शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
2
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
3
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
4
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
5
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
6
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
7
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
8
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
9
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
10
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
11
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
12
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
13
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
14
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
15
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
16
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
17
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
18
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
19
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
20
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला

तुळशी माळ

By admin | Updated: August 29, 2016 16:11 IST

वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणारास तुळशीमाळ धारण करावयाची असते. त्याचबरोबर त्याला नित्यनेम म्हणून पंढरीची वारी स्वीकारावी लागते

- डॉ. बाळासाहेब गरुड, ठाकूरबुवा वारकरी संप्रदायाची दीक्षा घेणारास तुळशीमाळ धारण करावयाची असते. त्याचबरोबर त्याला नित्यनेम म्हणून पंढरीची वारी स्वीकारावी लागते. वारकरी तुळशीमाळ हेच भूषण मानून गळ्यात ती धारण करतो. खरे म्हणजे ही दीक्षा घेणे म्हणजे ईश्वर कार्यासाठी जीवन समर्पित करणे असा अर्थ आहे. जेव्हा भगवंताला नैवेद्य अर्पण केला जातो. किंवा जल अर्पण केले जाते त्यावेळी त्यावर तुळशीपात्र ठेवले जाते. ते म्हणजे ‘इदं न मम!’ हे प्रभो हे माझे नाही तुझेच आहे. हा भाव त्यामागे असतो. देह देवाला अर्पण करावयाचा झाल्यास त्यावरही असेच तुळशीपत्र ठेवावे लागेल. परंतू असे करणे शक्य होत नाही. त्याकरिता तुळशीकाष्टाचे मणी बनवून त्याची माळ गळ्यामध्ये घातली जाते. ही माळ सातत्याने स्मरण देत असते की तू तुझा देह भगवंतासाठी अर्पण केलेला आहे म्हणून तुळशीमाळ हे भगभ्दवतीचे, भगवंताला समर्पित देहाचे सर्वोच्च प्रतीक आहे. माळेद्वारे हे सातत्याने लक्षात ठेवायचे आहे की, ह्या देहाचा मालक भगवान आहे. चालविणारा तोच आहे आणि नियंता भगवानच आहे. ‘‘क्षेत्रज्ञं चापि मां विध्दि सर्वश्रेत्रेपु भारत’’ आपले शरीर हे केवळ शेत आहे आणि ईश्वर त्याचा मालक आहे. तेव्हा या शेतात काय पेरायचे ते देवच निश्चित करतो. या शरीराकडून जे काही कार्य होते ते प्रभूप्रीत्यर्थ झााले पाहिजे. मानव तर देवाच्या हातचे साधन आहे. म्हणूनच गीतेचा कर्मयोग शिकवितो की मानवाने प्रत्येक कृती भगदर्पण भावाने, कुठलाही अहंकार न बाळगता तसेच फळाची अपेक्षा नकरता केली तर चित्र शुध्दी होते. तसेच हे भक्तीचे प्रमुख साधन आहे. भक्तीसाठी जीवनामध्ये सातत्याने देवाचे अनुसंधान ठेवले पाहिजे हे अनुसंधान सहज त्याच्या नाम चिंतनाने होते. तुळशीमाळ हे सतत भगवंतांच्या नामचिंतनाचे प्रतीक आहे आणि जवळजवळ सर्वधम्र आणि संप्रदाय भगवन्नाम चिंतनाचा आग्रह धरुन आहेत. वारकरी संप्रदायाने भक्तीचे प्रमुख साधनच नामचिंतन मानले आहे. संत तुकाराम महाराज म्हणतात, ‘‘काय नोहे केले । एका चिंतिता विठ्ठले ।।’’ एका विठ्ठल नामाच्या चिंतनाने मानव जीवनासाठी जे अत्यांवश्यक आहे ते सर्वच प्राप्त होते. परंतू हे चिंतन जाणीवपूर्णक झाले पाहिजे. म्हणूनच संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात ‘‘हरि बुध्दि जपे तो नर दुर्लक्ष ।।’’ याचाच अर्थ जप हा बुध्दि पुरस्सर झाला पाहिजे.