शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान बेगम खालिदा झिया यांचे ८० व्या वर्षी निधन; मुलगा १७ वर्षांनी परतताच...
2
हिंगोलीकरांची पहाट भीतीदायक! पिंपळदरी, नांदापूर परिसरात धरणी माता हादरली; पहाटे ५:५६ची ती वेळ...
3
नाशिकच्या श्री काळाराम मंदिराच्या विश्वस्तपदासाठी राजकारण्यांचे वावडे
4
"...तर इस्रायल संपला असता!" ट्रम्प यांनी केलं नेतन्याहूंचं कौतुक, ५ मिनिटांत ३ मोठे प्रश्न लावले मार्गी!
5
केंद्र सरकारने साखरेचा विक्री दर वाढवावा; शरद पवार घेणार केंद्रीय मंत्री अमित शाह यांची भेट 
6
आजचे राशीभविष्य ३० डिसेंबर २०२५ : मेष आणि मिथुन राशीला भाग्याची साथ, तर कन्या अन् धनु राशीने...
7
येमेनच्या नागरिकाच्या अटकेचा भार सरकारी तिजोरीवर; खटला निकाली काढा, मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश
8
शिक्षक भरती : प्रमाणपत्र अटीमुळे मराठा उमेदवार होणार बेरोजगार? खुल्या प्रवर्गातून अर्ज भरलेल्यांमध्ये तीव्र नाराजी
9
चारित्र्याच्या संशयातून पत्नी व चार वर्षीय मुलाचा निर्घृण खून
10
नवी मुंबई, मिरा-भाईंदर, उल्हासनगरात युती तुटली; मुंबई, ठाण्यात युतीचे जमले; केडीएमसी, पनवेल, वसई-विरारमध्ये युतीचे संकेत 
11
मोठी दुर्घटना टळली! डायलिसिस उपचार केंद्रात आग, काच फोडून आठ जणांना वाचविले; उमरखेड येथील रुग्णालयातील घटना
12
अरवलीच्या व्याख्येचा वाद तज्ज्ञ समितीकडे; आपल्याच निर्देशांना सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; आता २१ जानेवारीला सुनावणी 
13
भांडुपमध्ये बेस्ट इलेक्ट्रिक बसने घेतला चौघांचा बळी; दहा जखमी
14
चांदीची किंमत का वाढतेय? कुठे-कुठे होतोय वापर? बनली जागतिक तंत्रज्ञान क्रांतीचा कणा
15
अपेक्षित गॅस गेला कुठे? सरकारने मागितली २.७९ लाख कोटींची भरपाई
16
Nashik: नाशिकमध्ये अजित पवारांची राष्ट्रवादी आणि शिंदेसेना एकत्र लढणार; भाजपचं काय?
17
TMC: ठाण्यात महायुतीचं जागावाटप फायनल; शिंदेसेना ८७ तर भाजप ४० जागा लढणार!
18
शिवीगाळ, दमदाटी, धक्काबुक्की...;  एबी फॉर्मवरून काँग्रेस कार्यालयात कार्यकर्त्यांमध्ये राडा!
19
Ahilyanagar: अहिल्यानगरमध्ये शिंदेसेनेची महायुतीकडं पाठ, स्वबळावर लढणार, गणित कुठं बिघडलं?
20
 Mira Bhayandar: भाजपच्या 'त्या' निर्णयामुळे आमदारपुत्र तकशील मेहतांची उमेदवारी धोक्यात!
Daily Top 2Weekly Top 5

प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताची भक्ती न सुटणे हीच खरी श्रद्धा

By appasaheb.patil | Updated: February 15, 2019 14:27 IST

सोलापूर : भगवंताची भक्ती स्वत:च्या सुखासाठी, स्वार्थासाठी न करता भगवंतासाठीच करावी. प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताची भक्ती न सुटणे हीच खरी ...

ठळक मुद्देपर्ल गार्डन येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीतर्फे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञसती चरित्र, ध्रुवाख्यान, भरत चरित्र, अजमिलोद्वार आणि नृसिंह अवतार विस्ताराने सांगितला. 

सोलापूर : भगवंताची भक्ती स्वत:च्या सुखासाठी, स्वार्थासाठी न करता भगवंतासाठीच करावी. प्रतिकूल परिस्थितीतही भगवंताची भक्ती न सुटणे हीच खरी श्रद्धा होय, असे प्रतिपादन आचार्य किशोरजी व्यास यांनी केले. 

पर्ल गार्डन येथे श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ समितीतर्फे  आयोजित केलेल्या श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञामध्ये बोलत असताना आचार्य किशोरजी व्यास यांनी वरील प्रतिपादन केले़ यात त्यांनी सती चरित्र, ध्रुवाख्यान, भरत चरित्र, अजमिलोद्वार आणि नृसिंह अवतार विस्ताराने सांगितला. 

आचार्य किशोरजी व्यास म्हणाले, न मागता तहानलेल्याला पाणी, भुकेल्याला अन्न किंवा रुग्णाची सुश्रुषा करावी, परंतु न मागता आत्मज्ञान कोणालाही देऊ नये, अशी शिकवण भागवतात आहे. जगातील प्रत्येक जण सुखाच्या शोधात आहे. काहींना मानसन्मान, संपत्ती, जमीनजुमला नको असेल परंतु त्यांना त्यांच्या व्याख्येत बसणारे सुख नक्की हवे असते. आनंदाचा मूळ स्रोत आपल्या अंतरंगात असतो. जसा प्रकाशाशिवाय सूर्य असत नाही. तसा आनंदाशिवाय माणूस असत नाही. परमात्म्याच्या प्राप्तीसाठी भगवंताची भक्ती हाच सर्वोत्तम मार्ग आहे. जग कसेही वागले तरीहीप्रतिकार करण्याची क्षमता असूनही ते विसरून शांत राहता येणे हे संतांचे वैशिष्ट्य असते. समाजातील अनेकांकडून यातना सोसाव्या लागूनही संत ज्ञानेश्वर माऊलींनी विश्वकल्याणाची प्रार्थना केली, असेही आचार्य किशोरजी व्यास यांनी सांगितले.

 कलियुगातही वेदांचे रक्षण व्हावे असे विचार महर्षी वेदव्यास यांनी केला. कलियुगात धारणाशक्ती कमी होण्याची शक्यता गृहीत धरून त्यांनी मार्गदर्शन केले. प्रगतीच्या गप्पा आपण मारतो. परंतु समाजाची अधोगतीच अधिक होत आहे. खाण्यापेक्षा औषधांचा खर्च अधिक होण्याला आपण प्रगती संबोधत आहोत.

टॅग्स :SolapurसोलापूरAdhyatmikआध्यात्मिक