शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
2
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
3
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
4
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
5
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
6
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
7
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
8
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
9
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
10
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
11
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
12
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
13
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
14
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
15
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
16
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
17
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
18
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
19
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
20
Crime: गे डेटिंग अपवर ओळख, ८ जण फ्लॅटवर पार्टीसाठी भेटले; पार्टीनंतर शुभमचा मृत्यू

विचारांची किमया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 3, 2017 03:35 IST

आपले विचार हेच आपल्या मनाचे अन्न असते. आपले शरीर सुदृृढ राहण्यासाठी जसे आपण पौष्टिक व सकस अन्न घेतो तसे आपल मन सशक्त राहण्यासाठी आपले विचार हे उच्च दर्जाचे असणे आवश्यक असते. अध्यात्मामध्ये विचारांना साधारणपणे चार भागात विभागल्या जाते.

- प्रा.डॉ. संदीप ताटेवार

आपले विचार हेच आपल्या मनाचे अन्न असते. आपले शरीर सुदृृढ राहण्यासाठी जसे आपण पौष्टिक व सकस अन्न घेतो तसे आपल मन सशक्त राहण्यासाठी आपले विचार हे उच्च दर्जाचे असणे आवश्यक असते. अध्यात्मामध्ये विचारांना साधारणपणे चार भागात विभागल्या जाते. पहिले म्हणजे उच्च दर्जाचे विचार, दुसरे म्हणजे साधारण विचार, तिसरे म्हणजे नकारात्मक विचार व चौथे म्हणजे अनुपयोगी विचार. जीवन जगताना आपले जास्तीत जास्त विचार उच्च दर्जाचे असणे आवश्यक आहे.असे म्हणतात की सामान्य मानसिक अवस्थेत आपल्या मनात साधारणपणे ३० ते ४० हजार प्रतिदिन विचार येत असतात. रात्री झोपेत आपल्या विचारांची गती खूप कमी असते.जेव्हा मन चिंतेत असते तेव्हा विचारांची संख्या जास्त असते मात्र जेव्हा मन शांत असते तेव्हा ती कमी असते. आपल्या मनात बहुदा नकारात्मक विचार येण्याची संख्या जास्त असते तर सकारात्मक विचार येण्याची संख्या कमी असते. त्यामुळेच सकारात्मक विचार मनात जाणीवपूर्वक निर्माण करावे लागतात. कोणतीही क्रिया करण्यापूर्वी आपल्या मनात प्रथम विचार निर्माण होतात व तसे भाव निर्माण होतात नंतर मेंदू विचारांचे विश्लेषण करतो. त्यानंतर तो योग्य निर्णय घेतो व घेतलेला निर्णय आपल्या इंद्रियांकडे पोहचवितो. त्याप्रमाणे आपले इंद्रिय कार्य करतात.जर आपले विचार उच्च दर्जाचे असतील तरच आपले इंद्रिय कर्म चांगले करतील. त्यामुळे जर आपण नियमित उच्च दर्जाचे विचार करू लागलो तर निरंतर आपले कर्म चांगले होऊन आपले भाग्य उदयास येईल.बरेचदा आपल्या स्वभावामुळे, संस्कारामुळे व सवयीमुळे मेंदूचा विचारांचे विश्लेषण करून निर्णय घेणारा टप्पा गाळला जातो मग जसे आपले विचार तसे आपण इंद्रियामार्फत कार्य करत जातो. त्यामुळे सकारात्मक विचारांचे जीवनात अनन्यसाधारण महत्त्व आहे. राजकुमाराचा बुद्ध, वाल्याचा वाल्मिकी, राम्या माधुकरीचा रामशास्त्री, मानवाचा महामानव हे उच्च दर्जाच्या विचारांचेच फलित होय.