शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
2
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच घेतली
3
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
4
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
5
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
6
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
7
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
8
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
9
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
10
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
11
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
12
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
13
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
14
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
15
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
16
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
17
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
18
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
19
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)

आज विजयादशमी... चला, सीमोल्लंघन करूया !

By दा. कृ. सोमण | Updated: September 30, 2017 06:38 IST

आज शनिवार, ३० सप्टेंबर, आश्विन शुक्ल दशमी, विजयादशमी - दसरा, अपराजिता व शमीपूजन, अश्वपूजा, सीमोल्लंघन, सायंकाळी ६-१५ नंतर सरस्वती विसर्जन ! आजचा विजय मुहूर्त आहे दुपारी २.२८ ते दुपारी ३.१५ पर्यंत !

आज शनिवार, ३० सप्टेंबर, आश्विन शुक्ल दशमी, विजयादशमी - दसरा, अपराजिता व शमीपूजन, अश्वपूजा, सीमोल्लंघन, सायंकाळी ६-१५ नंतर सरस्वती विसर्जन ! आजचा विजय मुहूर्त आहे दुपारी २.२८ ते दुपारी ३.१५ पर्यंत !विजयादशमीचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे. त्यामुळे आज कोणत्याही शुभकार्याला प्रारंभ करावा, मौल्यवान वस्तू खरेदीसाठी विजयादशमीचा दिवस शुभ दिवस समजला जातो. पूर्वी या दिवशी पाटीवर सरस्वती काढून पूजा करीत असत. पूर्वी या दिवशी शिक्षणाचा प्रारंभ केला जात असे. आता या दिवशी संगणकाची पूजा केली जाते.आजचा दिवस सीमोल्लंघनाचा आहे. आळसाकडून उद्योगीपणाकडे, व्यसनाकडून निर्व्यसनाकडे. अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे. भ्रष्टाचाराकडून नीतिमत्ता- प्रामाणिकपणाकडे, बेशिस्तीकडून शिस्तीकडे सीमोल्लंघन करावयाचे आहे. प्रत्येक माणसाला केवळ विजयादशमीच्याच दिवशी नव्हे तर इतर दिवशीही सीमोल्लंघन करावे लागते. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत, माध्यमिक शाळेतून कॉलेजमध्ये, कॉलेजमधून पदवी घेतल्यावर नोकरीकडे किंवा व्यवसायाकडे, काहींना तर नोकरीसाठी आपल्या देशातून दुसºया देशाकडे सीमोल्लंघन करावे लागते. जीवनात वडील होण्याकडून आजोबा होण्याकडे सीमोल्लंघन करावयाचे असते. महिलांच्या आयुष्यात तर माहेराहून सासरी जाताना मोठे सीमोल्लंघन होत असते. जीवनात लहानपणी बाळगलेली स्वप्ने बाजूला ठेवावी लागतात. जीवनसाथी कसा आहे हे अगोदर जरी कळले तरी खरी ओळख तेथे सासरी राहिल्यानंतरच होत असते. आपल्या आई-बाबांपासून दूर जाताना मनाची किती घालमेल होत असेल ते स्त्री झाल्याशिवाय कुणाला कळणारच नाही. आपल्या आई-वडिलांशी असणारे नाते वेगळे असते. 'तडजोड' करीत 'लोक काय म्हणतील' ही भीती बाळगून गप्प राहायचे असते. नोकरी असेल तर मात्र घर आणि नोकरी सांभाळणे ही तारेवरची कसरत असते. या मुलीचा 'बा' तरी असतो खाली पडल्यावर वरचेवर झेलायला ! इथे तर आपणच तोल सांभाळीत पुढे जायचे असते. पडून चालणारच नसते. बरे रडू आले तर माहेरी मोकळेपणाने रडता तरी येत होते. थोडा वेळ झाला की आई येणार याची खात्री होती. पण सासरी रडू आले तर फक्त बाथरूममध्ये स्वत:ला कोंडून घेऊन रडावे लागते. मनात विचार येतो की मासे पाण्यात कसे रडत असतील. अश्रूंना कशी वाट करून देत असतील ? म्हणून म्हणतो की स्त्रियांचे माहेराहून सासरी जाण्याचे सीमोल्लंघन हे खूप कठीण असते.विजयादशमीच्या दिवशी वाईटाकडून चांगल्याकडे सीमोल्लंघन करता आले तर चांगले आहे. आपल्यातला वाईटपणा व चांगलेपणा हा आपल्याला तरी नक्कीच ठाऊक असतो. यासाठी विजयादशमीचा दिवस एक संधी असते. त्या संधीचा उपयोग करून आपण अधिक चांगले होऊया. आपल्यात चांगला बदल करूया. कारण 'बदल' हीच विश्वात कायम टिकणारी गोष्ट आहे.

टॅग्स :Dasaraदसरा