शहरं
Join us  
Trending Stories
1
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
2
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लॅन सांगितला
3
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
4
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
5
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
6
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
7
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
8
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
9
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
10
Independence Day 2025: काय योगायोग...! १९४७ ला तोच वार होता, जो उद्या १५ ऑगस्टला...; ७८ वर्षांनी...
11
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...
12
तो कोहलीमुळं खचला! खरंच हेच असेल का पाकचा 'बब्बर शेर' प्रत्येक मॅचमध्ये 'ढेर' होण्यामागचं कारण?
13
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज! ८वा वेतन आयोग कधी लागू होणार? सरकारचा मोठा खुलासा!
14
इन्स्टाग्रामवर १.२ मिलियन फॉलोअर्स, मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी ईडीनं केली अटक; कोण आहे 'ही' मॉडेल?
15
बस बनवणाऱ्या कंपनीला ₹५९४ कोटींचा नफा; शेअर खरेदीसाठी उड्या, ₹१२१ वर आला भाव
16
८८१ किमी केवळ १२ तासांत; ‘ही’ देशातील सर्वांत लांब अंतराची वंदे भारत, किती स्पीडने जाते?
17
२० वर्षे पगार दिला, पण नोकरीवर काही काम करू दिले नाही! नाराज महिला कंपनीविरोधात गेली कोर्टात, म्हणाली...
18
नीरज चोप्राची पत्नी हिमानी मोरचा मोठा निर्णय! टेनिसला कायमचा रामराम, 'या' व्यवसायात घेतली उडी
19
कोणत्या धर्माचं पालन करते सचिन तेंडुलकरची होणारी सून सानिया चांडोक? किती शिकलीये? जाणून घ्या
20
कबुतरखाना वाद: मध्यस्थीचा प्रस्ताव देणाऱ्या जैन मुनींना राज ठाकरेंचं थेट उत्तर; म्हणाले...

मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला देतात आकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2018 04:57 IST

- प्रल्हाद वामनराव पै ‘विचार करा विचार’ या लेखमालेत आपण पाहिले की, आपल्या मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला ...

- प्रल्हाद वामनराव पै‘विचार करा विचार’ या लेखमालेत आपण पाहिले की, आपल्या मनात निर्माण होणारे विचारच आपल्या जीवनाला आकार देत असतात. म्हणून जीवनविद्या सांगते की, विचार तसा जीवनाला आकार आणि म्हणूनच या विचारांकडे प्रयत्नपूर्वक लक्ष दिल्यास लक्षात येते की आपण सकारात्मक विचार करतो की नकारात्मक विचार करतो. यासाठी आपण सतत आपल्या विचारांकडे लक्ष द्यायला हवे. कारण आपण व्यवहारात पाहतो की जर मुलांकडे नीट लक्ष दिले नाही तर मुले बिघडतात. आर्थिक व्यवहाराकडे लक्ष दिले नाही तर नुकसान होते. आरोग्याकडे दुर्लक्ष केले की आरोग्य बिघडते. पत्नीकडे दुर्लक्ष केले की नशीब बिघडते. म्हणजेच आपण व्यस्त जीवन जगत असलो तरी आपण जातीने जसे वरील बाबींकडे लक्ष देतो त्याचप्रमाणे विचारांकडे लक्ष द्यायला हवे. आपले विचार हे आपणच निर्माण केलेली आपली मुलेच आहेत.या विचारांना रंग असतो, म्हणजे काही लोक काळवंडलेले विचार करीत असतात. त्यात चिंता, काळजी, दु:ख, खेद, निराशा, भय, त्वेष असे कलुषित रंग असतात तर काहींच्या विचारात आनंद, यश, प्रेम, सुख, समाधान यांचे सुंदर रंग भरलेले असतात.विचारांना गंध असतो म्हणजे एखाद्याचे मत्सराचे विचार ऐकले की आपण सहज म्हणतो याच्या बोलण्यात कुजकट वास येतोय. याउलट काहींच्या बोलण्याला प्रेमाचा, मायेचा सुगंध येतो. विचारांना आकार असतो कारण काहींचे विचार हे छोटे, स्वत:भोवती फिरणारे, संकुचित वृत्तीचे असतात तर काहींचे विचार हे मोठे व्यापक, देशहिताचे, सर्वांच्या कल्याणाचे असतात.विचारांना तेज असते कारण काहींचे विचार तेजस्वी असतात. असे तेजस्वी विचार ऐकल्याने इतरांना स्फूरण येते, प्रेरणा मिळते. असे समाजाला दिशा दाखवणारे, तेजस्वी विचार देणारे अनेक महात्मे, तत्त्वज्ञ या भारतभूमीत जन्माला आले. त्यांच्या विचारांचे आचरण केल्याने आपलेही विचार व्यापक होऊ शकतात.

टॅग्स :Adhyatmikआध्यात्मिक