शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे जाणारा सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
3
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
4
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
5
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड
6
छत्रपती संभाजीनगर: समृद्धी महामार्गावरील टोल नाक्यावर गोळीबार, कर्मचाऱ्याच्या पोटात लागली गोळी
7
Radhika Yadav : राधिकाला मारण्यापूर्वी स्वत:लाच संपवणार होते वडील; टेनिसपटूच्या हत्या प्रकरणात पुन्हा नवा ट्विस्ट
8
अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, घडलं काय?
9
पत्नीच्या शस्त्रक्रियेसाठी जामीन मिळवला अन् बाहेर येताच फरार झाला सिद्धू मूसेवाला हत्याकांडातील आरोपी!  
10
चातुर्मासातील पहिले पंचक रविवारपासून, अजिबात करू नका ‘ही’ कामे; ५ दिवस ठरणार अत्यंत अशुभ?
11
"राधिका यादवला लग्न करायचं होतं, पण..."; शेजाऱ्यानं काही भलतंच सांगितलं! काय म्हणाला?
12
Electric Car: एका चार्जवर ३ देश फिरले, 'या' इलेक्ट्रिक कारची गिनीज बूकमध्ये नोंद होणार!
13
Plane Crash: पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर
14
"सैफ रुग्णालयात असताना करीना कपूरच्या कारवरही हल्ला झाला", रोनित रॉयचा धक्कादायक खुलासा
15
Tarot Card: या सप्ताहात परिस्थितीचा करा स्वीकार, भावनेत न गुंतता करा सारासार विचार!
16
Air India Plane Crash: टेकऑफ ते क्रॅश होईपर्यंत 'त्या' ९८ सेकंदात काय झालं?; AAIB चा रिपोर्ट, धक्कादायक खुलासे
17
अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."
18
अन्न-पाणीही मिळेना, लोकांची होतेय तडफड! गाझामध्ये मदत केंद्राजवळच ७९८ लोकांचा मृत्यू
19
चातुर्मासातील पहिली संकष्ट चतुर्थी: चंद्रोदय वेळ काय? बाप्पा होईल प्रसन्न, ‘असे’ करा पूजन
20
Maharashtra Co-op Bank case: आमदार रोहित पवार यांच्याविरोधात ईडीने दाखल केले पुरवणी आरोपपत्र

गुरूंच्या सेवेतूनच मनातील इच्छा पूर्ण होतात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2021 14:42 IST

जे शहाणे आहेत त्यांनी श्री गुरूंची सेवा करावी. म्हणजे त्यांच्या मनातील सर्व हेतू सिध्दीस जातील. यासाठी सर्वांनी गुरूंची सेवा करणे गरजेचे आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांनी पुढील ओवीमध्ये गुरूसेवेबद्दल काय सांगितले वाचा.. 

म्हणोनि जाणतेने गुरू भजिजो । तेणे कृतकार्य होई जे । जैसे मूळ सिंचने सहजे ।शाखा पल्लव संतोषती ।।(ज्ञानेश्वरी अध्याय क्रमांक १, ओवी क्रमांक २५)

ज्ञानेश्वर महाराजांनी या ओवीमध्ये सांगितले आहे की, जे लोक रूप, रस, गंध, स्पर्श, शब्द व काम, क्रोध, शोक, मोह, भय, षडकिराने विलीन होतात. त्याच्याविषयी सांगितले आहे.

पामर- जे लोक पाप व पुण्य याचा विचार करत नाही. धर्म व अधर्म याचा विचार करीत नाहीत व तामस वृत्तीने आपल्या म्हणण्याप्रमाणे आचरण करतात. त्याला पामर असे ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे. याचे  उदाहरण द्यायचे झाले तर आज सध्या मद्यपान करणारे, मांसाहार करणारे, अधर्माने वागणारे समाजात बरेच लोक आहेत. 

रूप- पतंग दिव्याचा प्रकाश पाहून त्यावर झडप घालतात आणि मरतात. 

रस- मासे मारणारे कोळी मासे मारण्याच्या आपल्या लोखंडी गळाचे आकडे एकत्र जमवून त्यावर आमिष म्हणून काही तरी खाण्याचा पदार्थ बांधून तो गळ पाण्यात सोडतात. लगेच पाण्यातील मासे त्या पदार्थाच्या आषिलाषेने त्या पदार्थातच म्हणजे लोखंडी गळासच आपले तोंडे खुपसून मरण पावतात. यासाठी रस हा विषय दु:खाचे कारण आहे.

गंध- एखाद्या सूर्य विकासी प्रफुल्लीत कमळावर एखादा भ्रमर सुंगधाच्या आभिलाषेने बसून राहतो. सूर्यास्ताबरोबर ते कमळ मिटते. तथापी तो सुवासच्या लोभाने त्यातून बाहेर पडत नाही. काही वेळाने तेथे हत्ती येऊन कमळ उपटून खाऊन टाकतो. याचा अर्थ कमळाबरोबर भ्रमर मरण पावतो म्हणून गंध विषय दु:खाला कारण बनतो.

स्पर्श- हत्ती पकडणारे एक हत्तीण लाकडी बनवितात. तिला रंग देतात व खड्डा करतात. हत्ती हत्तीणीला पाहून अशक्त होतो. खड्ड्यात जाऊन पडतो. याचा अर्थ असा की, अशक्त होऊन हत्ती नाश पावतो. स्पर्श विषय दु:खाला कारण होतो. 

शब्द-  एकदा एक लबाड सुस्वर कंठाचा पारधी रानात मुद्दाम सुस्वर गाऊ लागतो. त्याच्या गाण्याला नादवून हरीण फाश्यामध्ये अडकते व मरण पावते. याचा अर्थ असा की, शब्द हा विषय दु:खाला कारण बनतो. 

रिकामा- याबाबत संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, या वर्गाला काहीच न करण्याची इच्छा असते, त्या वर्गाला रिकामा असे म्हटले जाते. 

जिज्ञासा- या वर्गाला ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटले आहे की, हे लोक धर्म व अधर्म, पाप व पुण्य हे जाणून धर्माने वागतात. गुरूंची सेवा करतात. आचरण चांगले असते म्हणून महाराजांनी त्याला जिज्ञासू असे म्हटले आहे. 

या सर्वाचा सार असा आहे की, जे गुरूची सेवा करतात. त्यांची सर्व इच्छा भगवान (देव) पुरी करतो. त्यासाठी महाराजांनी झाडाच्या मुळाला पाणी घातले की झाडांची पाने आपोआप टवटवीत होतात, असे म्हटले आहे. याचे उदाहरण द्यायचे झाले तर प्रभू रामचंद्रांनी विश्वमित्र वशिष्ठऋषींची सेवा केली. भगवान श्रीकृष्णाने संदीपनऋषींची सेवा केली. 

-गोरक्षनाथ महाराज शिंदेदत्त मंदिर प्रमुख, तळवडी (ता. कर्जत), जि. अहमदनगर.(९८५०९५६८२७) 

टॅग्स :AhmednagarअहमदनगरKarjatकर्जतAdhyatmikआध्यात्मिक