पंढरीची वारी स्वीकारावी लागते

- डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणारास तुळशीमाळ धारण करावयाची असते. त्याचबरोबर त्याला नित्यनेम म्हणून पंढरीची वारी स्वीकारावी लागते. वारकरी तुळशीमाळ हेच भूषण मानून गळ्यात ती धारण करतो. खरे म्हणजे ही दीक्षा घेणे म्हणजे ईश्वर कार्यासाठी जीवन समर्पित करणे असा अर्थ आहे. जेव्हा भगवंताला नैवेद्य अर्पण केला जातो. किंवा जल अर्पण केले जाते त्यावेळी त्यावर तुळशीपात्र ठेवले जाते. ते म्हणजे ‘इदं न मम!’ हे प्रभो हे माझे नाही तुझेच आहे. हा भाव त्यामागे असतो. देह देवाला अर्पण करावयाचा झाल्यास त्यावरही असेच तुळशीपत्र ठेवावे लागेल. परंतू असे करणे शक्य होत नाही. त्याकरिता तुळशीकाष्टाचे मणी बनवून त्याची माळ गळ्यामध्ये घातली जाते. ही माळ सातत्याने स्मरण देत असते की तू तुझा देह भगवंतासाठी अर्पण केलेला आहे म्हणून तुळशीमाळ हे भगभ्दवतीचे, भगवंताला समर्पित देहाचे सर्वोच्च प्रतीक आहे. माळेद्वारे हे सातत्याने लक्षात ठेवायचे आहे की, ह्या देहाचा मालक भगवान आहे. चालविणारा तोच आहे आणि नियंता भगवानच आहे. ‘‘क्षेत्रज्ञं चापि मां विध्दि सर्वश्रेत्रेपु भारत’’ आपले शरीर हे केवळ शेत आहे आणि ईश्वर त्याचा मालक आहे. तेव्हा या शेतात काय पेरायचे ते देवच निश्चित करतो. या शरीराकडून जे काही कार्य होते ते प्रभूप्रीत्यर्थ झााले पाहिजे. मानव तर देवाच्या हातचे साधन आहे. म्हणूनच गीतेचा कर्मयोग शिकवितो की मानवाने प्रत्येक कृती भगदर्पण भावाने, कुठलाही अहंकार न बाळगता तसेच फळाची अपेक्षा नकरता केली तर चित्र शुध्दी होते. तसेच हे भक्तीचे प्रमुख साधन आहे. भक्तीसाठी जीवनामध्ये सातत्याने देवाचे अनुसंधान ठेवले पाहिजे हे अनुसंधान सहज त्याच्या नाम चिंतनाने होते. तुळशीमाळ हे सतत भगवंतांच्या नामचिंतनाचे प्रतीक आहे आणि जवळजवळ सर्वधम्र आणि संप्रदाय भगवन्नाम चिंतनाचा आग्रह धरुन आहेत. वारकरी संप्रदायाने भक्तीचे प्रमुख साधनच नामचिंतन मानले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘काय नोहे केले । एका चिंतिता विठ्ठले ।।’’ एका विठ्ठल नामाच्या चिंतनाने मानव जीवनासाठी जे अत्यांवश्यक आहे ते सर्वच प्राप्त होते. परंतू हे चिंतन जाणीवपूर्णक झाले पाहिजे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ‘‘हरि बुध्दि जपे तो नर दुर्लक्ष ।।’’ याचाच अर्थ जप हा बुध्दि पुरस्सर झाला पाहिजे.