शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

विचारांची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 03:35 IST

आपले विचार हेच आपल्या मनाचे अन्न असते. आपले शरीर सुदृृढ राहण्यासाठी जसे आपण पौष्टिक व सकस अन्न घेतो तसे आपल मन सशक्त राहण्यासाठी आपले विचार हे उच्च दर्जाचे असणे आवश्यक असते. अध्यात्मामध्ये विचारांना साधारणपणे चार भागात विभागल्या जाते.

- प्रा.डॉ. संदीप ताटेवार

आपले विचार हेच आपल्या मनाचे अन्न असते. आपले शरीर सुदृृढ राहण्यासाठी जसे आपण पौष्टिक व सकस अन्न घेतो तसे आपल मन सशक्त राहण्यासाठी आपले विचार हे उच्च दर्जाचे असणे आवश्यक असते. अध्यात्मामध्ये विचारांना साधारणपणे चार भागात विभागल्या जाते. पहिले म्हणजे उच्च दर्जाचे विचार, दुसरे म्हणजे साधारण विचार, तिसरे म्हणजे नकारात्मक विचार व चौथे म्हणजे अनुपयोगी विचार. जीवन जगताना आपले जास्तीत जास्त विचार उच्च दर्जाचे असणे आवश्यक आहे.असे म्हणतात की सामान्य मानसिक अवस्थेत आपल्या मनात साधारणपणे ३० ते ४० हजार प्रतिदिन विचार येत असतात. रात्री झोपेत आपल्या विचारांची गती खूप कमी असते.जेव्हा मन चिंतेत असते तेव्हा विचारांची संख्या जास्त असते मात्र जेव्हा मन शांत असते तेव्हा ती कमी असते. आपल्या मनात बहुदा नकारात्मक विचार येण्याची संख्या जास्त असते तर सकारात्मक विचार येण्याची संख्या कमी असते. त्यामुळेच सकारात्मक विचार मनात जाणीवपूर्वक निर्माण करावे लागतात. कोणतीही क्रिया करण्यापूर्वी आपल्या मनात प्रथम विचार निर्माण होतात व तसे भाव निर्माण होतात नंतर मेंदू विचारांचे विश्लेषण करतो. त्यानंतर तो योग्य निर्णय घेतो व घेतलेला निर्णय आपल्या इंद्रियांकडे पोहचवितो. त्याप्रमाणे आपले इंद्रिय कार्य करतात.जर आपले विचार उच्च दर्जाचे असतील तरच आपले इंद्रिय कर्म चांगले करतील. त्यामुळे जर आपण नियमित उच्च दर्जाचे विचार करू लागलो तर निरंतर आपले कर्म चांगले होऊन आपले भाग्य उदयास येईल.बरेचदा आपल्या स्वभावामुळे, संस्कारामुळे व सवयीमुळे मेंदूचा विचारांचे विश्लेषण करून निर्णय घेणारा टप्पा गाळला जातो मग जसे आपले विचार तसे आपण इंद्रियामार्फत कार्य करत जातो. त्यामुळे सकारात्मक विचारांचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजकुमाराचा बुद्ध, वाल्याचा वाल्मिकी, राम्या माधुकरीचा रामशास्त्री, मानवाचा महामानव हे उच्च दर्जाच्या विचारांचेच फलित होय.