शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर भारतीय महापौर बसेल इतके नगरसेवक निवडून आणू; भाजपा नेते कृपाशंकर सिंह यांचं विधान
2
निष्ठावंतांना डावललं, भाजपात मोठी बंडाळी; उद्धवसेनेतून आलेल्या माजी नगरसेवकाला दिली उमेदवारी
3
BMC Election: अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे ९४ शिलेदार रिंगणात; ५२ लाडक्या बहिणींना संधी
4
आरपीआय महायुतीतून बाहेर पडली का? रामदास आठवलेंनी मांडली भूमिका; म्हणाले, "काही पक्ष मुंबईत दादागिरी करू पाहताहेत"
5
Nashik: नाशिक भाजपमध्ये तिकीट वॉर! आमदार सीमा हिरे आणि इच्छुक उमेदवारांमध्ये राडा, नेमकं काय घडलं?
6
सोशल मीडियावरील अश्लील कंटेन्टबद्दल भारत सरकारने घेतला मोठा निर्णय; कडक शब्दांत दिला इशारा
7
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
8
PMC Election 2026: वकील आला अन् बातमी फुटली; अजित पवारांकडून गुंड आंदेकरच्या घरातील दोघींना तिकीट
9
धडामsss.... एका लाथेत कंपनीचा 'सीएओ' जमिनीवर आपटला! T800 रोबोटचा थरारक Video Viral
10
कोण आहे १७ वर्षीय G Kamalini? जिला स्मृतीच्या जागी मिळाली टीम इंडियाकडून T20I पदार्पणाची संधी
11
परभणीत उद्धवसेना आणि काँग्रेसची आघाडी; १२ जागांवर मैत्रीपूर्ण लढती
12
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
13
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
14
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
15
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
16
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
17
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
18
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
19
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
20
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
Daily Top 2Weekly Top 5

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:38 IST

याचसाठी आमचे तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात,

- इंद्रजित देशमुखशुद्ध परमार्थ करण्यासाठी आवश्यक असणारं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे चित्ताची शुद्धता हे होय. ही एक गोष्ट आम्ही आमच्याअंतरी धारण केली की, बोध नावाची गोष्ट पक्की व्हायला काहीच अडचण नाही.दृष्टीमध्ये येणारं सर्व तºहेचं वैषम्य कमी होण्यासाठी आणि दृष्टीत अखंड समता येण्यासाठी चित्त शुद्धी होणे गरजेचेच आहे. याचसाठी आमचे तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात,‘चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती।व्याघ्र ही न खाती सर्प तया।।’मुळात चित्ताचं मालिन्य हे पारमार्थिकआणि सांसारिक या दोघांच्या प्रगतीसाठी मारकच असतं. अशुद्ध चित्त, द्वेष, घृणाआणि मत्सर अशा गोष्टींच्या निर्मितीसाठी ते कारणीभूत ठरत असतं. चित्त शुद्ध नसलं की, जगातील बारीकसारीक वैगुण्यदेखील आम्हाला सहन होत नाही. जगाच्या दोषांकडे दुर्लक्ष करणे आणि जगाच्या गुणांची कदर करणं हा शुद्ध चित्त असलेल्या व्यक्तीचा सगळ्यात मोठा गुण आहे. अशुद्ध चित्त आपल्या भोवतालचं वैगुण्यशोधून त्याबद्दल अतिभाष्य करतं आणियातूनच वेगवेगळे वाद निर्माण होतात. द्वेष आणि मत्सराच्या कल्पना वाढीस लागतात आणि आपण तसेच आपला भवताल दु:खी होतो. याउलट शुद्ध चित्त आपलं आणि इतरांचंहितच पाहात असतं. आपलं आणि इतरांचं अस्तित्व अबाधित राहणारा विधायक विचार जोपासून तो उत्तरोत्तर संवर्धित करण्याचं कार्य शुद्ध चित्ताच्या माध्यमातून केलं जातं.म्हणूनच आपल्या आणि इतरांच्या हितासाठी चित्त शुद्ध असणं खूपच गरजेचं आहे. आपल्या जीवनातील आपल्या चांगुलपणाच्या आग्रही भूमिकेमुळे आपलं सगळ्यांचं चित्त शुद्ध व्हावं असं मनापासून वाटतं.