शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला देतात आकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:57 IST

- प्रल्हाद वामनराव पै ‘विचार करा विचार’ या लेखमालेत आपण पाहिले की, आपल्या मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला ...

- प्रल्हाद वामनराव पै‘विचार करा विचार’ या लेखमालेत आपण पाहिले की, आपल्या मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला आकार देत असतात. म्हणून जीवनविद्या सांगते की, विचार तसा जीवनाला आकार आणि म्हणूनच या विचारांकडे प्रयत्नपूर्वक लक्ष दिल्यास लक्षात येते की आपण सकारात्मक विचार करतो की नकारात्मक विचार करतो. यासाठी आपण सतत आपल्या विचारांकडे लक्ष द्यायला हवे. कारण आपण व्यवहारात पाहतो की जर मुलांकडे नीट लक्ष दिले नाही तर मुले बिघडतात. आर्थिक व्यवहाराकडे लक्ष दिले नाही तर नुकसान होते. आरोग्याकडे दुर्लक्ष केले की आरोग्य बिघडते. पत्नीकडे दुर्लक्ष केले की नशीब बिघडते. म्हणजेच आपण व्यस्त जीवन जगत असलो तरी आपण जातीने जसे वरील बाबींकडे लक्ष देतो त्याचप्रमाणे विचारांकडे लक्ष द्यायला हवे. आपले विचार हे आपणच निर्माण केलेली आपली मुलेच आहेत.या विचारांना रंग असतो, म्हणजे काही लोक काळवंडलेले विचार करीत असतात. त्यात चिंता, काळजी, दु:ख, खेद, निराशा, भय, त्वेष असे कलुषित रंग असतात तर काहींच्या विचारात आनंद, यश, प्रेम, सुख, समाधान यांचे सुंदर रंग भरलेले असतात.विचारांना गंध असतो म्हणजे एखाद्याचे मत्सराचे विचार ऐकले की आपण सहज म्हणतो याच्या बोलण्यात कुजकट वास येतोय. याउलट काहींच्या बोलण्याला प्रेमाचा, मायेचा सुगंध येतो. विचारांना आकार असतो कारण काहींचे विचार हे छोटे, स्वत:भोवती फिरणारे, संकुचित वृत्तीचे असतात तर काहींचे विचार हे मोठे व्यापक, देशहिताचे, सर्वांच्या कल्याणाचे असतात.विचारांना तेज असते कारण काहींचे विचार तेजस्वी असतात. असे तेजस्वी विचार ऐकल्याने इतरांना स्फूरण येते, प्रेरणा मिळते. असे समाजाला दिशा दाखवणारे, तेजस्वी विचार देणारे अनेक महात्मे, तत्त्वज्ञ या भारतभूमीत जन्माला आले. त्यांच्या विचारांचे आचरण केल्याने आपलेही विचार व्यापक होऊ शकतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक