शहरं
Join us  
Trending Stories
1
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
2
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
3
राज ठाकरेंना उत्तर देण्यापूर्वी उद्धव ठाकरेंनी रश्मी ठाकरेंना विचारले होते का? नितेश राणेंचा सवाल
4
'आम्ही सर्वोच्च न्यायालयाचा आदर करतो, पण...' रामदास आठवलेंचे मोठे वक्तव्य
5
रेशनकार्डधारकांना KYC करण्याची अंतिम मुदत; यानंतर हटवलं जाणार नाव; मोबाईलवरुन करा प्रोसेस
6
LIC नं 'या' बँकेचे खरेदी केले १०.४५ कोटी शेअर्स, किंमत ₹२५० पेक्षाही कमी; आता गुंतवणूकदारांच्या उड्या
7
सलग पाचव्या दिवशी बाजारात तेजी; निफ्टी बँक विक्रमी उच्चांकावर, कोणत्या शेअर्समध्ये घसरण?
8
LPG गॅस सिलिंडरची घरपोच डिलिव्हरी होणार नाही, वितरक संपावर जाणार; कारण काय?
9
हद्दच झाली...! मित्रांनी नवरा-नवरीला निळा ड्रम गिफ्ट केला; दहशतीत असलेले सगळे वऱ्हाडी पाहू लागले
10
कितीही उत्पन्न असलं तरी श्रीमंती येणार नाही; जोपर्यंत बचतीचे 'हे' सूत्र वापरणार नाही
11
तुम्हीही रात्री भात खात असाल तर आताच थांबा; आरोग्याला बसू शकतो मोठा फटका
12
"मी लॉरेन्स बिश्नोईचा माणूस, तुला गोळी घालेन", रुबीना दिलेकच्या नवऱ्याला जीवे मारण्याची धमकी
13
व्यापारयुद्ध, चीन...भारतासाठी जेडी व्हेन्स यांचा दौरा महत्वाचा; पीएम मोदी कोणते मु्द्दे मांडणार?
14
Vastu Tips: घरात मनी प्लांट आहे पण आर्थिक लाभ होत नाही? नक्कीच होत आहेत 'या' चुका!
15
साईचरणी ७५ लाखांचा सुवर्ण मुकुट अर्पण; कुटुंबाकडून ओळख गुप्त ठेवण्याची विनंती
16
गायीच्या शेणात असं काय खास आहे? जे खरेदी करण्यासाठी अरब देशांनी लावल्या रांगा
17
Karnataka Murder: 'आई आणि बहीण रोज वडिलांशी भांडायची, जीवे मारण्याची दिलेली धमकी'; मुलाचा मोठा दावा
18
Rishabh Pant चं नशीब फळफळलं!! आधी २७ कोटींची बोली, आता BCCIच्या करारतही मिळाली बढती
19
Vastu Tips: आपल्या वास्तूची दृष्ट कधी व कशाने काढावी? त्यामागे शास्त्र काय? जाणून घ्या!
20
Pope Francis: किती श्रीमंत होते पोप फ्रान्सिस, आपल्या मागे किती सोडली त्यांनी संपत्ती?

आज विजयादशमी... चला, सीमोल्लंघन करूया !

By दा. कृ. सोमण | Updated: September 30, 2017 06:38 IST

आज शनिवार, ३० सप्टेंबर, आश्विन शुक्ल दशमी, विजयादशमी - दसरा, अपराजिता व शमीपूजन, अश्वपूजा, सीमोल्लंघन, सायंकाळी ६-१५ नंतर सरस्वती विसर्जन ! आजचा विजय मुहूर्त आहे दुपारी २.२८ ते दुपारी ३.१५ पर्यंत !

आज शनिवार, ३० सप्टेंबर, आश्विन शुक्ल दशमी, विजयादशमी - दसरा, अपराजिता व शमीपूजन, अश्वपूजा, सीमोल्लंघन, सायंकाळी ६-१५ नंतर सरस्वती विसर्जन ! आजचा विजय मुहूर्त आहे दुपारी २.२८ ते दुपारी ३.१५ पर्यंत !विजयादशमीचा दिवस हा साडेतीन मुहूर्तातील एक दिवस आहे. त्यामुळे आज कोणत्याही शुभकार्याला प्रारंभ करावा, मौल्यवान वस्तू खरेदीसाठी विजयादशमीचा दिवस शुभ दिवस समजला जातो. पूर्वी या दिवशी पाटीवर सरस्वती काढून पूजा करीत असत. पूर्वी या दिवशी शिक्षणाचा प्रारंभ केला जात असे. आता या दिवशी संगणकाची पूजा केली जाते.आजचा दिवस सीमोल्लंघनाचा आहे. आळसाकडून उद्योगीपणाकडे, व्यसनाकडून निर्व्यसनाकडे. अस्वच्छतेकडून स्वच्छतेकडे, अंधाराकडून प्रकाशाकडे. भ्रष्टाचाराकडून नीतिमत्ता- प्रामाणिकपणाकडे, बेशिस्तीकडून शिस्तीकडे सीमोल्लंघन करावयाचे आहे. प्रत्येक माणसाला केवळ विजयादशमीच्याच दिवशी नव्हे तर इतर दिवशीही सीमोल्लंघन करावे लागते. प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत, माध्यमिक शाळेतून कॉलेजमध्ये, कॉलेजमधून पदवी घेतल्यावर नोकरीकडे किंवा व्यवसायाकडे, काहींना तर नोकरीसाठी आपल्या देशातून दुसºया देशाकडे सीमोल्लंघन करावे लागते. जीवनात वडील होण्याकडून आजोबा होण्याकडे सीमोल्लंघन करावयाचे असते. महिलांच्या आयुष्यात तर माहेराहून सासरी जाताना मोठे सीमोल्लंघन होत असते. जीवनात लहानपणी बाळगलेली स्वप्ने बाजूला ठेवावी लागतात. जीवनसाथी कसा आहे हे अगोदर जरी कळले तरी खरी ओळख तेथे सासरी राहिल्यानंतरच होत असते. आपल्या आई-बाबांपासून दूर जाताना मनाची किती घालमेल होत असेल ते स्त्री झाल्याशिवाय कुणाला कळणारच नाही. आपल्या आई-वडिलांशी असणारे नाते वेगळे असते. 'तडजोड' करीत 'लोक काय म्हणतील' ही भीती बाळगून गप्प राहायचे असते. नोकरी असेल तर मात्र घर आणि नोकरी सांभाळणे ही तारेवरची कसरत असते. या मुलीचा 'बा' तरी असतो खाली पडल्यावर वरचेवर झेलायला ! इथे तर आपणच तोल सांभाळीत पुढे जायचे असते. पडून चालणारच नसते. बरे रडू आले तर माहेरी मोकळेपणाने रडता तरी येत होते. थोडा वेळ झाला की आई येणार याची खात्री होती. पण सासरी रडू आले तर फक्त बाथरूममध्ये स्वत:ला कोंडून घेऊन रडावे लागते. मनात विचार येतो की मासे पाण्यात कसे रडत असतील. अश्रूंना कशी वाट करून देत असतील ? म्हणून म्हणतो की स्त्रियांचे माहेराहून सासरी जाण्याचे सीमोल्लंघन हे खूप कठीण असते.विजयादशमीच्या दिवशी वाईटाकडून चांगल्याकडे सीमोल्लंघन करता आले तर चांगले आहे. आपल्यातला वाईटपणा व चांगलेपणा हा आपल्याला तरी नक्कीच ठाऊक असतो. यासाठी विजयादशमीचा दिवस एक संधी असते. त्या संधीचा उपयोग करून आपण अधिक चांगले होऊया. आपल्यात चांगला बदल करूया. कारण 'बदल' हीच विश्वात कायम टिकणारी गोष्ट आहे.

टॅग्स :Dasaraदसरा