शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीयांनी घाम गाळून ज्या वस्तू बनवल्या, त्याच तुम्ही खरेदी करा; व्यापाऱ्यांनीही पुढाकार घ्यावा; पंतप्रधान मोदींचं आवाहन
2
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
3
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
4
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
5
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
6
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
7
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
8
IND vs ENG : "मी रोहित भाईला पाहिलं अन्..." शतकी खेळीनंतर यशस्वीनं शेअर केली ती खास गोष्ट (VIDEO)
9
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
10
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
11
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
12
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
13
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
14
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
15
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
16
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
17
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
18
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
19
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
20
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी

चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2020 02:38 IST

याचसाठी आमचे तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात,

- इंद्रजित देशमुखशुद्ध परमार्थ करण्यासाठी आवश्यक असणारं सगळ्यात महत्त्वाचं साधन म्हणजे चित्ताची शुद्धता हे होय. ही एक गोष्ट आम्ही आमच्याअंतरी धारण केली की, बोध नावाची गोष्ट पक्की व्हायला काहीच अडचण नाही.दृष्टीमध्ये येणारं सर्व तºहेचं वैषम्य कमी होण्यासाठी आणि दृष्टीत अखंड समता येण्यासाठी चित्त शुद्धी होणे गरजेचेच आहे. याचसाठी आमचे तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात,‘चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती।व्याघ्र ही न खाती सर्प तया।।’मुळात चित्ताचं मालिन्य हे पारमार्थिकआणि सांसारिक या दोघांच्या प्रगतीसाठी मारकच असतं. अशुद्ध चित्त, द्वेष, घृणाआणि मत्सर अशा गोष्टींच्या निर्मितीसाठी ते कारणीभूत ठरत असतं. चित्त शुद्ध नसलं की, जगातील बारीकसारीक वैगुण्यदेखील आम्हाला सहन होत नाही. जगाच्या दोषांकडे दुर्लक्ष करणे आणि जगाच्या गुणांची कदर करणं हा शुद्ध चित्त असलेल्या व्यक्तीचा सगळ्यात मोठा गुण आहे. अशुद्ध चित्त आपल्या भोवतालचं वैगुण्यशोधून त्याबद्दल अतिभाष्य करतं आणियातूनच वेगवेगळे वाद निर्माण होतात. द्वेष आणि मत्सराच्या कल्पना वाढीस लागतात आणि आपण तसेच आपला भवताल दु:खी होतो. याउलट शुद्ध चित्त आपलं आणि इतरांचंहितच पाहात असतं. आपलं आणि इतरांचं अस्तित्व अबाधित राहणारा विधायक विचार जोपासून तो उत्तरोत्तर संवर्धित करण्याचं कार्य शुद्ध चित्ताच्या माध्यमातून केलं जातं.म्हणूनच आपल्या आणि इतरांच्या हितासाठी चित्त शुद्ध असणं खूपच गरजेचं आहे. आपल्या जीवनातील आपल्या चांगुलपणाच्या आग्रही भूमिकेमुळे आपलं सगळ्यांचं चित्त शुद्ध व्हावं असं मनापासून वाटतं.