शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणकडून जोरदार प्रतिहल्ला, इस्राइलवर डागली शेकडो क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, तेल अवीवमध्ये स्फोट, काही नागरिक जखमी 
2
जवळची माणसे गेली, सारी स्वप्ने उद्ध्वस्त झाली, विमान अपघातात नातेवाईक गमावलेल्यांचा आक्रोश
3
गाझात बिनशर्त युद्धबंदीच्या ठरावावर भारत राहिला तटस्थ
4
मार्करमचे झुंजार नाबाद शतक, दक्षिण आफ्रिका कसोटी विश्वविजेतेपदापासून ६९ धावांनी दूर, ऑस्ट्रेलिया बॅकफूटवर
5
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
6
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
7
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
8
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
9
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
10
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
11
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
12
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
13
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
14
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
15
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
16
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
17
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
18
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
19
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
20
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:38 IST

याचसाठी आमचे तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात,

- इंद्रजित देशमुखशुद्ध परमार्थ करण्यासाठी आवश्यक असणारं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे चित्ताची शुद्धता हे होय. ही एक गोष्ट आम्ही आमच्याअंतरी धारण केली की, बोध नावाची गोष्ट पक्की व्हायला काहीच अडचण नाही.दृष्टीमध्ये येणारं सर्व तºहेचं वैषम्य कमी होण्यासाठी आणि दृष्टीत अखंड समता येण्यासाठी चित्त शुद्धी होणे गरजेचेच आहे. याचसाठी आमचे तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात,‘चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती।व्याघ्र ही न खाती सर्प तया।।’मुळात चित्ताचं मालिन्य हे पारमार्थिकआणि सांसारिक या दोघांच्या प्रगतीसाठी मारकच असतं. अशुद्ध चित्त, द्वेष, घृणाआणि मत्सर अशा गोष्टींच्या निर्मितीसाठी ते कारणीभूत ठरत असतं. चित्त शुद्ध नसलं की, जगातील बारीकसारीक वैगुण्यदेखील आम्हाला सहन होत नाही. जगाच्या दोषांकडे दुर्लक्ष करणे आणि जगाच्या गुणांची कदर करणं हा शुद्ध चित्त असलेल्या व्यक्तीचा सगळ्यात मोठा गुण आहे. अशुद्ध चित्त आपल्या भोवतालचं वैगुण्यशोधून त्याबद्दल अतिभाष्य करतं आणियातूनच वेगवेगळे वाद निर्माण होतात. द्वेष आणि मत्सराच्या कल्पना वाढीस लागतात आणि आपण तसेच आपला भवताल दु:खी होतो. याउलट शुद्ध चित्त आपलं आणि इतरांचंहितच पाहात असतं. आपलं आणि इतरांचं अस्तित्व अबाधित राहणारा विधायक विचार जोपासून तो उत्तरोत्तर संवर्धित करण्याचं कार्य शुद्ध चित्ताच्या माध्यमातून केलं जातं.म्हणूनच आपल्या आणि इतरांच्या हितासाठी चित्त शुद्ध असणं खूपच गरजेचं आहे. आपल्या जीवनातील आपल्या चांगुलपणाच्या आग्रही भूमिकेमुळे आपलं सगळ्यांचं चित्त शुद्ध व्हावं असं मनापासून वाटतं.