शहरं
Join us  
Trending Stories
1
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
4
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
7
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
8
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
9
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
10
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
11
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
12
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
13
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
14
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
15
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
16
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
17
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
18
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
19
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
20
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
Daily Top 2Weekly Top 5

मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला देतात आकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:57 IST

- प्रल्हाद वामनराव पै ‘विचार करा विचार’ या लेखमालेत आपण पाहिले की, आपल्या मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला ...

- प्रल्हाद वामनराव पै‘विचार करा विचार’ या लेखमालेत आपण पाहिले की, आपल्या मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला आकार देत असतात. म्हणून जीवनविद्या सांगते की, विचार तसा जीवनाला आकार आणि म्हणूनच या विचारांकडे प्रयत्नपूर्वक लक्ष दिल्यास लक्षात येते की आपण सकारात्मक विचार करतो की नकारात्मक विचार करतो. यासाठी आपण सतत आपल्या विचारांकडे लक्ष द्यायला हवे. कारण आपण व्यवहारात पाहतो की जर मुलांकडे नीट लक्ष दिले नाही तर मुले बिघडतात. आर्थिक व्यवहाराकडे लक्ष दिले नाही तर नुकसान होते. आरोग्याकडे दुर्लक्ष केले की आरोग्य बिघडते. पत्नीकडे दुर्लक्ष केले की नशीब बिघडते. म्हणजेच आपण व्यस्त जीवन जगत असलो तरी आपण जातीने जसे वरील बाबींकडे लक्ष देतो त्याचप्रमाणे विचारांकडे लक्ष द्यायला हवे. आपले विचार हे आपणच निर्माण केलेली आपली मुलेच आहेत.या विचारांना रंग असतो, म्हणजे काही लोक काळवंडलेले विचार करीत असतात. त्यात चिंता, काळजी, दु:ख, खेद, निराशा, भय, त्वेष असे कलुषित रंग असतात तर काहींच्या विचारात आनंद, यश, प्रेम, सुख, समाधान यांचे सुंदर रंग भरलेले असतात.विचारांना गंध असतो म्हणजे एखाद्याचे मत्सराचे विचार ऐकले की आपण सहज म्हणतो याच्या बोलण्यात कुजकट वास येतोय. याउलट काहींच्या बोलण्याला प्रेमाचा, मायेचा सुगंध येतो. विचारांना आकार असतो कारण काहींचे विचार हे छोटे, स्वत:भोवती फिरणारे, संकुचित वृत्तीचे असतात तर काहींचे विचार हे मोठे व्यापक, देशहिताचे, सर्वांच्या कल्याणाचे असतात.विचारांना तेज असते कारण काहींचे विचार तेजस्वी असतात. असे तेजस्वी विचार ऐकल्याने इतरांना स्फूरण येते, प्रेरणा मिळते. असे समाजाला दिशा दाखवणारे, तेजस्वी विचार देणारे अनेक महात्मे, तत्त्वज्ञ या भारतभूमीत जन्माला आले. त्यांच्या विचारांचे आचरण केल्याने आपलेही विचार व्यापक होऊ शकतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक